शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

किती ही लूट; मंडईत भेंडी १० रुपये, तर घराजवळ २० रुपये किलो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:31 IST

हिंगोली : जिल्ह्यात पावसाचे प्रमाण चांगले राहिल्यामुळे पालेभाज्या भरपूर प्रमाणात पिकविल्या जात आहेत. परंतु, पालेभाजी विक्रेते मात्र वाटेल तो ...

हिंगोली : जिल्ह्यात पावसाचे प्रमाण चांगले राहिल्यामुळे पालेभाज्या भरपूर प्रमाणात पिकविल्या जात आहेत. परंतु, पालेभाजी विक्रेते मात्र वाटेल तो दर लावून ग्राहकांची लूट करीत आहेत. त्यामुळे मंडईत दर वेगळा व घराजवळ आल्यानंतर भाजीचा दर वेगळा राहत असल्याचे असे चित्र सध्या पहायला मिळत आहे.

जिल्ह्यातील औंढा नागनाथ, डिग्रस, कळमनुरी, आंबाचोंडी, जवळा बाजार, हट्टा, सवड, कनेरगाव, सेनगाव आदी गावांतील शेतकरी दोन पैसे मिळावेत म्हणून भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. परंतु, हल्ली त्यांच्या भाजीपाल्यांना मंडईत म्हणावा तेवढा भाव मिळत नाही. त्यामुळे काही शेतकरी भाजीपाल्याचे दुकान टाकून मंडईत बसत आहेत. काही व्यापारी कमी दराने भाजीपाला विकत घेत आहेत आणि नंतर चढ्याने त्याची विक्री करीत आहेत, असेही निदर्शनास आले. महागाईत काहीच परवडत नाही, असे छोट्या- मोठ्या व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

कोरोना महामारीमुळे तर शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले गेले आहे. जिल्हा प्रशासनाने व्यापारासाठी दिलेली वेळ कमी पडत आहे. त्यामुळे भाजीपाला घेतला तसाच घरी घेऊन जावा लागत आहे. त्यामुळे भाजीपाल्यांची नासाडी होत आहे, असेही मंडईतील व्यापाऱ्यांनी सांगितले.

बॉक्स

मंडईत वेगळा दर अन्‌ घराजवळ वेगळा...

सद्य:स्थितीत भाजीपाला मुबलक येत आहे. परंतु, भाज्यांच्या दरामध्ये मात्र बरीच तफावत आढळून येत आहे. कारले आरोग्याला चांगले असते म्हणून ग्राहक खरेदी करतात. मंडईत कारल्याचा दर ३० रुपये किलो असून घराजवळ विकत घेतल्यास त्याचा भाव ४० रुपये होतो. घासघीस केल्यानंतर ते ३५ रुपये किलोने देण्यास तयार होतात. दरामध्ये एवढी तफावत का आहे, असे विचाल्यास छोटे व्यापारी निरुत्तर होतात.

प्रतिक्रिया

अर्धापाव, किलोसाठी होलसेल बाजारात जाणे परवडत नाही !

कोरोना महामारीमुळे बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. अर्धापाव, किलोसाठी मंडईत जाणेही परवडत नाही. नाईलाजास्तव घराजवळ आलेल्या गाड्यावरुनच भाजी खरेदी करावी लागत आहे अन्‌ तीही वाढत्या दरानेच.

- शांताबाई थोरात, गृहिणी

दोन महिन्यांपूर्वी भाजीपाला स्वस्त मिळायचा. परंतु, आठ-दहा दिवसांपासून भाजीपाला महागच मिळत आहे. भाजीविनाच स्वयंपाक करण्याची वेळ सर्वच गृहिणींवर येवून ठेपली आहे. भाज्यांचा दर मंडईत वेगळा व घराजवळ वेगळाच आहे.

- सीमा नागरे, गृहिणी

हा बघा दरांमधील फरक (प्रति किलो दर)

भेंडी १०

२०

कारले ३०

४०

गवार ३५

४०

दोडके २५

३०

वांगे ५०

५५

आलू १५

२०

फूलकोबी २०

२५

पानकोबी १५

२०

मिरची २०

२५

चवळी २०

२५

ढोबळ मिरची २०

२५