शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शालेय कामकाजात अडथळा कराल तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 00:56 IST

विविध कारणांमुळे शाळेला कुलूप ठोकणे किंवा शाळेतील विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयात घेऊन येणाऱ्याविरूद्ध थेट कारवाई करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांनी शनिवारी दिल्या आहेत. असा प्रकार घडल्यास संबंधित मुख्याध्यापक व सेवाज्येष्ठ शिक्षकांनी कारवाई करून तसा अहवाल सादर करण्याचेही परित्रकात म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : विविध कारणांमुळे शाळेला कुलूप ठोकणे किंवा शाळेतील विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयात घेऊन येणाऱ्याविरूद्ध थेट कारवाई करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांनी शनिवारी दिल्या आहेत. असा प्रकार घडल्यास संबंधित मुख्याध्यापक व सेवाज्येष्ठ शिक्षकांनी कारवाई करून तसा अहवाल सादर करण्याचेही परित्रकात म्हटले आहे.जिल्ह्यांतर्गत वेगवेगळ्या कारणासाठी जिल्हा परिषद शाळेच्या दैनंदिन कामात अडथळा आणला जातो. तसेच शाळा चालू असताना शाळा बंद करणे, संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन पंचायत समिती, जिल्हास्तवरील शासकीय कार्यालयात आणणे, शाळांना कुलूप ठोकणे अशा विविध घटना घडत आहेत. परिणामी, दैनंदिन कामे पार पाडताना अडचणी निर्माण होतात. तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. शिवाय बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ चा भंग होत आहे.याची दखल घेत आता मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड यांनी असे अडथळे करणाºयांविरूद्ध थेट कारवाई करण्याच्या सूचना संबंधित मुख्याध्यापक, सेवाज्येष्ठ शिक्षकांना देत पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाई करण्याचे पत्र पाठवले आहे. तसेच कारवाई केलेल्या अहवालही शासन दरबारी पाठवायचा आहे. असे न केल्यास संबंधितांवरच कार्यवाही करण्यात येणार आहे.शाळेतील समस्या सुटाव्यात या अनुषंगाने अनेकजण शाळांना कुलुप ठोकून आंदोलन करतात किंवा शासकीय कार्यालयात विद्यार्थ्यांना घेऊन येतात. परंतु आता असा प्रकार करणाºयाविरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे शालेय कामकाज करण्यात येणार नाही. शिवाय विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांनाही अडचणी येणार नाहीत. या अनुषंगाने जिल्हा परिषद प्रशासनातर्फे पत्र काढून सूचना दिल्या आहेत.सध्या जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्यांमुळे अनेक शाळांतील पदे रिक्त होत आहेत. रिक्त पदे भरण्याची प्रक्रियाही जि. प. प्रशासनाकडून पार पाडली जाणार आहे. परंतु ही प्रक्रिया राबविताना रिक्त पदाअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळेविद्यार्थ्यांचे पालक व गावकरी मंडळी आक्रमक होत आहेत. शाळेतील रिक्त पद तात्काळ भरावीत, अशी पालकांची मागणी आहे. परंतु शालेय समस्या सोडविताना शालेय कामकाजात अडथळा निर्माण करणे जमणार नाही. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.शिक्षकांची कमतरता आहे, परंतु प्रशासन प्रयत्न करीत आहे. शालेय समस्या सोडविण्यासाठी पत्रव्यवहार करावा. असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी केले आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीSchoolशाळा