शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

हिंगोली जिल्हा प्रशासनाकडून बोंडअळीग्रस्तांसाठी ३६.६0 कोटींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:32 IST

शासनाने बोंडअळीग्रस्तांना मदत देण्याचे जाहीर करून प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. मात्र यात कळमनुरी व औंढ्याचा अंतिम अहवाल आला नसून इतर तीन तालुक्यांनी तो सादर केला आहे. जिल्हा प्रशासनाने नोटिसा दिल्यानंतरही या प्रक्रियेला गती येण्याचे नाव दिसत नाही. मात्र जिल्हा प्रशासनाने ३६.६0 कोटींच्या मदतीची मागणी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देकळमनुरी, औंढ्याचा अहवालच नाही : जिल्हा प्रशासनाने नोटिसा दिल्यानंतरही ढिम्म गती

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शासनाने बोंडअळीग्रस्तांना मदत देण्याचे जाहीर करून प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. मात्र यात कळमनुरी व औंढ्याचा अंतिम अहवाल आला नसून इतर तीन तालुक्यांनी तो सादर केला आहे. जिल्हा प्रशासनाने नोटिसा दिल्यानंतरही या प्रक्रियेला गती येण्याचे नाव दिसत नाही. मात्र जिल्हा प्रशासनाने ३६.६0 कोटींच्या मदतीची मागणी केल्याचे सूत्रांनी सांगितले.हिंगोली जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र ५४ हजार ६00 हेक्टर एवढे आहे. बोंडअळीग्रस्तांना कृषी विभागाकडे अर्ज करण्यास सांगितल्यानंतर अनेक शेतकºयांनी रांगा लावल्या होत्या. मात्र बोंडअळीचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात गाजला. त्यानंतर प्रत्यक्ष शेतावर जाऊन सर्व्हेक्षण करण्याचा आदेश दिला होता. ७ डिसेंबरच्या दरम्यान जिल्हाधिकाºयांनीही यासंदर्भात सर्व गावांत तलाठी, ग्रामसेवक व कृषी अधिकाऱ्यांनी संयुक्त सर्व्हे करण्यास आदेशित केले. त्याला महिना उलटला आहे. एकमेव वसमत तालुक्यात २२ हजार ४४६ हेक्टर क्षेत्र तर उर्वरित क्षेत्र इतर चार तालुक्यांत होते. त्यामुळे वसमत वगळता इतर तालुक्यांतील सर्व्हेक्षणाचे काम वेळेत अंतिम होणे गरजेचे होते. परंतु यात वसमतचा अंतिम अहवाल आला असताना कळमनुरी व औंढा तालुक्यांतील अहवाल अंतिम नाहीत. नुकतीच कृषी विभागाने बैठक घेऊन या दोन्ही तालुक्यांचे अंतिम अहवाल देण्यास बजावलेले आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने याबाबत शासनाला अहवाल दिला असून यात ८५ हजार ७२३ श शेतकºयांना ५३९७५ हेक्टर क्षेत्रासाठी ३६.६0 कोटींची मागणी केल्याचे सांगितले जाते.

असे आहे बाधित क्षेत्रकृषी विभागाकडे आलेल्या अहवालानुसार वसमत तालुक्यात २६ हजार ६९0 शेतकऱ्यांचे २१ हजार ३१५ हेक्टर क्षेत्र बाधित आहे. सेनगाव तालुक्यात ४२२१ शेतकºयांचे २४७२ हेक्टर तर हिंगोली तालुक्यात ३८५0 शेतकºयांचे २९५0 हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचे आढळून आले आहे. तर प्राथमिक अहवालानुसार कळमनुरीत ९ हजार शेतक-यांचे ६८00 हेक्टर तर औंढा तालुक्यातील ९0३३ शेतक-यांचे ६५१0 हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचे सांगितले जात आहे. येत्या दोन दिवसांत या तालुक्यांनीही अंतिम अहवाल द्यावा, असे जिल्हाधिका-यांनी बजावलेले आहे.