शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
2
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
3
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
4
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
5
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
6
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
7
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
8
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
9
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
10
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
11
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
12
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
13
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
14
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
15
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
16
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
17
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
18
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
19
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
20
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीकरांनो आता जप्त केलेले साहित्यही मागू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:22 IST

पालिकेच्या वतीने एकदा नव्हे, तर दोनदा शहरातील अतिक्रमण हटविले आहे. एवढे करुनही जर आता नगर पालिकेच्या जागेत अतिक्रमण करणाऱ्यांचे साहित्य जप्त केली जाणार असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. तर जप्त केलेले साहित्यही अजिबात दिले जाणार नसल्याचे पालिकेतर्फे सांगितले आहे. यासाठी स्वतंत्र पथकही तयार केले आहे.

ठळक मुद्देअतिक्रमण हटवलेल्या जागेवर करणार वृक्ष लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पालिकेच्या वतीने एकदा नव्हे, तर दोनदा शहरातील अतिक्रमण हटविले आहे. एवढे करुनही जर आता नगर पालिकेच्या जागेत अतिक्रमण करणाऱ्यांचे साहित्य जप्त केली जाणार असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. तर जप्त केलेले साहित्यही अजिबात दिले जाणार नसल्याचे पालिकेतर्फे सांगितले आहे. यासाठी स्वतंत्र पथकही तयार केले आहे.पालिकेने शहराच्या विकासावर भर दिला असून, स्वच्छतेकडे कटाक्षाने लक्ष दिले आहे. शिवाय मोकळ्या जागेचा वापर वृक्षलागवडीसाठी केला जात असून, शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्याचा मानस आहे. त्यामुळे पालिकने शहरातील अतिक्रमणाकडे मोर्चा वळविला आहे. तसा तो यापूर्वीही वळविण्यात आला होता. मात्र पालिकेने जरा लक्ष कमी केल्याचा फायदा घेत पुन्हा त्या- त्या जागेमध्ये अतिक्रमण वाढविले होते. त्यानुसार ९ जानेवारी रोजी पुन्हा पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्यात आले असून, पुन्हा होणारे अतिक्रमण कामयचे हटविण्यासाठी मुंजा बांगर यांचे पथक स्वतंत्र पथक तयार केले आहे.आता हे पथक अतिक्रमणधारकांनी केलेले अतिक्रमण काढून ते साहित्य जप्त करणार आहे. तसेच संबंधित अतिक्रमणधारकांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असून, जप्त केलेले वापस केले जाणार नाही. संबंधितांनी ते न मागण्याचेही आवाहन पालिकेच्या वतीने केले आहे. तर अतिक्रमण हटविलेल्या जागेचा वापर ‘फूटपाथ’ साठी करत तेथे वृक्षलागवडही केली जाणार आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यामध्ये कमालीची भर पडणार आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांनी त्या ठिकाणी अतिक्रमण न करता पालिकेना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

कोणाची खैर नाही: अतिक्रमणावर नजरशहरातील अतिक्रण करणाऱ्यांना अनेकदा सूचना दिल्या आहेत. एवढेच काय तर त्यांना समजावून सांगून काही फरक पडत नसल्याने शहराच्या सौंदर्यासाठी साहित्य जप्तीचे टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे अतिक्रमणात कोणाचीही गय केली जाणार नसून, पालिका शहराच्या सौंदर्यासाठी वाटेल ते करण्यास तयार आहे. तसेच नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण आणि सीओ रामदास पाटील यांच्यासह नगरसेवकही स्वत:हून शहराच्या विकासासाठी रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत.