शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत बियाणांमध्ये भेसळीचा संशय; १०५ बियाणे नमुने पाठविले प्रयोगशाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 20:41 IST

जिल्ह्यात एकूण ५१० कृषी परवानाधारक केंद्राची संख्या आहे. मात्र यातील काही कृषी केंद्रावर विक्री होत असलेल्या बियाणांमध्ये भेसळ असल्याचे लक्षात आले.

हिंगोली : जिल्ह्यात एकूण ५१० कृषी परवानाधारक केंद्राची संख्या आहे. मात्र यातील काही कृषी केंद्रावर विक्री होत असलेल्या बियाणांमध्ये भेसळ असल्याचे लक्षात आले. त्यामुळे अशा १०५ प्रकारच्या बियाणांचे नमुने शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून, तपासणी अहवाल येताच संबंधित कृषि केंद्र चालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली आहे.  

मागील चार ते पाच वर्षांपासून शेतकऱ्यांवर निसर्गाची अवकृपा असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. एके काळी ज्या शेतात क्विंटलने होणारे उत्पन्न आता किलोवर येऊन ठेपले आहे. मात्र भेसळयुक्त बियाणे विक्रीतून केंद्रचालक चांगलाच नफा मिळवित असल्याचे कृषी विभागाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या वतीने जिल्हास्तरावर आणि तालुका स्तरावर अशा एकूण सहा पथकाची नियुक्ती केली. 

पथकामार्फत कृषी केंद्रातील बियाणांचा धांडोळा घेऊन संशयित वाटलेल्या बियाणांचे नमुने घेतले जात आहेत. अशा प्रकारे एकूण १०५ प्रकारच्या बियाणांचे नमुने पथकाने जमा केले असून, ते शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविलेले आहेत. त्याचा येत्या काही दिवसांत अहवाल येणार असून, संबंधित ठिकाणच्या कृषी केंद्र चालकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. तर परवाना नसताना बी- बियाणे विक्री करणाऱ्या २२ कृषी केंद्रावरही कारवाई करून त्यांच्याकडून जवळपास २५ लाख रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे कृषी केंद्र चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पुढील महिन्यात खताचे नमुने घेण्यात येणार असल्याची माहिती जि.प. कृषी विभागाने दिली आहे. यामध्येही काही भेसळ आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. 

तक्रार दाखल करण्याचे आवाहन यंदा ७० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याशिवाय पेरण्या न करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने केले होते. तरीही बऱ्याच शेतकऱ्यांनी आवाहनाकडे लक्ष न देता पेरणी आटोपली. मात्र जोरदार पाऊस होऊनही जर एखाद्या कंपनीच्या बियाणाची उगवणच न झाल्यास अशा शेतकऱ्यांनी मात्र घाबरून न जाता जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर कृषी विभागातर्फे उपलब्ध करून दिलेल्या तक्रार निवारण केंद्राशी संपर्क साधावा. जेथून बियाणे खरेदी केले त्याची पावतीसह इतर कागदपत्रांद्वारे तक्रार दाखल करावी. त्याची आठ दिवसांत समितीद्वारे चौकशी करून शेतकऱ्याच्या हातात अहवाल दिला जाणार आहे. तो अहवाल पुढील कारवाईसाठी उपयोगी पडणार असल्याचे जिल्हा परिषदेचे कृषि अधिकारी अंकुश डुब्बल यांनी सांगितले. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीHingoliहिंगोली