शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

रक्त तुटवड्यामुळे रूग्णांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:55 IST

जिल्हा रूग्णालयातील रक्तपेढीत सध्या रक्त तुटवडा निर्माण झाला आहे. दिवसाकाठी जवळपास २० ते २५ गरजू रूग्णांना रक्त पिशव्यांची आवश्यकता असते. मात्र रक्त पिशव्यांच्या तुटवड्यामुळे रूग्ण व नातेवाईकांची धावपळ सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा रूग्णालयातील रक्तपेढीत सध्या रक्त तुटवडा निर्माण झाला आहे. दिवसाकाठी जवळपास २० ते २५ गरजू रूग्णांना रक्त पिशव्यांची आवश्यकता असते. मात्र रक्त पिशव्यांच्या तुटवड्यामुळे रूग्ण व नातेवाईकांची धावपळ सुरू आहे.दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यातच शाळा-महाविद्यालयांना सुट्या असून लग्नसराईमुळे रक्तदान शिबिरांचे प्रमाणही कमी झाले आहे. परिणामी, जिल्हा रूग्णालयातील रक्तपेढीत रक्त पिशव्यांची कमतरता भासत आहे. शिवाय शासकीय रक्तपेढीतून खासगी रूग्णालयातील रूग्णांसाठीही टोल क्रमांक १०४ द्वारे रक्तपिशव्यांचा पुरठा केला जातो. २०१७ मध्ये टोल फ्री क्रमांक १०४ वरून आलेल्या रूग्णांना विविध गटाच्या ८१६ रक्त पिशव्यांचा पुरवठा करण्यात आला. तसेच जानेवारी २०१८ मध्ये ४४ बॅग, फेबु्रवारीत ९२, मार्चमध्ये ६७ आणि एप्रिलमध्ये ६५ रक्त रक्त बॅगचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. रक्त पिशव्यांची मागणी जास्त अन् रक्तसाठा मोजका यामुळे रक्त तुटवडा निर्माण झाला आहे. ऐनवेळी गरजू रूग्णास जर रक्त दिले नाही, तर रूग्णांची प्रकृती अधिक खालावण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी रूग्ण दगावण्याचीही शक्यता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.जिल्हा सामान्य रूग्णायातील रक्तपेढीत सध्या ए पॉझिटीव्हच्या २ बॅग उपलब्ध आहेत. तसेच ए-निगेटीव्हच्या २, बी-पॉझिटीव्ह १६ बॅग, बी-निगेटीव्हच्या ४, एबी-पॉझिटीव्ह २, एबी-निगेटीव्ह केवळ १ ओ-पॉझिटीव्ह ११, ओ -निगेटीव्हच्या ६ अशा एकूण ४४ बॅगा जिल्हा रूग्णालयातील रक्तपेढीतउपलब्ध असल्याची माहिती जिल्हा रूग्णालयाततर्फे देण्यात आली. जास्तीत जास्त सामाजिक संघटना तसेच युवकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन डॉ. स्वाती गुंडेवार यांनी केले आहे. रक्तपेढीतील १४ जणांची टीम यासाठी कार्यरत आहे.जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीतून खासगी रूग्णालयात उपचार घेणाऱ्यांनाही रक्त पुरवठा होतो. शासकीय रक्तपेढीपासून ४० किमी अंतरावरावरील खासगी रूग्णालयातील रूग्णांसाठी रक्त पुरवठा केला जातो.

टॅग्स :HingoliहिंगोलीHealthआरोग्य