शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली तालुक्यातही नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:29 IST

तालुक्यातील काही भागात शेतात कयाधूचे पाणी मोठ्या प्रमाणात तर काही भागात अगदी काठावरच्या शेतात पाणी घुसल्याने नुकसानीचा सामना करावा लागला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तालुक्यातील काही भागात शेतात कयाधूचे पाणी मोठ्या प्रमाणात तर काही भागात अगदी काठावरच्या शेतात पाणी घुसल्याने नुकसानीचा सामना करावा लागला.हिंगोली तालुक्यात हिंगोलीसह समगा, हिंगणी, कोथळज, दुर्गधामणी, मालवाडी, चिखलवाडी आदी गावांच्या शेतशिवारात कयाधू नदीचे पाणी घुसल्याने शेतीचे नुकसान झाले. हिंगोली शहरापर्यंत कयाधूचे पाणी पात्रातून वाहात होते. मात्र पुढे गेल्यानंतर अनेक मोठे ओढे या नदीत मिसळतात. त्यामुळे पाण्याची पातळी कमालीची वाढली होती. तरीही या भागातील पाच ते सहा गावांतील शेतशिवारात कमी-अधिक प्रमाणात या पुराचे पाणी घुसले होते.हिंगोली तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करून मदतीची मागणी माजी सभापती दिलीप घुगे यांनी केले. तर औंढा तालुक्यातील पूर, कंजारा आदी परिसरातील गावांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी नामदेव कल्याणकर यांनी केली.पिके उन्मळताहेतलोकमत न्यूज नेटवर्कवसमत : तालुक्यात पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. या पावसाने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण तर आहेच. सोबत जोमात आलेली पिके सततच्या पावसाने उन्मळून जातात की काय? याची धाकधूकही आहे. जास्त पाऊस व्हावा व धरण भरावीत ही अपेक्षाही आहे. मात्र जादा पावसाने सुगी हातची जावू नये, अशीही प्रार्थना आहे.वसमत तालुक्यात गेल्या तीन वर्षांत कमी पाऊस व दुष्काळसदृष्य स्थिती अनुभवली आहे. यावर्षी सुगी चांगली आहे. प्रदीर्घ विश्रांतीनंतर तीन दिवसांपासून वरूणराजा पुन्हा परतला. त्यामुळे पिकांवर पडलेला ताण हलका झाला. पिके पुन्हा तरारली. मात्र आता सलग तीन दिवसांपासून पाऊस सुरूच असल्याने नदी, नाले, तलाव भरून वाहत आहेत. त्याचा फटकाही शेती शेतकऱ्यांला बसत आहे.सतत तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने आसना, उघडी नदी दुथडी भरून वाहत आहे. नदी शेजारील गावांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागण्याची भिती आहे.कौठा, कुरूंदा, किन्होळा आदी गावातील नदी किनाºयांवर असलेल्या शेतकºयांच्या शेती पुरामुळे खरडल्या जाण्याचा धोका आहे. त्यामुळे शेतकºयांत धाकधूकही आहे.येलदरी, सिद्धेश्वर धरणाची पाणीपातळी या पावसाने वाढत आहे. पाणी वाढत असल्याचा आनंद आहे. धरण भरले तर पुढच्या सुगीसोबत वर्षभराची चिंता संपणार आहे. त्यामुळे धरणाची पाण पातळी वाढत असल्याचा आनंदही आहे. त्यामुळे आनंद व धाकधूक वाढवणारा हा पाऊस ठरत आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीRainपाऊस