शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

हिंगोली जिल्हा प्रशासनाकडून बोंडअळीग्रस्तांसाठी ३६.६0 कोटींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:32 IST

शासनाने बोंडअळीग्रस्तांना मदत देण्याचे जाहीर करून प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. मात्र यात कळमनुरी व औंढ्याचा अंतिम अहवाल आला नसून इतर तीन तालुक्यांनी तो सादर केला आहे. जिल्हा प्रशासनाने नोटिसा दिल्यानंतरही या प्रक्रियेला गती येण्याचे नाव दिसत नाही. मात्र जिल्हा प्रशासनाने ३६.६0 कोटींच्या मदतीची मागणी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देकळमनुरी, औंढ्याचा अहवालच नाही : जिल्हा प्रशासनाने नोटिसा दिल्यानंतरही ढिम्म गती

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शासनाने बोंडअळीग्रस्तांना मदत देण्याचे जाहीर करून प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. मात्र यात कळमनुरी व औंढ्याचा अंतिम अहवाल आला नसून इतर तीन तालुक्यांनी तो सादर केला आहे. जिल्हा प्रशासनाने नोटिसा दिल्यानंतरही या प्रक्रियेला गती येण्याचे नाव दिसत नाही. मात्र जिल्हा प्रशासनाने ३६.६0 कोटींच्या मदतीची मागणी केल्याचे सूत्रांनी सांगितले.हिंगोली जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र ५४ हजार ६00 हेक्टर एवढे आहे. बोंडअळीग्रस्तांना कृषी विभागाकडे अर्ज करण्यास सांगितल्यानंतर अनेक शेतकºयांनी रांगा लावल्या होत्या. मात्र बोंडअळीचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात गाजला. त्यानंतर प्रत्यक्ष शेतावर जाऊन सर्व्हेक्षण करण्याचा आदेश दिला होता. ७ डिसेंबरच्या दरम्यान जिल्हाधिकाºयांनीही यासंदर्भात सर्व गावांत तलाठी, ग्रामसेवक व कृषी अधिकाऱ्यांनी संयुक्त सर्व्हे करण्यास आदेशित केले. त्याला महिना उलटला आहे. एकमेव वसमत तालुक्यात २२ हजार ४४६ हेक्टर क्षेत्र तर उर्वरित क्षेत्र इतर चार तालुक्यांत होते. त्यामुळे वसमत वगळता इतर तालुक्यांतील सर्व्हेक्षणाचे काम वेळेत अंतिम होणे गरजेचे होते. परंतु यात वसमतचा अंतिम अहवाल आला असताना कळमनुरी व औंढा तालुक्यांतील अहवाल अंतिम नाहीत. नुकतीच कृषी विभागाने बैठक घेऊन या दोन्ही तालुक्यांचे अंतिम अहवाल देण्यास बजावलेले आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने याबाबत शासनाला अहवाल दिला असून यात ८५ हजार ७२३ श शेतकºयांना ५३९७५ हेक्टर क्षेत्रासाठी ३६.६0 कोटींची मागणी केल्याचे सांगितले जाते.

असे आहे बाधित क्षेत्रकृषी विभागाकडे आलेल्या अहवालानुसार वसमत तालुक्यात २६ हजार ६९0 शेतकऱ्यांचे २१ हजार ३१५ हेक्टर क्षेत्र बाधित आहे. सेनगाव तालुक्यात ४२२१ शेतकºयांचे २४७२ हेक्टर तर हिंगोली तालुक्यात ३८५0 शेतकºयांचे २९५0 हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचे आढळून आले आहे. तर प्राथमिक अहवालानुसार कळमनुरीत ९ हजार शेतक-यांचे ६८00 हेक्टर तर औंढा तालुक्यातील ९0३३ शेतक-यांचे ६५१0 हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचे सांगितले जात आहे. येत्या दोन दिवसांत या तालुक्यांनीही अंतिम अहवाल द्यावा, असे जिल्हाधिका-यांनी बजावलेले आहे.