शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

शालेय कामकाजात अडथळा कराल तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 00:56 IST

विविध कारणांमुळे शाळेला कुलूप ठोकणे किंवा शाळेतील विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयात घेऊन येणाऱ्याविरूद्ध थेट कारवाई करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांनी शनिवारी दिल्या आहेत. असा प्रकार घडल्यास संबंधित मुख्याध्यापक व सेवाज्येष्ठ शिक्षकांनी कारवाई करून तसा अहवाल सादर करण्याचेही परित्रकात म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : विविध कारणांमुळे शाळेला कुलूप ठोकणे किंवा शाळेतील विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयात घेऊन येणाऱ्याविरूद्ध थेट कारवाई करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांनी शनिवारी दिल्या आहेत. असा प्रकार घडल्यास संबंधित मुख्याध्यापक व सेवाज्येष्ठ शिक्षकांनी कारवाई करून तसा अहवाल सादर करण्याचेही परित्रकात म्हटले आहे.जिल्ह्यांतर्गत वेगवेगळ्या कारणासाठी जिल्हा परिषद शाळेच्या दैनंदिन कामात अडथळा आणला जातो. तसेच शाळा चालू असताना शाळा बंद करणे, संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन पंचायत समिती, जिल्हास्तवरील शासकीय कार्यालयात आणणे, शाळांना कुलूप ठोकणे अशा विविध घटना घडत आहेत. परिणामी, दैनंदिन कामे पार पाडताना अडचणी निर्माण होतात. तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. शिवाय बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ चा भंग होत आहे.याची दखल घेत आता मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड यांनी असे अडथळे करणाºयांविरूद्ध थेट कारवाई करण्याच्या सूचना संबंधित मुख्याध्यापक, सेवाज्येष्ठ शिक्षकांना देत पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाई करण्याचे पत्र पाठवले आहे. तसेच कारवाई केलेल्या अहवालही शासन दरबारी पाठवायचा आहे. असे न केल्यास संबंधितांवरच कार्यवाही करण्यात येणार आहे.शाळेतील समस्या सुटाव्यात या अनुषंगाने अनेकजण शाळांना कुलुप ठोकून आंदोलन करतात किंवा शासकीय कार्यालयात विद्यार्थ्यांना घेऊन येतात. परंतु आता असा प्रकार करणाºयाविरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे शालेय कामकाज करण्यात येणार नाही. शिवाय विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांनाही अडचणी येणार नाहीत. या अनुषंगाने जिल्हा परिषद प्रशासनातर्फे पत्र काढून सूचना दिल्या आहेत.सध्या जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्यांमुळे अनेक शाळांतील पदे रिक्त होत आहेत. रिक्त पदे भरण्याची प्रक्रियाही जि. प. प्रशासनाकडून पार पाडली जाणार आहे. परंतु ही प्रक्रिया राबविताना रिक्त पदाअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळेविद्यार्थ्यांचे पालक व गावकरी मंडळी आक्रमक होत आहेत. शाळेतील रिक्त पद तात्काळ भरावीत, अशी पालकांची मागणी आहे. परंतु शालेय समस्या सोडविताना शालेय कामकाजात अडथळा निर्माण करणे जमणार नाही. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.शिक्षकांची कमतरता आहे, परंतु प्रशासन प्रयत्न करीत आहे. शालेय समस्या सोडविण्यासाठी पत्रव्यवहार करावा. असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी केले आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीSchoolशाळा