शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

हिंगोलीत म्हणे, ‘मुद्रा’चे ३६ कोटी वाटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 23:57 IST

जिल्ह्यात मुद्रा योजनेंतर्गत राष्टÑीयकृत व खाजगी, ग्रामीण बँक, खाजगी वित्त संस्थांतर्फे ३० सप्टेंबर २0१७ पर्यंत ११ हजार ५४४ खातेदारांना ३६ कोटी ६४ लाख रुपयाचे वाटप केल्याची माहिती अग्रणी बँकेकडून प्राप्त झाली आहे. मात्र यात बँकांनी वेगळे प्रस्ताव बोटावर मोजण्याइतके केले. फक्त नियमित शासन योजनातील लाभार्थीच यात दाखविले जात आहेत.

ठळक मुद्देबँका उदासीन : शासकीय योजनांच्या आकड्यांचा खेळ

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात मुद्रा योजनेंतर्गत राष्टÑीयकृत व खाजगी, ग्रामीण बँक, खाजगी वित्त संस्थांतर्फे ३० सप्टेंबर २0१७ पर्यंत ११ हजार ५४४ खातेदारांना ३६ कोटी ६४ लाख रुपयाचे वाटप केल्याची माहिती अग्रणी बँकेकडून प्राप्त झाली आहे. मात्र यात बँकांनी वेगळे प्रस्ताव बोटावर मोजण्याइतके केले. फक्त नियमित शासन योजनातील लाभार्थीच यात दाखविले जात आहेत.अडीच वर्षांपासून मुद्रा लोणंतर्गत तीन टप्प्यात विविध बँकेकडून अथवा खाजगी वित्त संस्थांकडून उद्योग उभारणीसाठी कर्ज उपलब्ध करुन दिले जात आहे. यामध्ये नवीन उद्योजकांना तर बँका दारातही उभे राहू देत नसल्याचे वास्तव चित्र आहे. अजूनही नवीन खातेदार बँकेचे उंबरठे झिजवत आहेत. हिंगोली जिल्ह्यात ३८ कोटी २२ लाख रुपये वितरित झाल्याचे शासकीय आकडेवारी सांगते. यामध्ये शिशु योजनेत २४ कोटी ३६ लाख मंजूर झाले असता, २३ कोटी ३७ लाख वाटप केले, तर किशोरमध्ये मंजूर ८ कोटी ४४ लाख पैकी ८ कोटी १६ लाख वाटप केले आहेत. तर तरुणमध्ये ५ कोटी ४३ लाख मंजूर झाले असता ५ कोटी ११ लाखांचे वाटप केले आहे. असे एकूण ११ हजार ५४४ खातेदारांना तब्बल ३६ कोटी ६४ रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. यात राष्टÑीयीकृत बँकेत १७८ खातेदारांना ६ कोटी ४८ लाख, इतर राष्टÑीयीकृत बँकेत २२० खातेदारांना ३ कोटी ९४ लाख, खाजगी व्यापारी बँकांत १४८ खातेदारांना ४ लाख, तर ग्रामीण बँकेत २६६ खातेदारांना ३ कोटी ६८ लाख, खाजगी वित्त संस्थांकडून १० हजार ७३२ खातेदारांना २२ कोटी १५ लाखाचे वाटप करण्यात आले आहे. अजूनही येत्या मार्च महिन्यांपर्यंत प्रत्येक बँकेत खातेदारांची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. मात्र मंजुरीचे आकडे जरी मोठ- मोठे असले तरीही मात्र नवउद्योगांची संख्या नगण्यच आहे. शिवाय यात विविध शासकीय योजनांचे एकत्रिकरण करून तेच प्रस्ताव दाखविले जात आहेत. त्यामुळे त्यांचे उद्योग उभारणीचे स्वप्न ते स्वप्नच राहत असल्याचे चित्र आहे.माहितीही मिळेना : लाभार्थीही हैराणमुद्रा लोण योजना उद्योजकांच्या दृष्टीने चांगली असली तरीही गरजवंत लाभार्थ्यांना या योजनेचा पाहिजे तसा फायदा होत नाही. शिशु योजनेत लाभार्थ्यांनी सखोल चौकशी केल्यानंतरही त्याच्या पदरी निराशाच पडत आहे. तर बँक अधिकाºयासोबत लागेबांधे असल्याशिवाय कर्ज मंजूर होत नसल्याची ओरड लाभार्थ्यांतून होत आहे. तसेच अग्रणी बँक व्यवस्थापकही माहिती देताना काळजी घेत असून, कामाचा जास्त ताण असल्याचे सांगत माहिती देण्यासाठी टाळण्याचाच प्रयतन होत आहे. त्यामुळे बँकनिहाय स्थितीच कळत नाही.