शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बारावीचा निकाल ८६.४0 टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 01:04 IST

जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८६.४0 टक्के लागला असून सर्वाधिक निकाल विज्ञान शाखेचा ९५.१७ टक्के लागला आहे. परीक्षेला बसलेल्या १२ हजार १५२ पैकी १0४९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८६.४0 टक्के लागला असून सर्वाधिक निकाल विज्ञान शाखेचा ९५.१७ टक्के लागला आहे. परीक्षेला बसलेल्या १२ हजार १५२ पैकी १0४९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.हिंगोली जिल्ह्यात विज्ञान शाखेसाठी ४७१३ जणांनी नोंदणी केली होती. तर ४६९८ जांनी परीक्षा दिली. यापैकी ४४७१ उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ९५.१७ टक्के आहे. यात २७३ विशेष प्राविण्यात व २0३३ प्रथम श्रेणीत आहेत. बारावी कला शाखेसाठी ६३२९ नोंदणी केलेल्यांपैकी ६३0७ जणांनी परीक्षा दिली.यातील ४९९४ उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ७९.१८ टक्के आहे. यात ४६६ विशेष प्राविण्यात तर २५२९ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.वाणिज्य शाखेत नोंदणी केलेल्या ८३0 पैकी ८२८ जणांनी परीक्षा दिली. ७७५ उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ९३.६0 टक्के आहे. यात १४८ विशेष प्राविण्यात तर ३९२ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाचे ३१९ पैकी २९ जण उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ८१.१९ टक्के असून यात ११ विशेष प्राविण्यात तर १५५ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.पुरवणी परीक्षेलाही हिंगोली जिल्ह्यात सर्व शाखांचे मिळून ५६२ विद्यार्थी होते.यापैकी १६२ उत्तीर्ण झाले. निकाल २८.८३ टक्के लागला आहे. यात प्रथम श्रेणीत ३१ जण उत्तीर्ण झाले आहेत.जिल्ह्यात सर्व शाखांचे मिळून विशेष प्राविण्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ८९८ एवढी असून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले ५१0९ एवढे विद्यार्थी आहेत.द्वितीय श्रेणीत ४३४३ विद्यार्थी असून काठावर उत्तीर्ण होणारे अवघे १४९ जण आहेत. यंदा काठावर उत्तीर्ण होणाऱ्यांचा टक्का घसरला आहे. तर द्वितीय व प्रथम श्रेणीत ही मुले गेल्याने यात टक्का वाढला आहे.हे वाढत्या गुणवत्तेचे लक्षण असले तरीही विशेष प्राविण्यात येणाºयांची संख्या त्या तुलनेत वाढत नसल्याचे दिसून येत आहे.तालुकानिहाय तुलना केल्यास हिंगोली तालुक्याचा सर्वाधिक ८८.३२ टक्के निकाल लागला. त्यानंतर कळमनुरी ८७.८८, सेनगाव-८७.८६, वसमत-८४.८२ व औंढा नागनाथ ८३.७५ अशी स्थिती आहे. हिंगोली तालुक्यात परीक्षा दिलेल्या १७0८ पैकी १४५७ मुले व ११५२ पैकी १0६९ मुली उत्तीर्ण झाल्या.कळमनुरीत १५२४ पैकी १२८४ मुले व १0३४ पैकी ९६४ मुली, वसमतला २१४९ पैकी १७४४ मुले व १६0२ पैकी १४१५ मुली, सेनगावात १0२७ पैकी ८९१ मुले तर ६२१ पैकी ५५७ मुली, औंढ्यात ७७१ पैकी ६२६ मुले तर ५६४ पैकी ४९२ मुली उत्त्तीर्ण झाल्या.यंदाही हिंगोली जिल्ह्यात मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. यात ७२0१ पैकी ६00२ मुले तर ४९९0 पैकी ४४९७ मुली उत्तीर्ण झाल्या. मुले ८३.६0 तर मुली ९0.४३ टक्के उत्तीर्ण झाल्या.तीन शाळांचा १00 टक्के निकालजिल्ह्यातील तीन शाळांचा १00 टक्के निकाल लागला आहे. यात उच्च माध्यमिक शाळा ढोलक्याची वाडीचा विज्ञान व कला शाखेचा १00 टक्के, सिद्धेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय हट्टा कला शाखा १00 टक्के व संत गजानन महाराज कनिष्ठ महाविद्यालय कापडसिंग कला शाखा १00 टक्के निकाल यांचा समावेश आहे. याशिवाय काही शाळांमध्ये एखाद्या किंवा दोन शाखांचा १00 टक्के निकाल लागला, छत्रपती शाहू महाराज उच्च माध्यमिक शाळा आडगाव विज्ञानचा १00 टक्के, केंब्रिज कनिष्ठ महाविद्यालय चुंचा विज्ञान १00 टक्के, बहिर्जी स्मारक महाविद्यालय वसमत वाणिज्य १00 टक्के, मॉडर्न उच्च माध्यमिक शाळा वसमत विज्ञान १00 टक्के, महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय वसमत विज्ञान १00 टक्के, सवित्रीबाई फुले कनिष्ट महाविद्यालय वाणिज्य १00 टक्के,श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय गुगुळ पिंप्री विज्ञान १00 टक्के, आप्पास्वामी कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान १00 टक्के, मानकेश्वर कनिष्ठ महाविद्यालय पानकनेरगाव विज्ञान १00 टक्के लागला आहे. मात्र याच शाळा, महाविद्यालयांत बारावीच्या इतर शाखांच्या निकालाचे प्रमाण कमी असल्याने एकंदर निकाल १00 टक्के लागू शकला नाही. विशेषत: विज्ञान शाखेचा निकाल सगळीकडेच चांगला दिसत आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीeducationशैक्षणिक