शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

हिंगोलीकरांनो आता जप्त केलेले साहित्यही मागू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:22 IST

पालिकेच्या वतीने एकदा नव्हे, तर दोनदा शहरातील अतिक्रमण हटविले आहे. एवढे करुनही जर आता नगर पालिकेच्या जागेत अतिक्रमण करणाऱ्यांचे साहित्य जप्त केली जाणार असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. तर जप्त केलेले साहित्यही अजिबात दिले जाणार नसल्याचे पालिकेतर्फे सांगितले आहे. यासाठी स्वतंत्र पथकही तयार केले आहे.

ठळक मुद्देअतिक्रमण हटवलेल्या जागेवर करणार वृक्ष लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पालिकेच्या वतीने एकदा नव्हे, तर दोनदा शहरातील अतिक्रमण हटविले आहे. एवढे करुनही जर आता नगर पालिकेच्या जागेत अतिक्रमण करणाऱ्यांचे साहित्य जप्त केली जाणार असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. तर जप्त केलेले साहित्यही अजिबात दिले जाणार नसल्याचे पालिकेतर्फे सांगितले आहे. यासाठी स्वतंत्र पथकही तयार केले आहे.पालिकेने शहराच्या विकासावर भर दिला असून, स्वच्छतेकडे कटाक्षाने लक्ष दिले आहे. शिवाय मोकळ्या जागेचा वापर वृक्षलागवडीसाठी केला जात असून, शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्याचा मानस आहे. त्यामुळे पालिकने शहरातील अतिक्रमणाकडे मोर्चा वळविला आहे. तसा तो यापूर्वीही वळविण्यात आला होता. मात्र पालिकेने जरा लक्ष कमी केल्याचा फायदा घेत पुन्हा त्या- त्या जागेमध्ये अतिक्रमण वाढविले होते. त्यानुसार ९ जानेवारी रोजी पुन्हा पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्यात आले असून, पुन्हा होणारे अतिक्रमण कामयचे हटविण्यासाठी मुंजा बांगर यांचे पथक स्वतंत्र पथक तयार केले आहे.आता हे पथक अतिक्रमणधारकांनी केलेले अतिक्रमण काढून ते साहित्य जप्त करणार आहे. तसेच संबंधित अतिक्रमणधारकांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असून, जप्त केलेले वापस केले जाणार नाही. संबंधितांनी ते न मागण्याचेही आवाहन पालिकेच्या वतीने केले आहे. तर अतिक्रमण हटविलेल्या जागेचा वापर ‘फूटपाथ’ साठी करत तेथे वृक्षलागवडही केली जाणार आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यामध्ये कमालीची भर पडणार आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांनी त्या ठिकाणी अतिक्रमण न करता पालिकेना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

कोणाची खैर नाही: अतिक्रमणावर नजरशहरातील अतिक्रण करणाऱ्यांना अनेकदा सूचना दिल्या आहेत. एवढेच काय तर त्यांना समजावून सांगून काही फरक पडत नसल्याने शहराच्या सौंदर्यासाठी साहित्य जप्तीचे टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे अतिक्रमणात कोणाचीही गय केली जाणार नसून, पालिका शहराच्या सौंदर्यासाठी वाटेल ते करण्यास तयार आहे. तसेच नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण आणि सीओ रामदास पाटील यांच्यासह नगरसेवकही स्वत:हून शहराच्या विकासासाठी रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत.