शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

हिंगोली जिल्हा परिषदेला रिक्त पदांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:31 IST

नेहमीच कोणत्याही कामात सक्रिय असलेल्या जिल्हा परिषदेला मागील काही महिन्यांपासून रिक्त पदाचे ग्रहण लागल्याने प्रभारीवरच कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे स्वत:चा पदभार सांभाळत प्रभारी पदाचाही काभार पाहता - पाहता अधिका-यांच्या नाकी नऊ येत आहेत. सध्यास्थितीत ८ विभागातील पदे रिक्त आहेत.

ठळक मुद्देप्रभारीराजमुळे वाढतोय कामाचा ताण

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नेहमीच कोणत्याही कामात सक्रिय असलेल्या जिल्हा परिषदेला मागील काही महिन्यांपासून रिक्त पदाचे ग्रहण लागल्याने प्रभारीवरच कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे स्वत:चा पदभार सांभाळत प्रभारी पदाचाही काभार पाहता - पाहता अधिका-यांच्या नाकी नऊ येत आहेत. सध्यास्थितीत ८ विभागातील पदे रिक्त आहेत.जि.प.त एकूण १५ पैकी ८ विभागात प्रमुख अधिकाºयांचेच पद रिक्त असल्याने प्रभारी अधिका-यांवर सोपविला आहे. त्यामुळे संबंधित अधिका-यावर कामाचा ताण वाढत चालला आहे. त्यातच अधून मधून सुरु असलेल्या बैठकीने तर प्रभारी अधिका-यांसह कार्यालयातील कर्मचारीही व्यस्त राहतात. त्यामुळे इतर शासकीय कामे रेंगाळत असल्याचे चित्र आहे. आजघडीला ८ विभागाचा पदभार प्रभारीवर आहे. यामध्ये अतिरिक्त्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एम. देशमुख यांच्याकडे जिल्हा ग्रामणीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालकपद , सामान्यचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले यांच्याकडे पाणी पुरवठा व स्वच्छताचा अतिरिक्त पदभार आहे. तर हिंगोली तालुक्याचे गणेश वाघ यांच्याकडे महिला व बालकल्याणचा उपमुकाअ पदाचा पदभार आहे, उपशिक्षणाधिकारी डी. के. इंगोेले यांच्याकडे प्राथमिक शिक्षणाधिकारी, क्षयरोग अधिकारी डॉ. राहुल गिते यांच्याकडे जिल्हा आरोग्य अधिकारी, सहायक समाज कल्याण आयुक्त कार्यालयामधील गीता गुठ्ठे यांच्याकडे समाजकल्याण अधिकारी, ग्रामीण पाठीपुरवठा विभागाचे कळमनुरीचे उपअभियंता सोमनाथ भागानगरे यांच्याकडे कार्यकारी अभियंता, सेनगावावत सहायक बीडीओ बी. जी. पंडित यांच्याकडेच बीडीओचा पदभार आहे. औंढ्याचे बीडीओ डॉ. सुधिर ठोंबरे यांना वसमतचा अतिरिक्त कारभार दिला आहे. त्यांना आपले मूळ कामकाज सांभाळत सांभाळत पदभार असलेल्या कार्यालयाचे कामकाज सांभाळावे लागत असल्याने ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ या म्हणीचा प्रत्यय येत आहे.शासन उदासीन : वारंवार पाठपुरावाजि.प.ला लागलेले रिक्त पदांचे ग्रहण हटायला तयार नाही. याबाबत शासनास अनेकदा अहवाल पाठवूनही काहीच उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. जि.प.तील रिक्त पदे भरण्यासाठी शासन तर उदासीन आहे. शिवाय पुढारीही लक्ष देत नाहीत. त्यामुळे येथील प्रभारी अधिकारी कार्यालयाचे कामकाज आटोपता आटोपता स्त:हून भांबावून गेल्यागत झाले आहेत. एवढी नामांकित जिल्हा परिषदेचे जर रिक्त पदे भरली जात नसतील तर इतर विभागाची परिस्थती विचारण्याची गरजच नाही. तेथे तर अधिका-यांची वानवा आहे.