शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

होम क्वारंटाईनची मुभा नसून हिंगोली डेंजर झोनमध्ये !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:31 IST

जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात २८०० खाटांची तयारी केली होती. एकाच वेळी एवढे रुग्ण शासकीय यंत्रणांमध्ये ठेवता येतात. तर यापैकी ६४० ...

जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात २८०० खाटांची तयारी केली होती. एकाच वेळी एवढे रुग्ण शासकीय यंत्रणांमध्ये ठेवता येतात. तर यापैकी ६४० हे आक्सिजन बेड आहेत. शिवाय नंतर ऑक्सिजन बेड व साध्या बेडची संख्या वाढविण्याचे नियोजन केले असतानाच दुसरी लाट ओसरत आहे. शिवाय खाजगी रुग्णालयांमध्येही जवळपास ७०० बेड आहेत. तर एकाच वेळी सक्रिय रुग्ण साडेतेराशे ते चौदाशेच्या दरम्यानच होते. त्यामुळे केलेल्या नियोजनाच्या ५० टक्केच यंत्रणा वापरली गेली. मात्र जवळपास चाळीस टक्के रुग्ण अत्यावस्थ होत होते. शिवाय त्यांचा रुग्णालयात थांबण्याचा काळही २० ते २५ दिवसांचा राहात असल्याने जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. तर या काळात जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट तब्बल ३३ टक्क्यांच्या आसपास गेला होता. तो हळूहळू आता १२ टक्क्यांपर्यंत खाली उतरलेला आहे.

हिंगोली जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यात आरटीपीसीआर व अँटिजन मिळून ७२६३ चाचण्या झाल्या होत्या. तर ३६९ जण बाधित आढळले. पॉझिटिव्हिटी रेट ५.०८ टक्के एवढा होता. तर ४ मृत्यू झाल्याने मृत्यूदर १.०८ टक्के होता. मार्च महिन्यात चाचण्या वाढल्या. २९ हजार ८०७ चाचण्या केल्यानंतर तब्बल २४५२ रुग्ण समोर आले होते. तर पॉझिटिव्हिटी रेट ८.२२ टक्के होता. तर ३० मृत्यू झाल्याने मृत्यूदर १.२२ टक्के होता.

एप्रिलमध्ये चित्रच पालटले. १० एप्रिलपर्यंतच केलेल्या १० हजार ४१५ असताना रुग्ण १७२७ आढळले होते. त्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट १७ टक्क्यांवर गेला होता. तर या काळात २४ मृत्यू झाले. त्यामुळे मृत्यूदर १.३९ टक्क्यांवर पोहोचला होता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तर पॉझिटिव्हिटी दर ३३ टक्क्यांवर पोहोचला होता. त्यातच मृत्यूदरही दीड टक्क्यांच्या पुढे सरकला. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे चित्र कायम होते. त्यानंतर चित्र बदलले आहे. मागील आठ ते दहा दिवसांत पुन्हा पॉझिटिव्हिटी दर दहा ते बारा टक्क्यांवर आल्याचे दिसत आहे. मात्र तरीही शासनाच्या गंभीर परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांच्या यादीत हिंगोली जिल्हा आला. येथे होम क्वारंटाईनऐवजी संस्थात्मक विलगीकरणास सक्तीचे आदेश दिले. मात्र हिंगोलीत कधीच गृहविलगीकरणाची मुभा नव्हती.

नातेवाईकांचे विलगीकरण गुलदस्त्यात

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात ज्या घरात रुग्ण आढळले, त्या कुटुंबातील सर्वांना व संपर्कातील लोकांनाही विलगीकरण केंद्रात पाठवले जात होते. आता ही पद्धतच बंद झाली. मात्र त्यासाठी हिंगोलीत कस्तुरबा गांधी बालिका निवासी विद्यालय व इतर ठिकाणीही शाळांमध्ये सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून सुरू होते. तहसील व न.प.कडून पाहणीही झाली होती. नंतर प्रस्ताव थंड बस्त्यात गेला.