शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

दुसºया दिवशीही हिंगोली जिल्ह्यात गारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:18 IST

जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण होते. रविवारी व सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाने व गारपीटीने रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले. फळबागांनाही मोठा फटका बसला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण होते. रविवारी व सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाने व गारपीटीने रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले. फळबागांनाही मोठा फटका बसला.जिल्ह्यातील विविध भागात सोमवारी सकाळपासूनच रिमझिम पावसाने हजेरी लावली होती. दुपारनंतर मात्र पावसाचा वेग वाढला व गारपीटही सुरु झाली होती. दुसºया दिवशी वसमत आणि कळमनुरी तालुक्यातील बहुतांश गावाला पावसाने चांगलेच झोडपले. कळमनुरी तालुक्यातील घोडा कामठा, येहळेगाव तु आदी परिसरातील गहू, हरभरा, टोमॅटोचे गारपिटीने अतोनात नुकसान झाले. हातातोडांशी आलेला घासही निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकºयांची यंदाही चिंता वाढली आहे. येलकी येथे वादळी वाºयासह गारपीट झाल्यामुळे पिकांचे नुकसान झाले. शेतकरी मागील चार ते पाच वर्षापासून निसर्गाच्या अवकृपेत सापडला आहे. यंदाही स्थिती भंयकर असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. तर वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील अवधूत शिंदे यांनी अर्ध्या एकर मध्ये लागवड केलेल्या मिरचीचे ३० ते ४० हजार रुपयाचे नुकसान झाले. महसूल विभागाने अद्याप पंचनामा केलेला नाही. नुकसान भरपाईची मागणी केली आहे.कौठा परिसरात तारांबळकौठा : परिसरात तीन दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण असून सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता जोरदार मेघगर्जनेसह पावसाला सुरूवात झाल्याने शेतकºयांची तारांबळ उडाली. शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. कौठा, खुदनापूर, बोराळा, किन्होळा आदी भागात साधारणत: अर्धातास जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी तर गारांसह पाऊस झाल्याने शेतातील उभी ज्वारी, हरभरा, गहू व नेमकाच आंब्याला आलेल्या मोहोरचेही प्रचंड नुकसान झाले आहे. शिवाय गावातही वादळी वाºयामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली. अगोदरच संकटात असलेला शेतकरी या अवकाळी पावसाने पुन्हा संकटात सापडला आहे.तहसीलदारांकडून पाहणीसेनगाव : बन, बरडा परिसरात रविवारी गारपीट झाली. या गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून सोमवारी तहसीलदार वैशाली पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.तालुक्यात रविवारी अवकाळी पावसाने तुर, हरभरा, गहू या पिकांना झोडपून काढले. तालुक्यातील बन, बरडा शिवारात अवकाळी पावसासह गारांचा पाऊस झाला.यामुळे शेतातील उभे पिके आडवी झाली. हरभरा,गहू या पिकासह फळबाग शेतीचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची महसूल, कृषी विभागाच्या कर्मचाºयांनी पाहणी करून पंचनामे केले आहेत. या परिसरात शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे करुन शेतकºयांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे.दांडेगाव येथे गारपीटवारंगाफाटा : कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव येथे साडे चार ते पाच वाजेदरम्यान मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला तर आठ ते दहा मिनिटे गारपीट झाली आहे. दांडेगाव परिसरात मागील पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. आज दिनांक १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे चार ते पाच वाजेदरम्यान मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला तर आठ ते दहा मिनिटे जोरदार गारपीट झाली आहे. जोरदार पाऊस व गारपीट झाल्याने गहू आडवा झाला तर काढणीस आलेले हरभरा पिकांचे देखील भरपूर नुकसान झाले आहे. निसटलेल्या केळीचेही नुकसान झाले असल्याची भिती व्यक्त केली जात आहे.वसमत : येथे सोमवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. रविवारी इतरत्र पाऊस असताना वसमतमध्ये मात्र ऊन होते. सोमवारी पावसाने हजेरी लावली तालुक्यातील कुरूंदा परिसरात गारांचा पाऊस झाला.वसमत शहर व परिसरात सोमवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार झाले. सायंकाळी पाचनंतर मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्या. साधारण १० ते १५ मिनिटे पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील कुरूंदा परिसरात मात्र गारांसह पाऊस झाला. रविवारी वसमत परिसरात हजेरी न लावलेल्या पावसाने मात्र सोमवारी हजेरी लावून कसरच दूर केल्याचे चित्र पाहावयास मिळाले. रस्त्यावर पडलेल्या गारा बच्चे कंपनी वेचून आनंदोत्सव साजरा करीत असल्याचे दिसून आले.