शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

हिंगोली तालुक्यातही नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:29 IST

तालुक्यातील काही भागात शेतात कयाधूचे पाणी मोठ्या प्रमाणात तर काही भागात अगदी काठावरच्या शेतात पाणी घुसल्याने नुकसानीचा सामना करावा लागला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तालुक्यातील काही भागात शेतात कयाधूचे पाणी मोठ्या प्रमाणात तर काही भागात अगदी काठावरच्या शेतात पाणी घुसल्याने नुकसानीचा सामना करावा लागला.हिंगोली तालुक्यात हिंगोलीसह समगा, हिंगणी, कोथळज, दुर्गधामणी, मालवाडी, चिखलवाडी आदी गावांच्या शेतशिवारात कयाधू नदीचे पाणी घुसल्याने शेतीचे नुकसान झाले. हिंगोली शहरापर्यंत कयाधूचे पाणी पात्रातून वाहात होते. मात्र पुढे गेल्यानंतर अनेक मोठे ओढे या नदीत मिसळतात. त्यामुळे पाण्याची पातळी कमालीची वाढली होती. तरीही या भागातील पाच ते सहा गावांतील शेतशिवारात कमी-अधिक प्रमाणात या पुराचे पाणी घुसले होते.हिंगोली तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करून मदतीची मागणी माजी सभापती दिलीप घुगे यांनी केले. तर औंढा तालुक्यातील पूर, कंजारा आदी परिसरातील गावांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी नामदेव कल्याणकर यांनी केली.पिके उन्मळताहेतलोकमत न्यूज नेटवर्कवसमत : तालुक्यात पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. या पावसाने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण तर आहेच. सोबत जोमात आलेली पिके सततच्या पावसाने उन्मळून जातात की काय? याची धाकधूकही आहे. जास्त पाऊस व्हावा व धरण भरावीत ही अपेक्षाही आहे. मात्र जादा पावसाने सुगी हातची जावू नये, अशीही प्रार्थना आहे.वसमत तालुक्यात गेल्या तीन वर्षांत कमी पाऊस व दुष्काळसदृष्य स्थिती अनुभवली आहे. यावर्षी सुगी चांगली आहे. प्रदीर्घ विश्रांतीनंतर तीन दिवसांपासून वरूणराजा पुन्हा परतला. त्यामुळे पिकांवर पडलेला ताण हलका झाला. पिके पुन्हा तरारली. मात्र आता सलग तीन दिवसांपासून पाऊस सुरूच असल्याने नदी, नाले, तलाव भरून वाहत आहेत. त्याचा फटकाही शेती शेतकऱ्यांला बसत आहे.सतत तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने आसना, उघडी नदी दुथडी भरून वाहत आहे. नदी शेजारील गावांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागण्याची भिती आहे.कौठा, कुरूंदा, किन्होळा आदी गावातील नदी किनाºयांवर असलेल्या शेतकºयांच्या शेती पुरामुळे खरडल्या जाण्याचा धोका आहे. त्यामुळे शेतकºयांत धाकधूकही आहे.येलदरी, सिद्धेश्वर धरणाची पाणीपातळी या पावसाने वाढत आहे. पाणी वाढत असल्याचा आनंद आहे. धरण भरले तर पुढच्या सुगीसोबत वर्षभराची चिंता संपणार आहे. त्यामुळे धरणाची पाण पातळी वाढत असल्याचा आनंदही आहे. त्यामुळे आनंद व धाकधूक वाढवणारा हा पाऊस ठरत आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीRainपाऊस