शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
7
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
8
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
9
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
10
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
11
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
12
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
13
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
14
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
15
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
16
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
17
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
18
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
19
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
20
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच

हिंगोली जिल्ह्यात पतपुरवठ्याचे आकडे राहताहेत उद्दिष्टातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:46 IST

जिल्ह्याचे पतधोरण ठरविताना बँकांना पीककर्ज वाटपाचे १११८ कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले असताना उद्योग, शिक्षण, गृहकर्ज आदीसाठी ६३२ कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र कृषीप्रमाणेच त्यातीलही काही बाबींना बँकांची नकारघंटाच कायम असते. गृहकर्ज तेवढे देण्याचा प्रयत्न होतो.

ठळक मुद्देपीकर्जाशिवाय ६३२ कोटींचे उद्दिष्ट : ठराविक क्षेत्रातच कर्जपुरवठ्याकडे दिसतोय कल

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्याचे पतधोरण ठरविताना बँकांना पीककर्ज वाटपाचे १११८ कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले असताना उद्योग, शिक्षण, गृहकर्ज आदीसाठी ६३२ कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र कृषीप्रमाणेच त्यातीलही काही बाबींना बँकांची नकारघंटाच कायम असते. गृहकर्ज तेवढे देण्याचा प्रयत्न होतो.हिंगोली जिल्ह्यात खरीप व रबी हंगामासाठी पीककर्जाचे १११८ कोटी रुपये वितरणाचे नियोजन केलेले आहे. त्यासाठी सध्या शेतकरी बँकांच्या दारात आहेत. मात्र याशिवाय कृषीसाठी दीर्घमुदती कर्जाचे १६५ कोटी, कृषीत पायाभूत सुविधा उभारणीस ५२ कोटी तर इतर उपक्रमांसाठी २२.६२ कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे एकूण कृषी घटक १३५७ कोटींच्या घरात जाणारा आहे. दुसरीकडे लघुउद्योगांच्या उभारणी व विकासासाठी १७४.५0 कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. परंतु नवउद्योजकांना बँका फटकूही देत नाहीत. त्यामुळे हे आकडे उद्दिष्टातच राहतात, हा आजवरचा अनुभव आहे. माल निर्यातीसाठी ४.८0 कोटींपर्यंतचा कर्जपुरवठा करण्याचे नियोजन आहे. मात्र या भागातून कोणताच माल बाहेर जाईल, अशी स्थिती नाही.शिक्षणासाठी कर्जप्रकरणे करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. मात्र वैद्यकीय, अभियांत्रिकीसारख्या शाखेस प्रवेश घेणाºयांचीही कर्जप्रकरणे करण्यास बँका मागेपुढे पाहतात. शिक्षणासाठी १६.३0 कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे. गृहकर्ज मात्र बँकांच्या आवडीचा विषय आहे. त्यातही शासकीय कर्मचारी-अधिकारी, मोठे व्यापारी अशांपैकी तगडी उलाढाल अथवा पगारपत्रक पाहून तत्काळ कर्जपुरवठा केला जातो. यात उद्दिष्ट ६२ कोटींचे असले तरीही त्यापेक्षा जास्तही वितरण केल्याचे पाहायला मिळते. अपारंपरिक उर्जा या प्रकरासाठीही १.७६ कोटी रुपयांपर्यतचे कर्ज देण्याचे उद्दिष्ट आहे.शासनाच्या विविध स्वयंरोजगाराच्या योजनांतील लाभार्थ्यांना कर्जपुरवठा करण्यासाठी १0३ कोटींचे उद्दिष्ट आहे. मात्र या संचिका बँकांकडे तशाच पडून राहतात, हा अनुभव आहे. याशिवाय इतर शासकीय उपक्रमांसाठी कंत्राट आदींच्या कामांना ३0.५५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे. यातही अनेकांना कर्जपुरवठा केला जातो. ठराविक क्षेत्रांतील कर्जपुरवठा सोडला तर अन्य लाभार्थ्यांना आर्थिक कुवत नसल्याचे पाहून दूर ढकलले जाते.दरवर्षीचेच रडगाणेदरवर्षी विविध बँकांना उद्दिष्ट दिले जाते. त्यानंतर लाभार्थ्यांच्या संचिका तपासत आहोत, लवकरच उद्दिष्ट पूर्ण करू, अशी आश्वासने देत जिल्हा प्रशासनासमोरील बैठकांत वेळ मारून नेली जाते. अग्रणी बँकेचे अधिकारीही केवळ माना डोलावण्याचे काम करतात. प्रत्यक्षात या बँका कर्जपुरवठा मात्र करीत नाहीत.

टॅग्स :HingoliहिंगोलीbankबँकFarmerशेतकरी