शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

हिवरखेडा भागात भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 00:27 IST

तालुक्यातील हिवरखेडा, बोरखेडी या गावातील ऐन हिवाळ्यातच जलस्तर खालावल्याने ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नळ योजनेच्या विहिरींनीही तळ गाठला आहे. तालुक्यात डिसेंबर महिन्यातच पाणी टंचाईचे चटके जाणवू लागले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : तालुक्यातील हिवरखेडा, बोरखेडी या गावातील ऐन हिवाळ्यातच जलस्तर खालावल्याने ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नळ योजनेच्या विहिरींनीही तळ गाठला आहे. तालुक्यात डिसेंबर महिन्यातच पाणी टंचाईचे चटके जाणवू लागले आहेत.यावर्षी सरासरीच्या तुलनेत साखरा मंडळात ६१ टक्के पाऊस झाल्यामुळे या भागातील भूजल पाणीपातळी घटली आहे. पावसाळ्यात नदी नाले ओढयांना पाणीच आले नाही. परिणामी पाणी पातळीतही वाढ झाली नाही. सुरेगाव ग्रामीण भागातील जलसाठा झपाट्याने कमी होत आहे. हिवरखेडा, बोरखेडी येथील नळ योजना विविध कारणांमुळे बंदच आहेत. पाण्याची टाकीही शोभेची वस्तू बनली आहे. सध्या ग्रामपंचायतकडून गावातील एकाच विहिरीत पाईपलाईनने पाणी सोडले जात आहे. तर गावातील एक विहीर कोरडी पडली आहे.जलस्वराज विहिरीवरुन गावात पाणी पुरवठा होतो. मात्र या भागातील वीज पुरवठा सुरळीत राहत नसल्याने गावातील नागरिकांना गावाबाहेरून पाणी आणावे लागत आहे. हिवरखेडा येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी बारा महिनेही शेतातुन पाणी आणावे लागते. गावातील हातपंप गेल्या अनेक पासून बंदच आहेत.याकडे लक्ष ग्रामपंचायतीने देऊन हातपंप दूरूस्त करण्याची मागणी आहे. गावातील दोन्ही विहिरीत पाणी सोडावे जेणेकरून करून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. बोरखेडी येथील नळ योजना अनेक वर्षांपासून बंद पडली आहे. याकडे बोरखेडी येथील ग्रामपंचायतने लक्ष देऊन येथील पाणी पुरवठा सुरळीत करावा.याठिकाणी ऐन हिवाळ्यातच दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. असे असताना प्रशासनाने टंचाईग्रस्त गावांत पाणी टंचाई गंभीर होण्याआधी उपाय योजना करणे गरजेचे आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईHingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली