शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

हिंगोलीकरांनो आता जप्त केलेले साहित्यही मागू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:22 IST

पालिकेच्या वतीने एकदा नव्हे, तर दोनदा शहरातील अतिक्रमण हटविले आहे. एवढे करुनही जर आता नगर पालिकेच्या जागेत अतिक्रमण करणाऱ्यांचे साहित्य जप्त केली जाणार असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. तर जप्त केलेले साहित्यही अजिबात दिले जाणार नसल्याचे पालिकेतर्फे सांगितले आहे. यासाठी स्वतंत्र पथकही तयार केले आहे.

ठळक मुद्देअतिक्रमण हटवलेल्या जागेवर करणार वृक्ष लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पालिकेच्या वतीने एकदा नव्हे, तर दोनदा शहरातील अतिक्रमण हटविले आहे. एवढे करुनही जर आता नगर पालिकेच्या जागेत अतिक्रमण करणाऱ्यांचे साहित्य जप्त केली जाणार असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. तर जप्त केलेले साहित्यही अजिबात दिले जाणार नसल्याचे पालिकेतर्फे सांगितले आहे. यासाठी स्वतंत्र पथकही तयार केले आहे.पालिकेने शहराच्या विकासावर भर दिला असून, स्वच्छतेकडे कटाक्षाने लक्ष दिले आहे. शिवाय मोकळ्या जागेचा वापर वृक्षलागवडीसाठी केला जात असून, शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्याचा मानस आहे. त्यामुळे पालिकने शहरातील अतिक्रमणाकडे मोर्चा वळविला आहे. तसा तो यापूर्वीही वळविण्यात आला होता. मात्र पालिकेने जरा लक्ष कमी केल्याचा फायदा घेत पुन्हा त्या- त्या जागेमध्ये अतिक्रमण वाढविले होते. त्यानुसार ९ जानेवारी रोजी पुन्हा पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्यात आले असून, पुन्हा होणारे अतिक्रमण कामयचे हटविण्यासाठी मुंजा बांगर यांचे पथक स्वतंत्र पथक तयार केले आहे.आता हे पथक अतिक्रमणधारकांनी केलेले अतिक्रमण काढून ते साहित्य जप्त करणार आहे. तसेच संबंधित अतिक्रमणधारकांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असून, जप्त केलेले वापस केले जाणार नाही. संबंधितांनी ते न मागण्याचेही आवाहन पालिकेच्या वतीने केले आहे. तर अतिक्रमण हटविलेल्या जागेचा वापर ‘फूटपाथ’ साठी करत तेथे वृक्षलागवडही केली जाणार आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यामध्ये कमालीची भर पडणार आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांनी त्या ठिकाणी अतिक्रमण न करता पालिकेना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

कोणाची खैर नाही: अतिक्रमणावर नजरशहरातील अतिक्रण करणाऱ्यांना अनेकदा सूचना दिल्या आहेत. एवढेच काय तर त्यांना समजावून सांगून काही फरक पडत नसल्याने शहराच्या सौंदर्यासाठी साहित्य जप्तीचे टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे अतिक्रमणात कोणाचीही गय केली जाणार नसून, पालिका शहराच्या सौंदर्यासाठी वाटेल ते करण्यास तयार आहे. तसेच नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण आणि सीओ रामदास पाटील यांच्यासह नगरसेवकही स्वत:हून शहराच्या विकासासाठी रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत.