शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

हिंगोलीत म्हणे, ‘मुद्रा’चे ३६ कोटी वाटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 23:57 IST

जिल्ह्यात मुद्रा योजनेंतर्गत राष्टÑीयकृत व खाजगी, ग्रामीण बँक, खाजगी वित्त संस्थांतर्फे ३० सप्टेंबर २0१७ पर्यंत ११ हजार ५४४ खातेदारांना ३६ कोटी ६४ लाख रुपयाचे वाटप केल्याची माहिती अग्रणी बँकेकडून प्राप्त झाली आहे. मात्र यात बँकांनी वेगळे प्रस्ताव बोटावर मोजण्याइतके केले. फक्त नियमित शासन योजनातील लाभार्थीच यात दाखविले जात आहेत.

ठळक मुद्देबँका उदासीन : शासकीय योजनांच्या आकड्यांचा खेळ

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात मुद्रा योजनेंतर्गत राष्टÑीयकृत व खाजगी, ग्रामीण बँक, खाजगी वित्त संस्थांतर्फे ३० सप्टेंबर २0१७ पर्यंत ११ हजार ५४४ खातेदारांना ३६ कोटी ६४ लाख रुपयाचे वाटप केल्याची माहिती अग्रणी बँकेकडून प्राप्त झाली आहे. मात्र यात बँकांनी वेगळे प्रस्ताव बोटावर मोजण्याइतके केले. फक्त नियमित शासन योजनातील लाभार्थीच यात दाखविले जात आहेत.अडीच वर्षांपासून मुद्रा लोणंतर्गत तीन टप्प्यात विविध बँकेकडून अथवा खाजगी वित्त संस्थांकडून उद्योग उभारणीसाठी कर्ज उपलब्ध करुन दिले जात आहे. यामध्ये नवीन उद्योजकांना तर बँका दारातही उभे राहू देत नसल्याचे वास्तव चित्र आहे. अजूनही नवीन खातेदार बँकेचे उंबरठे झिजवत आहेत. हिंगोली जिल्ह्यात ३८ कोटी २२ लाख रुपये वितरित झाल्याचे शासकीय आकडेवारी सांगते. यामध्ये शिशु योजनेत २४ कोटी ३६ लाख मंजूर झाले असता, २३ कोटी ३७ लाख वाटप केले, तर किशोरमध्ये मंजूर ८ कोटी ४४ लाख पैकी ८ कोटी १६ लाख वाटप केले आहेत. तर तरुणमध्ये ५ कोटी ४३ लाख मंजूर झाले असता ५ कोटी ११ लाखांचे वाटप केले आहे. असे एकूण ११ हजार ५४४ खातेदारांना तब्बल ३६ कोटी ६४ रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. यात राष्टÑीयीकृत बँकेत १७८ खातेदारांना ६ कोटी ४८ लाख, इतर राष्टÑीयीकृत बँकेत २२० खातेदारांना ३ कोटी ९४ लाख, खाजगी व्यापारी बँकांत १४८ खातेदारांना ४ लाख, तर ग्रामीण बँकेत २६६ खातेदारांना ३ कोटी ६८ लाख, खाजगी वित्त संस्थांकडून १० हजार ७३२ खातेदारांना २२ कोटी १५ लाखाचे वाटप करण्यात आले आहे. अजूनही येत्या मार्च महिन्यांपर्यंत प्रत्येक बँकेत खातेदारांची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. मात्र मंजुरीचे आकडे जरी मोठ- मोठे असले तरीही मात्र नवउद्योगांची संख्या नगण्यच आहे. शिवाय यात विविध शासकीय योजनांचे एकत्रिकरण करून तेच प्रस्ताव दाखविले जात आहेत. त्यामुळे त्यांचे उद्योग उभारणीचे स्वप्न ते स्वप्नच राहत असल्याचे चित्र आहे.माहितीही मिळेना : लाभार्थीही हैराणमुद्रा लोण योजना उद्योजकांच्या दृष्टीने चांगली असली तरीही गरजवंत लाभार्थ्यांना या योजनेचा पाहिजे तसा फायदा होत नाही. शिशु योजनेत लाभार्थ्यांनी सखोल चौकशी केल्यानंतरही त्याच्या पदरी निराशाच पडत आहे. तर बँक अधिकाºयासोबत लागेबांधे असल्याशिवाय कर्ज मंजूर होत नसल्याची ओरड लाभार्थ्यांतून होत आहे. तसेच अग्रणी बँक व्यवस्थापकही माहिती देताना काळजी घेत असून, कामाचा जास्त ताण असल्याचे सांगत माहिती देण्यासाठी टाळण्याचाच प्रयतन होत आहे. त्यामुळे बँकनिहाय स्थितीच कळत नाही.