शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

हिंगोलीत उड्डानपुलाअभावी रूग्णांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 01:12 IST

शहरालगतच्या खटकाळी बायपास येथे रेल्वे उड्डाणपूल नाही. शिवाय दर ४५ मिनिटांनी येथून रेल्वे किंवा मालगाडी धावते. त्यामुळे गेट बंद होतो. मात्र नेहमीच्या गेट बंदला नागरिक वैतागले आहेत. विशेष म्हणजे महामार्गावर वाहतुकीची कोंडी होत असून यात रुग्णवाहिकाही अडकून पडतात. परिणामी गंभीर रूग्णांना वेळेत रुग्णालयात दाखल करताना अडचणीं येतात.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी, प्रशासकीय यंत्रणा शहरातील उड्डाणपूल उभारणीकडे लक्ष देतील का?

दयाशिल इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरालगतच्या खटकाळी बायपास येथे रेल्वे उड्डाणपूल नाही. शिवाय दर ४५ मिनिटांनी येथून रेल्वे किंवा मालगाडी धावते. त्यामुळे गेट बंद होतो. मात्र नेहमीच्या गेट बंदला नागरिक वैतागले आहेत. विशेष म्हणजे महामार्गावर वाहतुकीची कोंडी होत असून यात रुग्णवाहिकाही अडकून पडतात. परिणामी गंभीर रूग्णांना वेळेत रुग्णालयात दाखल करताना अडचणीं येतात.हिंगोली शहरात खरच विकासात्मक कामे होत आहेत का? प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत आहेत का? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. पंरतु प्रत्यक्षात मात्र असे होताना दिसून येत नाही. त्यातलाच एक भाग म्हणजे हिंगोली शहरातील खटकाळी बायपास येथील रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न अद्याप मार्गी लागला नाही. त्यामुळे या मार्गाने ये-जा करणाऱ्यांना नाहकच अडकून पडावे लागत आहे. शाळकरी मुले, कामानिमित्त ये-जा करणारे कर्मचारी, पेपर विक्रेते, विशेष म्हणजे गंभीर रुग्ण घेऊन येणाºया रुग्णवाहिकाही वाहतुकीच्या कोंडीत अडकून पडतात. त्यामुळे रूग्णालयात रुग्ण दाखल करताना अडथळा निर्माण होतो.... तर गैरसोय दूर होईल

  • रेल्वे येताच गेट बंद केल्यानंतर रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागतात. वाहतूक सुरळीतसाठी ट्रॅफिक शाखेचे पोलीस कर्मचारी प्रयत्न करतात. २४ आॅक्टोबर रोजी रेल्वे येताच गेट बंद झाले. त्यात रूग्णवाहिकाही अडकून पडली. यावेळी वाहतूक शाखेचे गजानन सांगळे, वसंत चव्हाण यांच्यासह इतर पोलीस कर्मचा-यांनी वाहतूक सुरळीत केली. रूग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून दिला. परंतु ही नेहमीचीच समस्या असल्याचे पोलीस कर्मचा-यांनी सांगितले. वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहनचालकांत अनेकदा वादही होतात.
  • विशेष म्हणजे रेल्वेपटरी पलीकडे एसआरपीएफ कॅम्प व पोलीस वसाहत आहे. एखादी घटना घडल्यास एसआरपीएफच्या तुकडीस घटनास्थळावर तत्काळ हजर होणे आवश्यक असते. परंतु अनेकदा अशावेळी रेल्वेगेट बंद केल्याने जवान अडकून पडतात. पोलीस कर्मचा-यांनाही वेळेत हजर होताना अडचणी येतात. त्यामुळे हिंगोली शहरातील खटकाळी बायपास येथील रेल्वे उड्डाणपुल उभारणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक, अधिकारी, डॉक्टर व कर्मचा-यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिल्या.

रेल्वे उड्डाणपुलाची उभारणी करावी, नागरिकांची मागणी

हिंगोली शहरालगतच्या खटकाळी बायपास येथे रेल्वे उड्डाणपूल नाही. त्यामुळे शाळेत मुलांना वेळेत पोहचविताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. काही शाळेतील व्हॅन मुलांना शाळेत जाण्यास उशिर होईल म्हणून चक्क शॉर्टकटचा मार्ग शोधतात. परिणामी, अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, व या ठिकाणी उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी शाळचे व्हॅनचालक पांडुरंग क-हाळे यांनी केली.

हिंगोली तालुक्यातील येडूद येथून हिंगोली शहरात दूध व भाजीपाला विक्रेते मोठ्या संख्येने येतात. परंतु रेल्वेगेट बंद झाल्यानंतर अडकून पडावे लागते. एखाद्या वेळेस तर भाजीपाला विक्रेत्यांना बीटमध्ये जाण्यास उशिर होतो. त्यामुळे नाईलाजाने बेभाव शेतीमालांची विक्री करावी लागते. त्यामुळे या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल उभारणे गरजेचे असल्याचे येडूद येथील गजानन घुगे यांनी सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस