शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

हिंगोली जिल्हा परिषदेला रिक्त पदांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:31 IST

नेहमीच कोणत्याही कामात सक्रिय असलेल्या जिल्हा परिषदेला मागील काही महिन्यांपासून रिक्त पदाचे ग्रहण लागल्याने प्रभारीवरच कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे स्वत:चा पदभार सांभाळत प्रभारी पदाचाही काभार पाहता - पाहता अधिका-यांच्या नाकी नऊ येत आहेत. सध्यास्थितीत ८ विभागातील पदे रिक्त आहेत.

ठळक मुद्देप्रभारीराजमुळे वाढतोय कामाचा ताण

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नेहमीच कोणत्याही कामात सक्रिय असलेल्या जिल्हा परिषदेला मागील काही महिन्यांपासून रिक्त पदाचे ग्रहण लागल्याने प्रभारीवरच कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे स्वत:चा पदभार सांभाळत प्रभारी पदाचाही काभार पाहता - पाहता अधिका-यांच्या नाकी नऊ येत आहेत. सध्यास्थितीत ८ विभागातील पदे रिक्त आहेत.जि.प.त एकूण १५ पैकी ८ विभागात प्रमुख अधिकाºयांचेच पद रिक्त असल्याने प्रभारी अधिका-यांवर सोपविला आहे. त्यामुळे संबंधित अधिका-यावर कामाचा ताण वाढत चालला आहे. त्यातच अधून मधून सुरु असलेल्या बैठकीने तर प्रभारी अधिका-यांसह कार्यालयातील कर्मचारीही व्यस्त राहतात. त्यामुळे इतर शासकीय कामे रेंगाळत असल्याचे चित्र आहे. आजघडीला ८ विभागाचा पदभार प्रभारीवर आहे. यामध्ये अतिरिक्त्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एम. देशमुख यांच्याकडे जिल्हा ग्रामणीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालकपद , सामान्यचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले यांच्याकडे पाणी पुरवठा व स्वच्छताचा अतिरिक्त पदभार आहे. तर हिंगोली तालुक्याचे गणेश वाघ यांच्याकडे महिला व बालकल्याणचा उपमुकाअ पदाचा पदभार आहे, उपशिक्षणाधिकारी डी. के. इंगोेले यांच्याकडे प्राथमिक शिक्षणाधिकारी, क्षयरोग अधिकारी डॉ. राहुल गिते यांच्याकडे जिल्हा आरोग्य अधिकारी, सहायक समाज कल्याण आयुक्त कार्यालयामधील गीता गुठ्ठे यांच्याकडे समाजकल्याण अधिकारी, ग्रामीण पाठीपुरवठा विभागाचे कळमनुरीचे उपअभियंता सोमनाथ भागानगरे यांच्याकडे कार्यकारी अभियंता, सेनगावावत सहायक बीडीओ बी. जी. पंडित यांच्याकडेच बीडीओचा पदभार आहे. औंढ्याचे बीडीओ डॉ. सुधिर ठोंबरे यांना वसमतचा अतिरिक्त कारभार दिला आहे. त्यांना आपले मूळ कामकाज सांभाळत सांभाळत पदभार असलेल्या कार्यालयाचे कामकाज सांभाळावे लागत असल्याने ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ या म्हणीचा प्रत्यय येत आहे.शासन उदासीन : वारंवार पाठपुरावाजि.प.ला लागलेले रिक्त पदांचे ग्रहण हटायला तयार नाही. याबाबत शासनास अनेकदा अहवाल पाठवूनही काहीच उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. जि.प.तील रिक्त पदे भरण्यासाठी शासन तर उदासीन आहे. शिवाय पुढारीही लक्ष देत नाहीत. त्यामुळे येथील प्रभारी अधिकारी कार्यालयाचे कामकाज आटोपता आटोपता स्त:हून भांबावून गेल्यागत झाले आहेत. एवढी नामांकित जिल्हा परिषदेचे जर रिक्त पदे भरली जात नसतील तर इतर विभागाची परिस्थती विचारण्याची गरजच नाही. तेथे तर अधिका-यांची वानवा आहे.