शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अहो सरकार! तुम्हीच सांगा, पाचशे-हजार रुपयांत कसे जगायचे? ईपीएस ९५ पेन्शनधारकांची व्यथा

By रमेश वाबळे | Updated: March 11, 2024 19:33 IST

सहकार खाते, राज्य विद्युत मंडळ, एसटी महामंडळ, साखर कारखाने, बिडी कामगार यासह विविध महामंडळांत सेवा बजावलेल्या पेन्शनधारकांना तुटपुंजी पेन्शन मिळते.

हिंगोली : एकीकडे महागाईने कळस गाठला असताना ईपीएस ९५ पेन्शनधारकांना मात्र ५०० ते २ हजार २०० रुपये पेन्शन मिळते. या तुटपुंजा पेन्शनमध्ये जीवन जगणे अवघड झाले असून, सरकारने पेन्शनवाढ करावी, या मागणीसाठी ११ मार्च रोजी ईपीएस ९५ पेन्शनधारकांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

सहकार खाते, राज्य विद्युत मंडळ, एसटी महामंडळ, साखर कारखाने, बिडी कामगार यासह विविध महामंडळांत सेवा बजावलेल्या पेन्शनधारकांना तुटपुंजी पेन्शन मिळते. महागाईच्या काळात हाती येणाऱ्या पेन्शनवर जीवन जगणे शक्य होत नाही. त्यामुळे उतारवयात काम करण्याची वेळ पेन्शनधारकांवर आली आहे. सध्या पेन्शनधारकांना ५०० रुपये, ७०० रुपये, ९०० रुपये ते २ हजार २०० रुपये एवढी पेन्शन मिळते. पेन्शनवाढ मिळावी, यासाठी पेन्शनर्सच्या वतीने अनेकवेळा आंदोलने करण्यात आली. दिल्लीतही शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन प्रश्न मांडला.

परंतु, पेन्शनवाढीचा प्रश्न निकाली निघाला नाही. त्यामुळे पेन्शनधारकांत नाराजीचा सूर उमटत असून, लोकसभा निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्याअगोदर पेन्शनवाढ करावी, मागणीसाठी ईपीएस ९५ पेन्शनधारकांनी धरणे आंदोलन केले. यावेळी घोषणाही देण्यात आल्या. मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत श्रम व रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांना देण्यात आले. यावेळी मारोजी चव्हाण, सुभाष अपूर्वा, जेजेराम ढोक, महंमद गौस, ए. डी. पाईकराव, पी. आर. कोटकर, डी. पी. नरवाडे, गफार खान, आर. बी. अंभोरे, भीमराव मार्कड, शेख रसूल, समीउल्लाखाँ, एस. के. काशिदे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Hingoliहिंगोली