शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

तुमचे पिण्याचे पाणी किती शुद्ध?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:39 IST

हिंगोली शहरातील पाणी पुरवठा योजना नवीनच आहे. शहरात २०१४ पासून योजना कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे गळती नसल्याने दूषित पाण्याचा ...

हिंगोली शहरातील पाणी पुरवठा योजना नवीनच आहे. शहरात २०१४ पासून योजना कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे गळती नसल्याने दूषित पाण्याचा प्रश्न नाही. तरीही काही अडचण होऊ नये, यासाठी दर महिन्यात ४० पाणी नमुने तपासले जातात. शहरात ९ जलकुंभ असून मंगळवारा २, अजयनगर १, पलटन १, खटकाळी बायपास १, गारमाळ १, नेहरूनगर १, आदर्श काॅलेज २ या ठिकाणी आहेत. दररोज ११.५ एमएलडी पाणी शहरातील सर्व जलकुंभांमध्ये भरले जाते. मग या टाक्यांतून ठरावीक दिवशी ठरावीक भागात पुरवठा होतो. १६ प्रभागात ४० पाणी नमुने घेतले जातात. कधी सुरुवातीच्या भागातील तर कधी शेवटच्या भागातील असे रॅण्डम नमुने घेऊन सगळीकडील पाणी तपासले जाते. त्यात काही दाेष आढळला तर दुरुस्ती केली जाते. क्लोरिनचे पाण्यातील प्रमाणही तपासले जाते. त्यातही काही कमी-अधिक आढळल्यास त्यातही बदल केले जातात. याशिवाय जिल्हा रुग्णालयही अधूनमधून नमुने घेते. तेही तपासणी करून काही दोष आढळल्यास कळवतात.

१६ प्रभागातून घेतले जातात पाण्याचे नमुने

पाण्याचे नमुने घेण्यासाठी ठरावीक अशी ठिकाणे निश्चित नाहीत. प्रत्येक वेळी वेगळ्या भागातील नमुने घेतले जातात. आठवड्यात १० नमुने घेतले जातात. शहरात १६ प्रभाग असून त्यातील १० प्रभाग प्रत्येक वेळी नमुने घेऊन सहभागी केले जातात. नगरपालिकांना हे पाणी नमुने घेऊन दूषित पाणी पुरवठा होणार नाही, असे बंधन घालण्यात आले आहे. केंद्र शासनाला याबाबतचा अहवाल पाठविणे बंधनकारक आहे. तो जिल्हा प्रयोगशाळेचाच लागतो.

अशी हाेते तपासणी

नगरपालिकेच्या पथकाकडून सर्वप्रथम पाण्याच्या टाकीवरच नमुने घेतले जातात. आलेले पाणी किती शुद्ध आहे, हे तपासले जाते. त्यानंतर एका पाण्याच्या टाकीवरील पहिल्या टप्प्यातील, मध्यभागातील व टोकाच्या भागातील पाणी नुमने घेतले जातात.

घेतलेले पाणी नमुने जिल्हा प्रयाेगशाळेकडून तपासून घेतले जातात. न.प. शिवाय आरोग्य विभाग व खासगी यंत्रणांकडूनही अनेकदा पाण्याची तपासणी केली जाते.

नगरपालिकेकडून शहराला ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे तसेच शुद्ध पाणी पुरवठा करण्याकडे नगरपालिकेचा कटाक्ष असतो. त्यासाठी दरमहा पाणी नमुने घेऊन प्रत्येक प्रभागातील किमान दोनदा पाणी तपासणी केली जाते. दोष आढळत नाही. आढळलाच तर दुरुस्ती केली जाते.

- डाॅ. अजय कुरवाडे, मुख्याधिकारी, हिंगोली