शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

हिंगोलीत जोरदार पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 00:11 IST

जिल्हभरात २० सप्टेंबर रोजी ढगाळ वातावरण होते. तर कोठे रिमझीम पाऊस होता. रात्री ९ वाजेच्या सुमारास हिंगोली शहरासह जिल्हाभरात पावसाने हजेरी लावली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हभरात २० सप्टेंबर रोजी ढगाळ वातावरण होते. तर कोठे रिमझीम पाऊस होता. रात्री ९ वाजेच्या सुमारास हिंगोली शहरासह जिल्हाभरात पावसाने हजेरी लावली.परतीच्या पावसाने तारलेकौठा : वसमत तालुक्यातील कौठा व परिसरात याहीवर्षी पावसाच्या लहरीपणाने खरीपाच्या हंगामाची सुरवात संकटाने झाली. त्यात पुन्हा पाऊस गायब झाल्याने परिस्थिती दुष्काळसदृश्य झाल्याने पिण्याच्या पाण्याचीही मारामार सुरू होती. परंतु परतीच्या पावसाने मात्र थोडासा दिलासा मिळाला आहे. १९ आणि २० सप्टेंबरच्या रात्री दमदार पाऊस झाल्याने समाधान व्यक्त होतआहे.कौठा परिसरात पाऊस रीमझिमच होता. दमदार पावसाची प्रतिक्षा होती. २० सप्टेंबर रोजी दमदार पाऊस झाल्याने आसना नदीचे पात्र दुथडी भरून वाहत असून ओढे व नाल्यांनाही पहिल्यांदाच पाणी आले आहे. सोयाबीन, कापूस, हळद आदी पिकांना या पावसाने पुन्हा नवी संजीवनी मिळाली असून पाणी पातळीत ही वाढ होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.वसमत परिसरात पाऊसवसमत : तालुकाभरासह वसमत परिसरात गुरुवारी मध्यरात्रीनंतर पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात प्रसन्नतेचे वातावरण झाले असून शुक्रवारी देखील दिवसभराच्या विश्रांतीनंतर मध्यम पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस शेतीतील सर्व पिकांसाठी आणि जलसाठ्यासह भूजल पातळी वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्रीपासून पडणाऱ्या पावसाने जमिनीची पूर्ण तहान भागवून शेतातील पिकातून पाणी वाहत असल्याने नदी-नाल्यांना देखील पाणी वाहू लागले आहे.पिके बहरलीकळमनुरी : मागील दोन ते तीन दिवसांपासून तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे पीके बहरली असून जलस्त्रोतांना बºयापैकी पाणी आले आहे. १९ व २० सप्टेंबर या दोन दिवसात दमदार पाऊस पडल्याने या पावसामुळे सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर ही पीके बहरली आहेत.कळमनुरी तालुक्यातील काही भागात मूग तोडणीचे काम सुरू आहे. या पावसामुळे नाले, विहीरी, हातपंपांना पाणी आले आहे. एकुणच जलस्तर वाढलेला आहे. तालुक्यात सगळीकडे दमदार पाऊस पडत आहे. आतापर्यंत तालुक्यात सगळीकडे दमदार पाऊस पडत आहे. ४९३.८ टक्के पाऊस पडला आहे. या पावसामुळे इसापूर धरणाची पाणीपातळी वाढत चालली आहे. या पाण्यामुळे शेतकरीही सुखावला आहेकनेरगावातही पाऊसकनेरगाव नाका : येथे २० सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजल्यापासून ढगाळ वातावरण व विजेच्या लखलखाटात रिमझीम पावसाला सुरवात झाली असून पाऊस जास्त जोरात पडण्याची शक्यता दिसत आहे. थंड वारे सुटले आहे. त्यात पावसाची रीपरीप सुरू आहे.तलाव ओसंडलाऔंढा नागनाथ : येथे गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे काठावर असलेल्या औंढा नागनाथ तलाव हा ओसंडून वाहत आहे. या तलावाच्या सांडव्यातून आता पाणी ओवर फुल होऊन वाहत आहे.दिवसभर उघडल्यानंतर रात्री सातच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस रात्र भर पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :RainपाऊसNatureनिसर्ग