शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
3
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
4
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
5
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
6
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
7
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
8
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
9
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
10
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
11
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
12
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
13
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
14
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
15
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
16
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
19
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
20
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश

हिंगोली जिल्हा प्रशासनाकडून बोंडअळीग्रस्तांसाठी ३६.६0 कोटींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:32 IST

शासनाने बोंडअळीग्रस्तांना मदत देण्याचे जाहीर करून प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. मात्र यात कळमनुरी व औंढ्याचा अंतिम अहवाल आला नसून इतर तीन तालुक्यांनी तो सादर केला आहे. जिल्हा प्रशासनाने नोटिसा दिल्यानंतरही या प्रक्रियेला गती येण्याचे नाव दिसत नाही. मात्र जिल्हा प्रशासनाने ३६.६0 कोटींच्या मदतीची मागणी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देकळमनुरी, औंढ्याचा अहवालच नाही : जिल्हा प्रशासनाने नोटिसा दिल्यानंतरही ढिम्म गती

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शासनाने बोंडअळीग्रस्तांना मदत देण्याचे जाहीर करून प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. मात्र यात कळमनुरी व औंढ्याचा अंतिम अहवाल आला नसून इतर तीन तालुक्यांनी तो सादर केला आहे. जिल्हा प्रशासनाने नोटिसा दिल्यानंतरही या प्रक्रियेला गती येण्याचे नाव दिसत नाही. मात्र जिल्हा प्रशासनाने ३६.६0 कोटींच्या मदतीची मागणी केल्याचे सूत्रांनी सांगितले.हिंगोली जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र ५४ हजार ६00 हेक्टर एवढे आहे. बोंडअळीग्रस्तांना कृषी विभागाकडे अर्ज करण्यास सांगितल्यानंतर अनेक शेतकºयांनी रांगा लावल्या होत्या. मात्र बोंडअळीचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात गाजला. त्यानंतर प्रत्यक्ष शेतावर जाऊन सर्व्हेक्षण करण्याचा आदेश दिला होता. ७ डिसेंबरच्या दरम्यान जिल्हाधिकाºयांनीही यासंदर्भात सर्व गावांत तलाठी, ग्रामसेवक व कृषी अधिकाऱ्यांनी संयुक्त सर्व्हे करण्यास आदेशित केले. त्याला महिना उलटला आहे. एकमेव वसमत तालुक्यात २२ हजार ४४६ हेक्टर क्षेत्र तर उर्वरित क्षेत्र इतर चार तालुक्यांत होते. त्यामुळे वसमत वगळता इतर तालुक्यांतील सर्व्हेक्षणाचे काम वेळेत अंतिम होणे गरजेचे होते. परंतु यात वसमतचा अंतिम अहवाल आला असताना कळमनुरी व औंढा तालुक्यांतील अहवाल अंतिम नाहीत. नुकतीच कृषी विभागाने बैठक घेऊन या दोन्ही तालुक्यांचे अंतिम अहवाल देण्यास बजावलेले आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने याबाबत शासनाला अहवाल दिला असून यात ८५ हजार ७२३ श शेतकºयांना ५३९७५ हेक्टर क्षेत्रासाठी ३६.६0 कोटींची मागणी केल्याचे सांगितले जाते.

असे आहे बाधित क्षेत्रकृषी विभागाकडे आलेल्या अहवालानुसार वसमत तालुक्यात २६ हजार ६९0 शेतकऱ्यांचे २१ हजार ३१५ हेक्टर क्षेत्र बाधित आहे. सेनगाव तालुक्यात ४२२१ शेतकºयांचे २४७२ हेक्टर तर हिंगोली तालुक्यात ३८५0 शेतकºयांचे २९५0 हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचे आढळून आले आहे. तर प्राथमिक अहवालानुसार कळमनुरीत ९ हजार शेतक-यांचे ६८00 हेक्टर तर औंढा तालुक्यातील ९0३३ शेतक-यांचे ६५१0 हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचे सांगितले जात आहे. येत्या दोन दिवसांत या तालुक्यांनीही अंतिम अहवाल द्यावा, असे जिल्हाधिका-यांनी बजावलेले आहे.