शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

हिंगोलीत उड्डानपुलाअभावी रूग्णांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 01:12 IST

शहरालगतच्या खटकाळी बायपास येथे रेल्वे उड्डाणपूल नाही. शिवाय दर ४५ मिनिटांनी येथून रेल्वे किंवा मालगाडी धावते. त्यामुळे गेट बंद होतो. मात्र नेहमीच्या गेट बंदला नागरिक वैतागले आहेत. विशेष म्हणजे महामार्गावर वाहतुकीची कोंडी होत असून यात रुग्णवाहिकाही अडकून पडतात. परिणामी गंभीर रूग्णांना वेळेत रुग्णालयात दाखल करताना अडचणीं येतात.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी, प्रशासकीय यंत्रणा शहरातील उड्डाणपूल उभारणीकडे लक्ष देतील का?

दयाशिल इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरालगतच्या खटकाळी बायपास येथे रेल्वे उड्डाणपूल नाही. शिवाय दर ४५ मिनिटांनी येथून रेल्वे किंवा मालगाडी धावते. त्यामुळे गेट बंद होतो. मात्र नेहमीच्या गेट बंदला नागरिक वैतागले आहेत. विशेष म्हणजे महामार्गावर वाहतुकीची कोंडी होत असून यात रुग्णवाहिकाही अडकून पडतात. परिणामी गंभीर रूग्णांना वेळेत रुग्णालयात दाखल करताना अडचणीं येतात.हिंगोली शहरात खरच विकासात्मक कामे होत आहेत का? प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत आहेत का? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. पंरतु प्रत्यक्षात मात्र असे होताना दिसून येत नाही. त्यातलाच एक भाग म्हणजे हिंगोली शहरातील खटकाळी बायपास येथील रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न अद्याप मार्गी लागला नाही. त्यामुळे या मार्गाने ये-जा करणाऱ्यांना नाहकच अडकून पडावे लागत आहे. शाळकरी मुले, कामानिमित्त ये-जा करणारे कर्मचारी, पेपर विक्रेते, विशेष म्हणजे गंभीर रुग्ण घेऊन येणाºया रुग्णवाहिकाही वाहतुकीच्या कोंडीत अडकून पडतात. त्यामुळे रूग्णालयात रुग्ण दाखल करताना अडथळा निर्माण होतो.... तर गैरसोय दूर होईल

  • रेल्वे येताच गेट बंद केल्यानंतर रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागतात. वाहतूक सुरळीतसाठी ट्रॅफिक शाखेचे पोलीस कर्मचारी प्रयत्न करतात. २४ आॅक्टोबर रोजी रेल्वे येताच गेट बंद झाले. त्यात रूग्णवाहिकाही अडकून पडली. यावेळी वाहतूक शाखेचे गजानन सांगळे, वसंत चव्हाण यांच्यासह इतर पोलीस कर्मचा-यांनी वाहतूक सुरळीत केली. रूग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून दिला. परंतु ही नेहमीचीच समस्या असल्याचे पोलीस कर्मचा-यांनी सांगितले. वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहनचालकांत अनेकदा वादही होतात.
  • विशेष म्हणजे रेल्वेपटरी पलीकडे एसआरपीएफ कॅम्प व पोलीस वसाहत आहे. एखादी घटना घडल्यास एसआरपीएफच्या तुकडीस घटनास्थळावर तत्काळ हजर होणे आवश्यक असते. परंतु अनेकदा अशावेळी रेल्वेगेट बंद केल्याने जवान अडकून पडतात. पोलीस कर्मचा-यांनाही वेळेत हजर होताना अडचणी येतात. त्यामुळे हिंगोली शहरातील खटकाळी बायपास येथील रेल्वे उड्डाणपुल उभारणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक, अधिकारी, डॉक्टर व कर्मचा-यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिल्या.

रेल्वे उड्डाणपुलाची उभारणी करावी, नागरिकांची मागणी

हिंगोली शहरालगतच्या खटकाळी बायपास येथे रेल्वे उड्डाणपूल नाही. त्यामुळे शाळेत मुलांना वेळेत पोहचविताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. काही शाळेतील व्हॅन मुलांना शाळेत जाण्यास उशिर होईल म्हणून चक्क शॉर्टकटचा मार्ग शोधतात. परिणामी, अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, व या ठिकाणी उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी शाळचे व्हॅनचालक पांडुरंग क-हाळे यांनी केली.

हिंगोली तालुक्यातील येडूद येथून हिंगोली शहरात दूध व भाजीपाला विक्रेते मोठ्या संख्येने येतात. परंतु रेल्वेगेट बंद झाल्यानंतर अडकून पडावे लागते. एखाद्या वेळेस तर भाजीपाला विक्रेत्यांना बीटमध्ये जाण्यास उशिर होतो. त्यामुळे नाईलाजाने बेभाव शेतीमालांची विक्री करावी लागते. त्यामुळे या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल उभारणे गरजेचे असल्याचे येडूद येथील गजानन घुगे यांनी सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस