शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली शहर पोलीस ठाणेच बनले गोशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:32 IST

अकोल्यावरुन हैदराबाद मार्गे गुरांची वाहतूक होताना शहर पोलिसांनी एकूण ४० गुरे ताब्यात घेतली होती. मात्र गुरांचा सांभाळ करणाऱ्या विभागांसह गोशाळेचीही दारे ठोठावल्यानंतर कोणीच गुरे सांभाळण्यास तयार नसल्याने शेवटी गुन्ह्यांचा तपास सोडून गुरांचा एखाद्या धन्यासारखा सांभाळ करण्याची वेळ चक्क पोलिसांवरच येऊन ठेपली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अकोल्यावरुन हैदराबाद मार्गे गुरांची वाहतूक होताना शहर पोलिसांनी एकूण ४० गुरे ताब्यात घेतली होती. मात्र गुरांचा सांभाळ करणाऱ्या विभागांसह गोशाळेचीही दारे ठोठावल्यानंतर कोणीच गुरे सांभाळण्यास तयार नसल्याने शेवटी गुन्ह्यांचा तपास सोडून गुरांचा एखाद्या धन्यासारखा सांभाळ करण्याची वेळ चक्क पोलिसांवरच येऊन ठेपली आहे.गोवंश हत्या बंदी कायद्यांतर्गत कत्तलीकडे घेऊन जाणाºया गुरांवर अनेकजण डोळा ठेवून आहेत. एखाद्या रस्त्याने जर गुरे घेऊन जाणारा ट्रक आढळला तर त्यांची माहिती थेट पोलिसांना दिली जाते. असलाच एक अनुभव २३ मार्च रोजी मध्यरात्री ताब्यात घेतलेल्या गुरांच्या माध्यमातून आला आहे. या प्रकरणी गुन्हा तर दाखल झालाच आहे. हे प्रकरण जरी कोर्टात गेले असले तरीही या गुरांना सांभाळायचा प्रश्न पोलिसांसमोर आ वासून आहे. या ठिकाणी गुरे सोडून घेण्यासाठी तर कोणी अद्याप आले नाही. मात्र काही सन्माननिय अपवाद वगळता या गुरांना चारा दाखवून फोटो काढणाºयांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातील दोन तीन वगळता सर्वच गुरांना मार लागलेला असल्याने यांना सांभाळायचेही कोणी धाडसच करीत नसल्याचे चित्र आहे. तीन गुरांच्या जखमेत किडे पडल्याने पोलीस कर्मचाºयांनी पशुवैद्यकीय डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार केले आहेत. एका महिलेला देखरेखीसाठी ठेवलेले असले तरीही येता- जाताना कर्मचारी गुरांची पाहणी करत आहेत. त्यामुळे गुन्ह्यांच्या तपासापेक्षा गुरांचा सांभाळ पोलिसांना चांगलाच अवघड होऊन बसला आहे. गुरांच्या सांभाळासाठी जि. प. पशुसंवर्धन विभाग, नगर पालिका, वळूमाता पैदास केंद्र, जिल्हा कृषी विभाग आदी विभागाचे दारे ठोठावूनही काहीच प्रतिसाद मिळालेला नाही.दरम्यान, जिल्ह्यात तीन शासकीय गोशाळेचे प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहितीही पोलीस ठाण्यातूनच मिळाली आहे.तोंडी मागणी : राजकीय पुढाºयांना वेळच नाहीअनेकांकडून गुरांची तोंडी मागणी होत आहे. गुरांमधून काही फायदा नसल्याने की काय? एकाही राजकीय पुढाºयाने येथे येणे तर सोडाच साधी पोलिसांकडे गुरांची चौकशीही केली नाही. हे विशेष ! तर १२ जानेवारी रोजी पकडलेली १७ गुरे हत्ता येथील गोशाळेत आहेत. ती गुरे परत घेण्यासाठी त्या गुरांच्या मालकानेपोलिसांकडे अर्ज केला. त्यामुळे न्यायालयाने गुरे वापस करण्याचा आदेश दिला आहे. मात्र गोशाळा चालक तो पाळत नसून ३०० रुपयांप्रमाणे गुरांचा खर्च मागत आहे. तर गुरांचा मालक ५० रुपये प्रमाणे खर्च देण्यास तयार असला तरी ते देण्यास तयार नाहीत.पोलीस प्रशासनाच्या वतीने गुरांच्या साभांळासाठी पत्राद्वारे विविध विभागाकडे मागणी केली आहे. त्या विभागाकडून मिळणाºया उत्तराची प्रतीक्षा लागली आहे. काही विभागाने तर दुसºया विभागाची दारे दाखवलेली आहेत.सांभाळण्यास गुरे घ्या.. गुरे.. म्हणण्याची आली वेळकत्तलीकडे घेऊन जाणाºया गुरांचा प्राण वाचविण्यात पोलिंसाना यश आले असले तरीही त्यांचा सांभाळ करणे आता चांगलेच अवघड होऊन बसले आहे. या ठिकाणी फोटो काढून घेणाºयांची संख्या जास्त असली तरीही यांचा सांभाळ करतो असे म्हणणाºयांची संख्या मोजकीच आहे. त्यामुळे गुरे सांभाळण्याची व्यवस्था असणाºया विभागासह गोशाळेकडे धाव घेऊन सांभाळण्यास गुरे घ्या... गुरे.. असे म्हणण्याची वेळ आल्याचे पोउपनि तान्हाजी चेरले व पो. कॉ. प्रदीप जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तर अनेकजण येथे मदतीसाठी धावत आहेत.

 

टॅग्स :HingoliहिंगोलीPolice Stationपोलीस ठाणे