शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
3
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
4
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
5
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
6
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
7
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
8
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
9
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
10
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
11
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
12
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
13
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
14
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार
15
"माझ्यासाठीच नाही, तर १४० कोटी भारतीयांसाठीही..."; ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
16
अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न
17
Kangana Ranaut : "लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल
18
पुणे : बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश
19
Video - संतापजनक! राजस्थानमध्ये उद्घाटनापूर्वीच वाहून गेला नवा रस्ता; पावसाने केली पोलखोल
20
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात

हिंगोलीहून नांदेडला रुग्ण पाठविण्याचा सपाटा सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 23:59 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे मोठ्या विश्वासाने बघितले जाते. त्यामुळेच या ठिकाणी उपचारासाठी येणा-यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. परंतु रुग्णालयात डॉक्टरांच्या अभावासह सेवा बजावणारे खाजगी डॉक्टर आपल्याच रुग्णालयात जास्त लक्ष घालत असल्याने आणि उपचारासाठी सुविधाच नसल्याने रुग्णालयातून अन्यत्र पाठविण्याचा सपाटा लावला आहे. एका वर्षात तब्बल २ हजार २४ रुग्णांना अन्यत्र रेफर केल्याची आकडेवारी रुग्णालयातून मिळाली आहे.

ठळक मुद्देसामान्य रुग्णालयातील धक्कादायक चित्रटोलेजंग इमारतीत सुविधांसह डॉक्टरांचा अभाव

संतोष भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे मोठ्या विश्वासाने बघितले जाते. त्यामुळेच या ठिकाणी उपचारासाठी येणा-यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. परंतु रुग्णालयात डॉक्टरांच्या अभावासह सेवा बजावणारे खाजगी डॉक्टर आपल्याच रुग्णालयात जास्त लक्ष घालत असल्याने आणि उपचारासाठी सुविधाच नसल्याने रुग्णालयातून अन्यत्र पाठविण्याचा सपाटा लावला आहे. एका वर्षात तब्बल २ हजार २४ रुग्णांना अन्यत्र रेफर केल्याची आकडेवारी रुग्णालयातून मिळाली आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयाची दुरुनच टोलेजंग इमारत पाहून रुग्णालयात सर्वच सुविधा असतील, असे वाटते. परंतु दुरुनच डोंगर चांगला म्हणण्याची वेळ आली आहे. आत प्रवेश केल्यानंतर अनुभव येतो तो येथील परिस्थितीचा. या ठिकाणी रुग्णांवर उपचारच होत नसल्याची ओरड नेहमीचीच आहे. परंतु त्याततही भयंकर बाब म्हणजे जराही रुग्ण गंभीर वाटला तर थेट त्या रुग्णांना नांदेडचा मार्ग दाखविला जातो. एवढेच काय तर येथे दिवस रात्री राबत असलेले खाजगी डॉक्टर रुग्णांच्या नातेवाईकांना येथील स्थिती सांगून रुग्ण पुढील उपचारासाठी हलविण्यासंदर्भात उत्कृष्टरीत्या मार्गदर्शन करुन डोक्यावरील ओझे कमी करुन घेतात. या ठिकाणी वचक बसण्यायोग्य अधिकारी नसल्याने की काय डॉक्टरांची मानसिकता बदलण्याचे नावच घेत नाही. एखांदा रुग्ण येथे उपचारासाठी दाखल झाल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्याचे सोडून त्याच्या चौकशीतच वेळ घालवला जातो. त्यामुळे बरेच रुग्ण या ठिकाणी उपचार घेण्याचे टाळतात.२०० खाटांची अनेक दिवसांपासून तयारी सुरू असली तरीही प्रत्यक्षात १०० खाटावरच काम भागविले जात आहे. इमारतीचे काम सुरु असल्याने ते अजूनही अंतिम टप्प्यात नाही. येथे रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णांना जमिनीवर उपचार घेण्यावाचून पर्यायच नाही. त्यातच या ठिकाणी अतिदक्षता विभाग व शस्त्रक्रियासाठी डॉक्टरच नसल्याने रुग्णांना अन्यत्र हलविण्यास सांगितले जाते. याचा आर्थिक फटका रुग्णांना बसत आहे.स्टाफसाठी शौचालय नाहीया ठिकाणी स्टाफसाठी शौचालयाची व्यवस्थाच नसल्याने त्यांना उघड्यावर जाण्याची वेळ येत आहे. परिणामी, त्यांचे आरोग्य धोक्यात येत असून, रात्री अपरात्री गंभीर प्रश्न निर्माण होतो. मध्यंतरी हा प्रश्न सुटला होता. तो पुन्हा सुरु झाला आहे.रुग्णालयात या सुविधांची नितांत गरजरुग्णालयामध्ये एखांदा हाडाचा रुग्ण दाखल कारायचा असल्यास त्याला निदान एक ते दोन महिन्याचा कालावधी लागू शकतो. परंतु येथे एका - एका वार्डात फक्त ३० ते ३५ खाटा असल्याने त्याला येथे दाखल ठेवणे शक्य नसते. दिवसाकाठी एका- एका वार्डात १०० च्या वर रुग्ण दाखल होतात त्यामुळे मोठी पंचायत निर्माण होते. तसेच या ठिकाणी अतिदक्षता विभागच नसल्याने अपघातातील रुग्ण शक्यतोर सुविधा असलेल्या ठिकाणी रेफर केले जातात. याचबरोबर येथे शस्त्रक्रियासाठी डॉक्टरच नसल्यानेही त्या रुग्णांना नांदेड येथे रेफर करण्याची वेळ येते. सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी अजून किती वर्षांचा कालावधी लागेल? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.औषधींचा तुटवडारुग्णालयात औषधीचा तुटवडा हे काय नवीन नाही. या प्रकाराला अनेक महिन्यांपासून रुग्ण तोंड देत आहेत. एवढेच काय तर काही महिन्यांपूर्वी औषधी नसल्याचे लिहूनच ठेवले होते. तर कधी- कधी परिचारिकांना स्वखर्चातून औषधी आणावी लागते.