शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

दुसºया दिवशीही हिंगोली जिल्ह्यात गारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:18 IST

जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण होते. रविवारी व सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाने व गारपीटीने रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले. फळबागांनाही मोठा फटका बसला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण होते. रविवारी व सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाने व गारपीटीने रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले. फळबागांनाही मोठा फटका बसला.जिल्ह्यातील विविध भागात सोमवारी सकाळपासूनच रिमझिम पावसाने हजेरी लावली होती. दुपारनंतर मात्र पावसाचा वेग वाढला व गारपीटही सुरु झाली होती. दुसºया दिवशी वसमत आणि कळमनुरी तालुक्यातील बहुतांश गावाला पावसाने चांगलेच झोडपले. कळमनुरी तालुक्यातील घोडा कामठा, येहळेगाव तु आदी परिसरातील गहू, हरभरा, टोमॅटोचे गारपिटीने अतोनात नुकसान झाले. हातातोडांशी आलेला घासही निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकºयांची यंदाही चिंता वाढली आहे. येलकी येथे वादळी वाºयासह गारपीट झाल्यामुळे पिकांचे नुकसान झाले. शेतकरी मागील चार ते पाच वर्षापासून निसर्गाच्या अवकृपेत सापडला आहे. यंदाही स्थिती भंयकर असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. तर वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील अवधूत शिंदे यांनी अर्ध्या एकर मध्ये लागवड केलेल्या मिरचीचे ३० ते ४० हजार रुपयाचे नुकसान झाले. महसूल विभागाने अद्याप पंचनामा केलेला नाही. नुकसान भरपाईची मागणी केली आहे.कौठा परिसरात तारांबळकौठा : परिसरात तीन दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण असून सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता जोरदार मेघगर्जनेसह पावसाला सुरूवात झाल्याने शेतकºयांची तारांबळ उडाली. शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. कौठा, खुदनापूर, बोराळा, किन्होळा आदी भागात साधारणत: अर्धातास जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी तर गारांसह पाऊस झाल्याने शेतातील उभी ज्वारी, हरभरा, गहू व नेमकाच आंब्याला आलेल्या मोहोरचेही प्रचंड नुकसान झाले आहे. शिवाय गावातही वादळी वाºयामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली. अगोदरच संकटात असलेला शेतकरी या अवकाळी पावसाने पुन्हा संकटात सापडला आहे.तहसीलदारांकडून पाहणीसेनगाव : बन, बरडा परिसरात रविवारी गारपीट झाली. या गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून सोमवारी तहसीलदार वैशाली पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.तालुक्यात रविवारी अवकाळी पावसाने तुर, हरभरा, गहू या पिकांना झोडपून काढले. तालुक्यातील बन, बरडा शिवारात अवकाळी पावसासह गारांचा पाऊस झाला.यामुळे शेतातील उभे पिके आडवी झाली. हरभरा,गहू या पिकासह फळबाग शेतीचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची महसूल, कृषी विभागाच्या कर्मचाºयांनी पाहणी करून पंचनामे केले आहेत. या परिसरात शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे करुन शेतकºयांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे.दांडेगाव येथे गारपीटवारंगाफाटा : कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव येथे साडे चार ते पाच वाजेदरम्यान मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला तर आठ ते दहा मिनिटे गारपीट झाली आहे. दांडेगाव परिसरात मागील पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. आज दिनांक १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे चार ते पाच वाजेदरम्यान मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला तर आठ ते दहा मिनिटे जोरदार गारपीट झाली आहे. जोरदार पाऊस व गारपीट झाल्याने गहू आडवा झाला तर काढणीस आलेले हरभरा पिकांचे देखील भरपूर नुकसान झाले आहे. निसटलेल्या केळीचेही नुकसान झाले असल्याची भिती व्यक्त केली जात आहे.वसमत : येथे सोमवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. रविवारी इतरत्र पाऊस असताना वसमतमध्ये मात्र ऊन होते. सोमवारी पावसाने हजेरी लावली तालुक्यातील कुरूंदा परिसरात गारांचा पाऊस झाला.वसमत शहर व परिसरात सोमवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार झाले. सायंकाळी पाचनंतर मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्या. साधारण १० ते १५ मिनिटे पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील कुरूंदा परिसरात मात्र गारांसह पाऊस झाला. रविवारी वसमत परिसरात हजेरी न लावलेल्या पावसाने मात्र सोमवारी हजेरी लावून कसरच दूर केल्याचे चित्र पाहावयास मिळाले. रस्त्यावर पडलेल्या गारा बच्चे कंपनी वेचून आनंदोत्सव साजरा करीत असल्याचे दिसून आले.