शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
6
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
7
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
8
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
9
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
10
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
11
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
12
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
13
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
14
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
15
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
16
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
17
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
18
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
19
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
20
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

दुरुस्तीसाठी आले दीडशे रोहित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:28 IST

आधीच दुष्काळी परिस्थिती असून प्रत्येक गावात चार-दोन शेतकऱ्यांकडे मात्र सिंचनाची सोय आहे. इतर शेतकरी बिल भरत नसल्याने या शेतकºयांचीही गोची होत असल्याने लोकप्रतिनिधींकडे खेटे मारून हे शेतकरी हैराण असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात कृषी व गावठाणच्या जवळपास दीडशे रोहित्रांची दुरुस्ती बाकी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आधीच दुष्काळी परिस्थिती असून प्रत्येक गावात चार-दोन शेतकऱ्यांकडे मात्र सिंचनाची सोय आहे. इतर शेतकरी बिल भरत नसल्याने या शेतकºयांचीही गोची होत असल्याने लोकप्रतिनिधींकडे खेटे मारून हे शेतकरी हैराण असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात कृषी व गावठाणच्या जवळपास दीडशे रोहित्रांची दुरुस्ती बाकी आहे.हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीजचोरी, रोहित्रावरील अधिक भार आदी कारणांमुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण जास्त आहे. कधी आॅईलचा तुटवडा तर कधी दुरुस्ती करणारी यंत्रणाच काम बंद करीत असल्याने शेतकºयांना रोहित्र वेळेत दुरुस्त करून मिळत नाही. त्यातही आता महावितरणने थकबाकीचा आकडा कमी करण्यासाठी त्या रोहित्रावरील १00 टक्के वसुलीशिवाय रोहित्र न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अशांची वेगळी प्रतीक्षा यादी तयार केली आहे. ही यादी आटोपल्यावर इतरांना रोहित्र मिळत आहे.या यादीतीलच सर्व गावांना रोहित्र मिळत नसल्याने इतर याद्यांचा विचारही होत नसल्याने अनेक गावांत महिन्यापासून अंधाराचा सामना करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. काही गावात तर मोजक्याच शेतकºयांच्या शेतातील जलस्त्रोताला पाणी आहे. त्यामुळे इतर शेतकरी बिल भरण्यास तयार नाहीत. त्यामुळे अशा शेतकºयांना इतरांमुळे रोहित्र दुरुस्त करून मिळत नसल्याचे चित्र आहे. हे शेतकरी लोकप्रतिनिधी व अधिकाºयांकडे खेटे मारत आहेत. यावर कोणताच तोडगाही निघत नसल्याने नाहक वेळ दवडावा लागत आहे. इतरांची वीजजोडणी तोडून आम्हाला रोहित्र द्या, अशी मागणीही होत आहे. मात्र महावितरणला ते सोयीस्कर वाटत नाही.हिंगोली जिल्ह्यात सर्व थकबाकी भरूनही दुरुस्त न झालेले १00 एचपीचे २४, अपूर्ण थकबाकी भरलेले ७ तर कोणतीच थकबाकी न भरलेले ३0 रोहित्र आहेत. ६३ एचपीमध्ये पूर्ण थकबाकी भरलेले ३७, अर्धवट रक्कम भरलेले ८ तर काहीच न भरलेले २५ रोहित्र दुरुस्तीविना पडून आहेत. सिंगल फेजचे पूर्ण थकबाकी भरलेले १0 तर अर्धवट थकबाकी भरलेले ५ रोहित्र दुरुस्तीचे बाकी आहेत. महावितरणने आता प्रतीक्षा यादीनुसारच वाटपाचे नियोजन केल्याने पुढाºयांनाही काही वाव उरला नाही. त्यामुळे शेतकºयांना आता जावे तरी कुणाकडे ? असा प्रश्न पडला आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmahavitaranमहावितरण