शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

हिंगोलीत बियाणांमध्ये भेसळीचा संशय; १०५ बियाणे नमुने पाठविले प्रयोगशाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 20:41 IST

जिल्ह्यात एकूण ५१० कृषी परवानाधारक केंद्राची संख्या आहे. मात्र यातील काही कृषी केंद्रावर विक्री होत असलेल्या बियाणांमध्ये भेसळ असल्याचे लक्षात आले.

हिंगोली : जिल्ह्यात एकूण ५१० कृषी परवानाधारक केंद्राची संख्या आहे. मात्र यातील काही कृषी केंद्रावर विक्री होत असलेल्या बियाणांमध्ये भेसळ असल्याचे लक्षात आले. त्यामुळे अशा १०५ प्रकारच्या बियाणांचे नमुने शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून, तपासणी अहवाल येताच संबंधित कृषि केंद्र चालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली आहे.  

मागील चार ते पाच वर्षांपासून शेतकऱ्यांवर निसर्गाची अवकृपा असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. एके काळी ज्या शेतात क्विंटलने होणारे उत्पन्न आता किलोवर येऊन ठेपले आहे. मात्र भेसळयुक्त बियाणे विक्रीतून केंद्रचालक चांगलाच नफा मिळवित असल्याचे कृषी विभागाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या वतीने जिल्हास्तरावर आणि तालुका स्तरावर अशा एकूण सहा पथकाची नियुक्ती केली. 

पथकामार्फत कृषी केंद्रातील बियाणांचा धांडोळा घेऊन संशयित वाटलेल्या बियाणांचे नमुने घेतले जात आहेत. अशा प्रकारे एकूण १०५ प्रकारच्या बियाणांचे नमुने पथकाने जमा केले असून, ते शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविलेले आहेत. त्याचा येत्या काही दिवसांत अहवाल येणार असून, संबंधित ठिकाणच्या कृषी केंद्र चालकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. तर परवाना नसताना बी- बियाणे विक्री करणाऱ्या २२ कृषी केंद्रावरही कारवाई करून त्यांच्याकडून जवळपास २५ लाख रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे कृषी केंद्र चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पुढील महिन्यात खताचे नमुने घेण्यात येणार असल्याची माहिती जि.प. कृषी विभागाने दिली आहे. यामध्येही काही भेसळ आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. 

तक्रार दाखल करण्याचे आवाहन यंदा ७० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याशिवाय पेरण्या न करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने केले होते. तरीही बऱ्याच शेतकऱ्यांनी आवाहनाकडे लक्ष न देता पेरणी आटोपली. मात्र जोरदार पाऊस होऊनही जर एखाद्या कंपनीच्या बियाणाची उगवणच न झाल्यास अशा शेतकऱ्यांनी मात्र घाबरून न जाता जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर कृषी विभागातर्फे उपलब्ध करून दिलेल्या तक्रार निवारण केंद्राशी संपर्क साधावा. जेथून बियाणे खरेदी केले त्याची पावतीसह इतर कागदपत्रांद्वारे तक्रार दाखल करावी. त्याची आठ दिवसांत समितीद्वारे चौकशी करून शेतकऱ्याच्या हातात अहवाल दिला जाणार आहे. तो अहवाल पुढील कारवाईसाठी उपयोगी पडणार असल्याचे जिल्हा परिषदेचे कृषि अधिकारी अंकुश डुब्बल यांनी सांगितले. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीHingoliहिंगोली