शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

हिंगोलीच्या उद्यानात नाहीत सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 00:56 IST

शहरातील नगरपालिकेच्या बाल उद्यानात आवश्यक सुविधा नाहीत. शिवाय बालकांसाठी असलेल्या खेळणी साहित्यांचीही दुरवस्था झाली आहे. उद्यानातील झोके व पाळण्यांची दयनीय अवस्था झाली आहे. विशेष म्हणजे उद्यान परिसरात स्वच्छतागृहही नाही. त्यामुळे पालिका येथील सुविधांकडे खरेच लक्ष देईल का? हा प्रश्नच आहे.

दयाशिल इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील नगरपालिकेच्या बाल उद्यानात आवश्यक सुविधा नाहीत. शिवाय बालकांसाठी असलेल्या खेळणी साहित्यांचीही दुरवस्था झाली आहे. उद्यानातील झोके व पाळण्यांची दयनीय अवस्था झाली आहे. विशेष म्हणजे उद्यान परिसरात स्वच्छतागृहही नाही. त्यामुळे पालिका येथील सुविधांकडे खरेच लक्ष देईल का? हा प्रश्नच आहे.बालकांना खेळण्या-बागडण्यासाठी हिंगोली शहरात पालिकेचे बालउद्यान उभे राहिले. नव्यानेच उभ्या राहिलेल्या उद्यानात पूर्वी सुविधा होत्या. त्यामुळे नागरिकांच्याही तक्रारी नव्हत्या. परंतु मागील एक वर्षापासून उद्यानातील सुविधांबाबत नागरिकांच्या तक्रारीही वाढत आहेत. शिवाय परिसर स्वच्छतेबाबतही प्रश्न उभे केले जात आहेत. विशेष म्हणजे चिमुकल्यांच्या खेळणी साहित्यही मोडकळीस आले आहेत. शनिवारी उद्यानात आलेल्या नागरिकांशी ‘लोकमत’ने संवाद साधला. यावेळी नागरिकांनी येथील समस्यांना वाचा फोडली. ते म्हणाले, उद्यान परिसरात पिण्याच्या पाण्याची सुविधा केली आहे. परंतु येथे उपाहारगृहाची सुविधा नाही. त्यामुळे मुलांच्या हट्टापायी उद्यानाबाहेर जाऊन खाद्यपदार्थ आणावे लागतात. त्यामुळे येथे पूर्वीप्रमाणे हॉटेल सुरू झाल्यास गैरसोय होणार नाही. तसेच परिसरात हवी तशी स्वच्छताही नसते. त्यामुळे परिसर स्वच्छ असणे गरजेचे आहे. बाल उद्यानात येणाऱ्या महिलांची स्वच्छतागृहाअभावी कुचंबणा होते. त्यामुळे या ठिकाणी स्वच्छतागृह उभे केले पाहिजे, उद्यान परिसरात स्वच्छता आणि तुटफूट झालेल्या खेळण्यांची दुरूस्ती करावी किंवा नवीन खेळणी उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी आहे.चिमुकल्यांचा होतोय हिरमोड...सुट्टीच्या दिवशी लहान मुले खेळण्यासाठी उद्यानात घेऊन चला असा पालकांकडे हट्ट करतात. परंतु उद्यानात आल्यानंतर खेळण्यांची तूटफुट पाहून चिमुकल्यांचा हिरमोड होत आहे. त्यामुळे उद्यान असूनही याचा नागरिकांना आनंद लुटता येत नाही. उद्यानातील बदकाच्या आकराचे चक्री पाळणे, झोकेही तूटले आहेत. त्यामुळे उद्यानात आल्यानंतर खेळण्यांचे साहित्यच तुटलेले दिसताच चिमुकले निराश होत आहेत. खासगी शाळेतील उद्यानात विविध सुविधा आहेत. परंतु लाखो रूपये खर्च करून उभारलेल्या पालिकेच्या उद्यानात चिमुकल्यांसाठी साधी आवश्यक पुरेशी खेळणी नाहीत. तिकीट दर आकारूनही आवश्यक सुविधा उपलब्ध होत नसतील तर पालिका हा पांढरा हत्ती का पोसत आहे? त्यापेक्षा एखादे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारून किस्सा का संपवत नाहीत, अशा उपहासात्मक प्रतिक्रियाही ऐकायला मिळत होत्या.आकर्षक कारंजे; सीसीटीव्ही कॅमेरे बंदउद्यानात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. परंतु काही ठिकाणचे कॅमेरे बंदच आहेत. शिवाय येथील आकर्षक कारंजे बंदच असल्याचे दिसून आले. उद्यानात प्रेमी युगलांना अभय असल्याचे चित्र आहे. उद्यानातील असुविधेमुळे नागरिक दिवसेंदिव उद्यानाकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे येथे प्रेमी युगलांचा वावर वाढत चालल्याचे दिसून येत आहे. अनेकदा दोघांतील वादामुळे त्यामुळे इतरांना त्याचा त्रास होतो. अशावेळी पोलिसांना कळविले जाते. तीन दिवसापूर्वीच पोलिसांनी उद्यानातून प्रेमीयुगलांना ताब्यात घेतले होते.उद्यानाची वेळबाल उद्यान नागरिकांसाठी दररोज सकाळी ९.३० वाजता उघडण्यात येते. तर सायंकाळी ६.३० वाजता उद्यान बंद केले जाते. सोय नसल्याने ते लवकरच बंद होते.प्रवेश शुल्क पाच रूपयेबाल उद्यानात प्रवेशासाठी पाच रूपये शुल्क आकारला जातो. ऐरवी उद्यानात येणाºयांची संख्या कमी असली तरी सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी गर्दी असते. उन्हाळ्यात शाळांना सलग सुट्या असतात. त्यामुळे उन्हाळ्यात उद्यानात गर्दीचे चित्र असते. मात्र आता येथील सुविधेवर प्रश्न उभे राहात असल्याने नागरिकांची उद्यानातील गर्दी वाढेल का?रोपे, वृक्षांची निगा४पालिकेतर्फे तीन वर्षाला लिलाव पद्धतीने बाल उद्यानाचे टेंडर दिले जाते. त्यामुळे येथील देखरेख करण्याची जबाबदारी संबधित टेंडरधारकावर सोपविली जाते. पालिकेच्या बाल उद्यानातील रोपांची निगा राखली असून वेळेवर वृक्षांना पाणी दिले जाते. कामगारांकडून वृक्षांचे संवर्धन केले जाते.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक