शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
2
दिल्लीत स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता दहशतवादी डॉ. उमर नबी; स्फोटाच्या आधीचे सीसीटीव्ही समोर
3
'अमेरिकन कामगारांना ट्रेन करा आणि घरी जा...' ट्रम्प प्रशासनाचं नवीन फर्मान; भारतीय IT अभियंते चिंतेत
4
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
5
“३९ वर्षे संघटनेत, निष्ठावंतांची तुमच्याकडे काय किंमत?”; ठाकरेंना सवाल करत बडा नेता शिवसेनेत
6
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
7
"हिंदीतील लॉबीने मला स्वीकारलं नाही...", अजिंक्य देव स्पष्टच बोलले; अजय-सनीचं घेतलं नाव
8
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं
9
KL Rahul: द.आफ्रिकेविरुद्ध केएल राहुल इतिहास रचणार? मोठ्या विक्रमापासून फक्त १५ धावा दूर!
10
पार्थ पवारांच्या कंपनीकडून आणखी एक फसवणूक; जमीन खरेदीचा १४७ कोटींचा नजराणाही बुडवला
11
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
12
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
13
Share Market Today: Nifty ची सुस्त सुरुवात, सेन्सेक्सच्या ३ दिवसांच्या तेजीवर ब्रेक; IT शेअर्स धडाम
14
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
15
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
16
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
17
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
18
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
19
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
20
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर

हिंगोलीतील बससेवा तिसऱ्या दिवशीही बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 00:03 IST

मागील तीन दिवसांपासून हिंगोली बसस्थानकातून एकही बस धावली नाही. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान बसची तोडफोड झाल्याने मात्र अद्याप बससेवा सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. खासगी वाहनाद्वारे प्रवासी जात आहेत. हिंगोली डेपोतील अनेक फेºया रद्द झाल्याने प्रवासी व शाळकरी मुलांची तारांबळ उडत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील तीन दिवसांपासून हिंगोली बसस्थानकातून एकही बस धावली नाही. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान बसची तोडफोड झाल्याने मात्र अद्याप बससेवा सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. खासगी वाहनाद्वारे प्रवासी जात आहेत. हिंगोली डेपोतील अनेक फेºया रद्द झाल्याने प्रवासी व शाळकरी मुलांची तारांबळ उडत आहेत.एसटीचे उत्पन्न वाढावे यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून विविध योजना, उपक्रम राबविले जातात. वाट पाहीन पण एसटीनेच जाईन, असे ठिक - ठिकाणी फलकही हिंगोलीत आगारात आहेत. परंतु कुठलाही बंद असो किंवा आंदोलन एसटीचीच नासधूस केली जाते. त्यामुळे सामान्य जनतेची ही जीवनवाहिनी संकटात सापडत चालली आहे. आधीच तोट्यात असलेले एसटी महामंडळाचे नुकसान होत आहे. मराठा आरक्षण मगणीसाठी पुकारलेल्या बंदमुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि पहाता-पहाता बससेवा अचानक बंद झाली. लांब पल्ल्यावरील बसेस तर मागील सात दिवसांपासून बंदच आहेत. बसचे होणारे नुकसान एसटी महामंडळाला परवडणारे नाही, त्यामुळे विविध मार्गावरून बस सोडण्यात आल्या नाहीत. शिवाय वरिष्ठ अधिकाºयांच्या तशा सूचनाही आहेत, अशी माहिती सहाय्यक वाहतूक अधीक्षक एस. एन. पुंडगे यांनी लोकमतशी बोलताना दिली. परंतु बससेवा बंदमुळे स्थानक परिसरात शुकशुकाट आहे. विशेष म्हणजे मानव विकासच्या बसही बंद असल्याने शाळकरी मुलीही शाळेतपर्यंत पोहचू शकल्या नाहीत. यामुळे बस बंदमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. तर काही विद्यार्थी खासगी वाहनाने शाळेकडे धाव घेत असल्याचे चित्र असून त्यांची फजिती होत आहे. हिंगोली आगारात एकूण ५४ बसेस आहेत. आंदोलनादरम्यान हिंगोली आगाराच्या चार बसेस फोडण्यात आल्या. त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. बसचे नुकसान होत असल्यामुळे मात्र आगारातर्फे सर्वच मार्गावरील बसफेºया बंद केल्या आहेत. आंदोलकांनी बसवर लक्ष करताच हिंगोली आगारातील तीन शिवशाही बस तत्काळ बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे शिवशाही बस सुरक्षित असून या बसचे नुकसान झाले नसल्याचे आगारातर्फे सांगण्यात आले. तसेच हिंगोली आगाराच्या अनेक बस बाहेरच अडकून पडल्याचे सांगितले जात होते. पंढरपूर येथे सोडलेल्या बसेस मात्र हिंगोली आगारात दाखल होत होत्या. मागील तीन दिवसांपासून बससेवा बंदमुळे मात्र प्रवासी वैतागले आहेत. बसेस कधी धावणार याबाबत विचारणा केली जात आहे. शाळकरी मुलांतूनही बससेवा सुरू करण्याची मागणी आहे.हिंगोली आगारातील चार बसेसचे नुकसानतोडफोड करण्यात आलेल्या काही बसेसची हिंगोली आगारात किरकोळ दुरूस्ती केली जात असल्याचे दिसून आले. तसेच बससेवा रद्दमुळे मानव विकासने प्रवास करणाºया मुलींची गैरसोय होत आहे. त्यामुळे विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे.हिंगोली आगारात १२७ वाहक व ११६ चालक कार्यरत आहेत. परंतु मागील तीन दिवसांपासून बससेवाच बंद असल्यामुळे हिंगोली आगारातील अधिकारी कर्मचारी सेवा कधी सुरळीत होईल याच्या प्रतिक्षेत होते.हिंगोली आगाराचे १५ लाखांचे नुकसान४हिंगोली आगारात एकूण ५४ बसेस असून विविध मार्गाने धावणाºया बसफेºयातून महामंडळाला दरदिवशी साडेचार ते पाच लाखांचे उत्पन्न होते. शिवाय जादा सोडण्यात येणाºया बसमुळेही उत्पन्नात घट झाली आहे. मागील तीन दिवसांपासून बससेवा बंदमुळे हिंगोली आगारात बसेसच्या रांगा लागल्या असून प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. हिंगोली आगारातील बस कधी सुरू होणार याची चौकशी प्रवाशांतून केली जात होती. विभागीय कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाºयांकडून बस सुरू करण्याच्या सूचना मिळताच विविध मार्गावरून बस धावतील, असे प्रभारी आगारप्रमुख बी. बी. झरीकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.वसमत : मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वसमत आगाराने खबरदारी म्हणून एस.टी. बस बाहेर सोडल्या नाहीत. दुसºया दिवशीही एकही बस आगारातून बाहेर गेली नाही. त्यामुळे बसस्थानकात शुकशुकाट होता. प्रवाशांचे मात्र हाल झाले. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र वातावरण तापलेले आहे. आंदोलने होत आहेत. एस.टी.वर दगडफेक होण्याच्या घटना होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर एसटी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वसमतमध्ये मंगळवापासून बस बाहेर धावल्याच नाहीत. बस नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. खाजगी वाहतुकीच्या वाहनाद्वारे प्रवास करावा लागत आहे. शहरात अनेक खेड्यांतून येणाºया तसेच वसमत आगारातील बसद्वारे ये-जा करणाºया विद्यार्थ्यांच्या शाळेवरही परिणाम झाला असून सामान्य नागरिकांतूनही रोष व्यक्त केला जात आहे. बस बंदचा फटका शाळेतील विद्यार्थ्यांना बसत आहे. महामंडळाच्या उत्पन्नावरही परिणाम होत आहे. तालुक्यातील अनेक नागरिकांना शहरात बाजार ,कार्यालयीन कामकाज, दवाखाना,शेतकºयांनाही कामानिमित्त बाहेरगावी यावे लागते. परंतु सतत तीन दिवसांपासून बंद असलेल्या बससेवेमुळे गैरसोय होत आहे. खाजगी वाहनांची कमतरता आणि अडवणूक याचाही वेगळा फटका बसत आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीMorchaमोर्चा