शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
3
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
4
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
5
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
6
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
7
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
8
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
9
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
10
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
11
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
12
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
13
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
14
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
15
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
16
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
17
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
18
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
19
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! पेन्शन, पीएफ आणि ईपीएसच्या नियमांमध्ये मोठे बदल
20
सूरज चव्हाणचं प्री-वेडिंग फोटोशूट; होणाऱ्या पत्नीसोबत वेस्टर्न लूकमध्ये दिल्या रोमँटिक पोझ
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीहून नांदेडला रुग्ण पाठविण्याचा सपाटा सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 23:59 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे मोठ्या विश्वासाने बघितले जाते. त्यामुळेच या ठिकाणी उपचारासाठी येणा-यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. परंतु रुग्णालयात डॉक्टरांच्या अभावासह सेवा बजावणारे खाजगी डॉक्टर आपल्याच रुग्णालयात जास्त लक्ष घालत असल्याने आणि उपचारासाठी सुविधाच नसल्याने रुग्णालयातून अन्यत्र पाठविण्याचा सपाटा लावला आहे. एका वर्षात तब्बल २ हजार २४ रुग्णांना अन्यत्र रेफर केल्याची आकडेवारी रुग्णालयातून मिळाली आहे.

ठळक मुद्देसामान्य रुग्णालयातील धक्कादायक चित्रटोलेजंग इमारतीत सुविधांसह डॉक्टरांचा अभाव

संतोष भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे मोठ्या विश्वासाने बघितले जाते. त्यामुळेच या ठिकाणी उपचारासाठी येणा-यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. परंतु रुग्णालयात डॉक्टरांच्या अभावासह सेवा बजावणारे खाजगी डॉक्टर आपल्याच रुग्णालयात जास्त लक्ष घालत असल्याने आणि उपचारासाठी सुविधाच नसल्याने रुग्णालयातून अन्यत्र पाठविण्याचा सपाटा लावला आहे. एका वर्षात तब्बल २ हजार २४ रुग्णांना अन्यत्र रेफर केल्याची आकडेवारी रुग्णालयातून मिळाली आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयाची दुरुनच टोलेजंग इमारत पाहून रुग्णालयात सर्वच सुविधा असतील, असे वाटते. परंतु दुरुनच डोंगर चांगला म्हणण्याची वेळ आली आहे. आत प्रवेश केल्यानंतर अनुभव येतो तो येथील परिस्थितीचा. या ठिकाणी रुग्णांवर उपचारच होत नसल्याची ओरड नेहमीचीच आहे. परंतु त्याततही भयंकर बाब म्हणजे जराही रुग्ण गंभीर वाटला तर थेट त्या रुग्णांना नांदेडचा मार्ग दाखविला जातो. एवढेच काय तर येथे दिवस रात्री राबत असलेले खाजगी डॉक्टर रुग्णांच्या नातेवाईकांना येथील स्थिती सांगून रुग्ण पुढील उपचारासाठी हलविण्यासंदर्भात उत्कृष्टरीत्या मार्गदर्शन करुन डोक्यावरील ओझे कमी करुन घेतात. या ठिकाणी वचक बसण्यायोग्य अधिकारी नसल्याने की काय डॉक्टरांची मानसिकता बदलण्याचे नावच घेत नाही. एखांदा रुग्ण येथे उपचारासाठी दाखल झाल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्याचे सोडून त्याच्या चौकशीतच वेळ घालवला जातो. त्यामुळे बरेच रुग्ण या ठिकाणी उपचार घेण्याचे टाळतात.२०० खाटांची अनेक दिवसांपासून तयारी सुरू असली तरीही प्रत्यक्षात १०० खाटावरच काम भागविले जात आहे. इमारतीचे काम सुरु असल्याने ते अजूनही अंतिम टप्प्यात नाही. येथे रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णांना जमिनीवर उपचार घेण्यावाचून पर्यायच नाही. त्यातच या ठिकाणी अतिदक्षता विभाग व शस्त्रक्रियासाठी डॉक्टरच नसल्याने रुग्णांना अन्यत्र हलविण्यास सांगितले जाते. याचा आर्थिक फटका रुग्णांना बसत आहे.स्टाफसाठी शौचालय नाहीया ठिकाणी स्टाफसाठी शौचालयाची व्यवस्थाच नसल्याने त्यांना उघड्यावर जाण्याची वेळ येत आहे. परिणामी, त्यांचे आरोग्य धोक्यात येत असून, रात्री अपरात्री गंभीर प्रश्न निर्माण होतो. मध्यंतरी हा प्रश्न सुटला होता. तो पुन्हा सुरु झाला आहे.रुग्णालयात या सुविधांची नितांत गरजरुग्णालयामध्ये एखांदा हाडाचा रुग्ण दाखल कारायचा असल्यास त्याला निदान एक ते दोन महिन्याचा कालावधी लागू शकतो. परंतु येथे एका - एका वार्डात फक्त ३० ते ३५ खाटा असल्याने त्याला येथे दाखल ठेवणे शक्य नसते. दिवसाकाठी एका- एका वार्डात १०० च्या वर रुग्ण दाखल होतात त्यामुळे मोठी पंचायत निर्माण होते. तसेच या ठिकाणी अतिदक्षता विभागच नसल्याने अपघातातील रुग्ण शक्यतोर सुविधा असलेल्या ठिकाणी रेफर केले जातात. याचबरोबर येथे शस्त्रक्रियासाठी डॉक्टरच नसल्यानेही त्या रुग्णांना नांदेड येथे रेफर करण्याची वेळ येते. सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी अजून किती वर्षांचा कालावधी लागेल? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.औषधींचा तुटवडारुग्णालयात औषधीचा तुटवडा हे काय नवीन नाही. या प्रकाराला अनेक महिन्यांपासून रुग्ण तोंड देत आहेत. एवढेच काय तर काही महिन्यांपूर्वी औषधी नसल्याचे लिहूनच ठेवले होते. तर कधी- कधी परिचारिकांना स्वखर्चातून औषधी आणावी लागते.