शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

हिंगोलीत जोरदार पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 00:11 IST

जिल्हभरात २० सप्टेंबर रोजी ढगाळ वातावरण होते. तर कोठे रिमझीम पाऊस होता. रात्री ९ वाजेच्या सुमारास हिंगोली शहरासह जिल्हाभरात पावसाने हजेरी लावली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हभरात २० सप्टेंबर रोजी ढगाळ वातावरण होते. तर कोठे रिमझीम पाऊस होता. रात्री ९ वाजेच्या सुमारास हिंगोली शहरासह जिल्हाभरात पावसाने हजेरी लावली.परतीच्या पावसाने तारलेकौठा : वसमत तालुक्यातील कौठा व परिसरात याहीवर्षी पावसाच्या लहरीपणाने खरीपाच्या हंगामाची सुरवात संकटाने झाली. त्यात पुन्हा पाऊस गायब झाल्याने परिस्थिती दुष्काळसदृश्य झाल्याने पिण्याच्या पाण्याचीही मारामार सुरू होती. परंतु परतीच्या पावसाने मात्र थोडासा दिलासा मिळाला आहे. १९ आणि २० सप्टेंबरच्या रात्री दमदार पाऊस झाल्याने समाधान व्यक्त होतआहे.कौठा परिसरात पाऊस रीमझिमच होता. दमदार पावसाची प्रतिक्षा होती. २० सप्टेंबर रोजी दमदार पाऊस झाल्याने आसना नदीचे पात्र दुथडी भरून वाहत असून ओढे व नाल्यांनाही पहिल्यांदाच पाणी आले आहे. सोयाबीन, कापूस, हळद आदी पिकांना या पावसाने पुन्हा नवी संजीवनी मिळाली असून पाणी पातळीत ही वाढ होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.वसमत परिसरात पाऊसवसमत : तालुकाभरासह वसमत परिसरात गुरुवारी मध्यरात्रीनंतर पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात प्रसन्नतेचे वातावरण झाले असून शुक्रवारी देखील दिवसभराच्या विश्रांतीनंतर मध्यम पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस शेतीतील सर्व पिकांसाठी आणि जलसाठ्यासह भूजल पातळी वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्रीपासून पडणाऱ्या पावसाने जमिनीची पूर्ण तहान भागवून शेतातील पिकातून पाणी वाहत असल्याने नदी-नाल्यांना देखील पाणी वाहू लागले आहे.पिके बहरलीकळमनुरी : मागील दोन ते तीन दिवसांपासून तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे पीके बहरली असून जलस्त्रोतांना बºयापैकी पाणी आले आहे. १९ व २० सप्टेंबर या दोन दिवसात दमदार पाऊस पडल्याने या पावसामुळे सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर ही पीके बहरली आहेत.कळमनुरी तालुक्यातील काही भागात मूग तोडणीचे काम सुरू आहे. या पावसामुळे नाले, विहीरी, हातपंपांना पाणी आले आहे. एकुणच जलस्तर वाढलेला आहे. तालुक्यात सगळीकडे दमदार पाऊस पडत आहे. आतापर्यंत तालुक्यात सगळीकडे दमदार पाऊस पडत आहे. ४९३.८ टक्के पाऊस पडला आहे. या पावसामुळे इसापूर धरणाची पाणीपातळी वाढत चालली आहे. या पाण्यामुळे शेतकरीही सुखावला आहेकनेरगावातही पाऊसकनेरगाव नाका : येथे २० सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजल्यापासून ढगाळ वातावरण व विजेच्या लखलखाटात रिमझीम पावसाला सुरवात झाली असून पाऊस जास्त जोरात पडण्याची शक्यता दिसत आहे. थंड वारे सुटले आहे. त्यात पावसाची रीपरीप सुरू आहे.तलाव ओसंडलाऔंढा नागनाथ : येथे गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे काठावर असलेल्या औंढा नागनाथ तलाव हा ओसंडून वाहत आहे. या तलावाच्या सांडव्यातून आता पाणी ओवर फुल होऊन वाहत आहे.दिवसभर उघडल्यानंतर रात्री सातच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस रात्र भर पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :RainपाऊसNatureनिसर्ग