शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
4
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
7
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
8
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
9
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
10
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
11
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
12
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
13
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
14
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
15
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
16
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
17
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
18
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
19
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
20
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्हा परिषदेला रिक्त पदांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:31 IST

नेहमीच कोणत्याही कामात सक्रिय असलेल्या जिल्हा परिषदेला मागील काही महिन्यांपासून रिक्त पदाचे ग्रहण लागल्याने प्रभारीवरच कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे स्वत:चा पदभार सांभाळत प्रभारी पदाचाही काभार पाहता - पाहता अधिका-यांच्या नाकी नऊ येत आहेत. सध्यास्थितीत ८ विभागातील पदे रिक्त आहेत.

ठळक मुद्देप्रभारीराजमुळे वाढतोय कामाचा ताण

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नेहमीच कोणत्याही कामात सक्रिय असलेल्या जिल्हा परिषदेला मागील काही महिन्यांपासून रिक्त पदाचे ग्रहण लागल्याने प्रभारीवरच कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे स्वत:चा पदभार सांभाळत प्रभारी पदाचाही काभार पाहता - पाहता अधिका-यांच्या नाकी नऊ येत आहेत. सध्यास्थितीत ८ विभागातील पदे रिक्त आहेत.जि.प.त एकूण १५ पैकी ८ विभागात प्रमुख अधिकाºयांचेच पद रिक्त असल्याने प्रभारी अधिका-यांवर सोपविला आहे. त्यामुळे संबंधित अधिका-यावर कामाचा ताण वाढत चालला आहे. त्यातच अधून मधून सुरु असलेल्या बैठकीने तर प्रभारी अधिका-यांसह कार्यालयातील कर्मचारीही व्यस्त राहतात. त्यामुळे इतर शासकीय कामे रेंगाळत असल्याचे चित्र आहे. आजघडीला ८ विभागाचा पदभार प्रभारीवर आहे. यामध्ये अतिरिक्त्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एम. देशमुख यांच्याकडे जिल्हा ग्रामणीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालकपद , सामान्यचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले यांच्याकडे पाणी पुरवठा व स्वच्छताचा अतिरिक्त पदभार आहे. तर हिंगोली तालुक्याचे गणेश वाघ यांच्याकडे महिला व बालकल्याणचा उपमुकाअ पदाचा पदभार आहे, उपशिक्षणाधिकारी डी. के. इंगोेले यांच्याकडे प्राथमिक शिक्षणाधिकारी, क्षयरोग अधिकारी डॉ. राहुल गिते यांच्याकडे जिल्हा आरोग्य अधिकारी, सहायक समाज कल्याण आयुक्त कार्यालयामधील गीता गुठ्ठे यांच्याकडे समाजकल्याण अधिकारी, ग्रामीण पाठीपुरवठा विभागाचे कळमनुरीचे उपअभियंता सोमनाथ भागानगरे यांच्याकडे कार्यकारी अभियंता, सेनगावावत सहायक बीडीओ बी. जी. पंडित यांच्याकडेच बीडीओचा पदभार आहे. औंढ्याचे बीडीओ डॉ. सुधिर ठोंबरे यांना वसमतचा अतिरिक्त कारभार दिला आहे. त्यांना आपले मूळ कामकाज सांभाळत सांभाळत पदभार असलेल्या कार्यालयाचे कामकाज सांभाळावे लागत असल्याने ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ या म्हणीचा प्रत्यय येत आहे.शासन उदासीन : वारंवार पाठपुरावाजि.प.ला लागलेले रिक्त पदांचे ग्रहण हटायला तयार नाही. याबाबत शासनास अनेकदा अहवाल पाठवूनही काहीच उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. जि.प.तील रिक्त पदे भरण्यासाठी शासन तर उदासीन आहे. शिवाय पुढारीही लक्ष देत नाहीत. त्यामुळे येथील प्रभारी अधिकारी कार्यालयाचे कामकाज आटोपता आटोपता स्त:हून भांबावून गेल्यागत झाले आहेत. एवढी नामांकित जिल्हा परिषदेचे जर रिक्त पदे भरली जात नसतील तर इतर विभागाची परिस्थती विचारण्याची गरजच नाही. तेथे तर अधिका-यांची वानवा आहे.