शहरं
Join us  
Trending Stories
1
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
4
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
5
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
6
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
7
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
9
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
10
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
11
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
12
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
13
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
14
अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नाही, हा आमचा झांगनान; चीनची दर्पोक्ती, भारतावर निशाणा
15
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
16
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
17
१८८९ ते १९४९ - राज्यघटनेच्या जन्माची ६० वर्षे! 'असा' भारतीय घटनेच्या निर्मितीचा इतिहास
18
‘काँग्रेस’चे शशी थरूर भाजपमध्ये (कधी) जातील?; केरळच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतील
19
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
20
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
Daily Top 2Weekly Top 5

बारावीचा निकाल ८६.४0 टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 01:04 IST

जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८६.४0 टक्के लागला असून सर्वाधिक निकाल विज्ञान शाखेचा ९५.१७ टक्के लागला आहे. परीक्षेला बसलेल्या १२ हजार १५२ पैकी १0४९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८६.४0 टक्के लागला असून सर्वाधिक निकाल विज्ञान शाखेचा ९५.१७ टक्के लागला आहे. परीक्षेला बसलेल्या १२ हजार १५२ पैकी १0४९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.हिंगोली जिल्ह्यात विज्ञान शाखेसाठी ४७१३ जणांनी नोंदणी केली होती. तर ४६९८ जांनी परीक्षा दिली. यापैकी ४४७१ उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ९५.१७ टक्के आहे. यात २७३ विशेष प्राविण्यात व २0३३ प्रथम श्रेणीत आहेत. बारावी कला शाखेसाठी ६३२९ नोंदणी केलेल्यांपैकी ६३0७ जणांनी परीक्षा दिली.यातील ४९९४ उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ७९.१८ टक्के आहे. यात ४६६ विशेष प्राविण्यात तर २५२९ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.वाणिज्य शाखेत नोंदणी केलेल्या ८३0 पैकी ८२८ जणांनी परीक्षा दिली. ७७५ उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ९३.६0 टक्के आहे. यात १४८ विशेष प्राविण्यात तर ३९२ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाचे ३१९ पैकी २९ जण उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ८१.१९ टक्के असून यात ११ विशेष प्राविण्यात तर १५५ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.पुरवणी परीक्षेलाही हिंगोली जिल्ह्यात सर्व शाखांचे मिळून ५६२ विद्यार्थी होते.यापैकी १६२ उत्तीर्ण झाले. निकाल २८.८३ टक्के लागला आहे. यात प्रथम श्रेणीत ३१ जण उत्तीर्ण झाले आहेत.जिल्ह्यात सर्व शाखांचे मिळून विशेष प्राविण्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ८९८ एवढी असून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले ५१0९ एवढे विद्यार्थी आहेत.द्वितीय श्रेणीत ४३४३ विद्यार्थी असून काठावर उत्तीर्ण होणारे अवघे १४९ जण आहेत. यंदा काठावर उत्तीर्ण होणाऱ्यांचा टक्का घसरला आहे. तर द्वितीय व प्रथम श्रेणीत ही मुले गेल्याने यात टक्का वाढला आहे.हे वाढत्या गुणवत्तेचे लक्षण असले तरीही विशेष प्राविण्यात येणाºयांची संख्या त्या तुलनेत वाढत नसल्याचे दिसून येत आहे.तालुकानिहाय तुलना केल्यास हिंगोली तालुक्याचा सर्वाधिक ८८.३२ टक्के निकाल लागला. त्यानंतर कळमनुरी ८७.८८, सेनगाव-८७.८६, वसमत-८४.८२ व औंढा नागनाथ ८३.७५ अशी स्थिती आहे. हिंगोली तालुक्यात परीक्षा दिलेल्या १७0८ पैकी १४५७ मुले व ११५२ पैकी १0६९ मुली उत्तीर्ण झाल्या.कळमनुरीत १५२४ पैकी १२८४ मुले व १0३४ पैकी ९६४ मुली, वसमतला २१४९ पैकी १७४४ मुले व १६0२ पैकी १४१५ मुली, सेनगावात १0२७ पैकी ८९१ मुले तर ६२१ पैकी ५५७ मुली, औंढ्यात ७७१ पैकी ६२६ मुले तर ५६४ पैकी ४९२ मुली उत्त्तीर्ण झाल्या.यंदाही हिंगोली जिल्ह्यात मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. यात ७२0१ पैकी ६00२ मुले तर ४९९0 पैकी ४४९७ मुली उत्तीर्ण झाल्या. मुले ८३.६0 तर मुली ९0.४३ टक्के उत्तीर्ण झाल्या.तीन शाळांचा १00 टक्के निकालजिल्ह्यातील तीन शाळांचा १00 टक्के निकाल लागला आहे. यात उच्च माध्यमिक शाळा ढोलक्याची वाडीचा विज्ञान व कला शाखेचा १00 टक्के, सिद्धेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय हट्टा कला शाखा १00 टक्के व संत गजानन महाराज कनिष्ठ महाविद्यालय कापडसिंग कला शाखा १00 टक्के निकाल यांचा समावेश आहे. याशिवाय काही शाळांमध्ये एखाद्या किंवा दोन शाखांचा १00 टक्के निकाल लागला, छत्रपती शाहू महाराज उच्च माध्यमिक शाळा आडगाव विज्ञानचा १00 टक्के, केंब्रिज कनिष्ठ महाविद्यालय चुंचा विज्ञान १00 टक्के, बहिर्जी स्मारक महाविद्यालय वसमत वाणिज्य १00 टक्के, मॉडर्न उच्च माध्यमिक शाळा वसमत विज्ञान १00 टक्के, महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय वसमत विज्ञान १00 टक्के, सवित्रीबाई फुले कनिष्ट महाविद्यालय वाणिज्य १00 टक्के,श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय गुगुळ पिंप्री विज्ञान १00 टक्के, आप्पास्वामी कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान १00 टक्के, मानकेश्वर कनिष्ठ महाविद्यालय पानकनेरगाव विज्ञान १00 टक्के लागला आहे. मात्र याच शाळा, महाविद्यालयांत बारावीच्या इतर शाखांच्या निकालाचे प्रमाण कमी असल्याने एकंदर निकाल १00 टक्के लागू शकला नाही. विशेषत: विज्ञान शाखेचा निकाल सगळीकडेच चांगला दिसत आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीeducationशैक्षणिक