शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

हिंगोलीत उड्डानपुलाअभावी रूग्णांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 01:12 IST

शहरालगतच्या खटकाळी बायपास येथे रेल्वे उड्डाणपूल नाही. शिवाय दर ४५ मिनिटांनी येथून रेल्वे किंवा मालगाडी धावते. त्यामुळे गेट बंद होतो. मात्र नेहमीच्या गेट बंदला नागरिक वैतागले आहेत. विशेष म्हणजे महामार्गावर वाहतुकीची कोंडी होत असून यात रुग्णवाहिकाही अडकून पडतात. परिणामी गंभीर रूग्णांना वेळेत रुग्णालयात दाखल करताना अडचणीं येतात.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी, प्रशासकीय यंत्रणा शहरातील उड्डाणपूल उभारणीकडे लक्ष देतील का?

दयाशिल इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरालगतच्या खटकाळी बायपास येथे रेल्वे उड्डाणपूल नाही. शिवाय दर ४५ मिनिटांनी येथून रेल्वे किंवा मालगाडी धावते. त्यामुळे गेट बंद होतो. मात्र नेहमीच्या गेट बंदला नागरिक वैतागले आहेत. विशेष म्हणजे महामार्गावर वाहतुकीची कोंडी होत असून यात रुग्णवाहिकाही अडकून पडतात. परिणामी गंभीर रूग्णांना वेळेत रुग्णालयात दाखल करताना अडचणीं येतात.हिंगोली शहरात खरच विकासात्मक कामे होत आहेत का? प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत आहेत का? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. पंरतु प्रत्यक्षात मात्र असे होताना दिसून येत नाही. त्यातलाच एक भाग म्हणजे हिंगोली शहरातील खटकाळी बायपास येथील रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न अद्याप मार्गी लागला नाही. त्यामुळे या मार्गाने ये-जा करणाऱ्यांना नाहकच अडकून पडावे लागत आहे. शाळकरी मुले, कामानिमित्त ये-जा करणारे कर्मचारी, पेपर विक्रेते, विशेष म्हणजे गंभीर रुग्ण घेऊन येणाºया रुग्णवाहिकाही वाहतुकीच्या कोंडीत अडकून पडतात. त्यामुळे रूग्णालयात रुग्ण दाखल करताना अडथळा निर्माण होतो.... तर गैरसोय दूर होईल

  • रेल्वे येताच गेट बंद केल्यानंतर रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागतात. वाहतूक सुरळीतसाठी ट्रॅफिक शाखेचे पोलीस कर्मचारी प्रयत्न करतात. २४ आॅक्टोबर रोजी रेल्वे येताच गेट बंद झाले. त्यात रूग्णवाहिकाही अडकून पडली. यावेळी वाहतूक शाखेचे गजानन सांगळे, वसंत चव्हाण यांच्यासह इतर पोलीस कर्मचा-यांनी वाहतूक सुरळीत केली. रूग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून दिला. परंतु ही नेहमीचीच समस्या असल्याचे पोलीस कर्मचा-यांनी सांगितले. वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहनचालकांत अनेकदा वादही होतात.
  • विशेष म्हणजे रेल्वेपटरी पलीकडे एसआरपीएफ कॅम्प व पोलीस वसाहत आहे. एखादी घटना घडल्यास एसआरपीएफच्या तुकडीस घटनास्थळावर तत्काळ हजर होणे आवश्यक असते. परंतु अनेकदा अशावेळी रेल्वेगेट बंद केल्याने जवान अडकून पडतात. पोलीस कर्मचा-यांनाही वेळेत हजर होताना अडचणी येतात. त्यामुळे हिंगोली शहरातील खटकाळी बायपास येथील रेल्वे उड्डाणपुल उभारणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक, अधिकारी, डॉक्टर व कर्मचा-यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिल्या.

रेल्वे उड्डाणपुलाची उभारणी करावी, नागरिकांची मागणी

हिंगोली शहरालगतच्या खटकाळी बायपास येथे रेल्वे उड्डाणपूल नाही. त्यामुळे शाळेत मुलांना वेळेत पोहचविताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. काही शाळेतील व्हॅन मुलांना शाळेत जाण्यास उशिर होईल म्हणून चक्क शॉर्टकटचा मार्ग शोधतात. परिणामी, अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, व या ठिकाणी उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी शाळचे व्हॅनचालक पांडुरंग क-हाळे यांनी केली.

हिंगोली तालुक्यातील येडूद येथून हिंगोली शहरात दूध व भाजीपाला विक्रेते मोठ्या संख्येने येतात. परंतु रेल्वेगेट बंद झाल्यानंतर अडकून पडावे लागते. एखाद्या वेळेस तर भाजीपाला विक्रेत्यांना बीटमध्ये जाण्यास उशिर होतो. त्यामुळे नाईलाजाने बेभाव शेतीमालांची विक्री करावी लागते. त्यामुळे या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल उभारणे गरजेचे असल्याचे येडूद येथील गजानन घुगे यांनी सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस