शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

‘आयुष्यमान’चे आरोग्य कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:14 IST

गोरगरिबांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी यासाठी शासनाकडून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना तळागाळापर्यंत पोहोचावी यासाठी जिल्हा रूग्णालय व आरोग्य विभागातर्फे धडपड केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : गोरगरिबांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी यासाठी शासनाकडून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना तळागाळापर्यंत पोहोचावी यासाठी जिल्हा रूग्णालय व आरोग्य विभागातर्फे धडपड केली जात आहे. २३ सप्टेंबर रोजी योजनेचा शुभारंभ झाला असून आतापर्यंत जिल्ह्यातील १२७ जणांना ई- कार्डवाटप करण्यात आले आहेत.आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे उद्घाटन २३ सप्टेंबर रोजी देशभरात झाले. योजने अंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील १ लाख ७ हजार २८ जणांना आरोग्य सेवेचा मोफत लाभ मिळणार आहे. यात ग्रामीण भागातील ९३ हजार ५७९ तर शहरी भागातील १३ हजार ४४९ लाभार्थ्यांचा यात समावेश आहे. विविध आजारांवर मोफत उपचार घेता येणार आहेत. कुटुंबातील पाच व्यक्तींपर्यंत हा लाभ देण्यात येणार आहे. सदर योजनेचा लाभ एक वषार्साठी असून योजनेतंर्गत गरीब रुग्णांना मोठ्या खाजगी दवाखान्यात उपचार घेणे शक्य झाले आहे. संबधित रूग्णांना सांकेतांक क्रमांकदिला जाणार आहे. तो क्रमांक सांगितल्यावर सदर लाभार्थ्यास भारतात कोठेही लाभ घेणे शक्य आहे. सदर क्रमांक सांगितल्यानंतर उपचार अथवा शस्त्रक्रियेचा लाभ मिळणार आहे. ही सेवा रूग्णालयात आॅनलाईन पद्धतीने राबविली जात आहे.आयुष्यमान भारत जन आरोग्य योजने अंतर्गत कोणत्याही कुटुंबाना देशात कोठेही लाभ घेता येणार आहे. सर्वांना सांकेतिक क्रमांक देण्यात येणार आहे. क्रमांक सांगितल्यानंतर आवश्यक ते उपचार मिळण्यास मदत होणार आहे. योजनेतंर्गत वर्षातून एक वेळेस पाच लाख रुपयांपर्यंतचा लाभ वैद्यकीय उपचाराकरिता मिळणार आहे. या बरोबर कुटुंब प्रमुखास आयुष्यमान भारतचे कार्ड दिले जात आहे. हिंगोली येथील जिल्हा सामान्य रूग्णायात तसेच शहरातील स्नेहल नर्सींग होम व माधव हॉस्पीटल येथे सध्या नोंदणीचे काम सुरू असल्याचे डॉ. मोहसीन खान यांनी ‘लोकमत’ शी सांगितले.हिंगोली : भारतात कुठेही उपचार घेणे शक्यआयुष्यमान भारत योजने अंतर्गत कोणत्याही कुटुंबाला भारतात कोठेही या योजनेचा लाभ घेणे शक्य आहे. जिल्हा रूग्णालय, आरोग्य विभाग व आशावर्कर यांच्यामार्फत योजनेच्या जनजागृतीसाठी परिश्रम घेतले जात आहेत. शिवाय जिल्ह्यातील गावो-गावी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले होते.सन २०११ मध्ये करण्यात आलेल्या सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेतील आकडेवारीनुसार कुटुंबांची निवड आयुष्मान जन आरोग्य योजनेंतर्गत करण्यात आली आहे. योजनेमुळे हिंगोली जिल्ह्यातील १ लाख ७ हजार २८ कुटुंबाना लाभ मिळणार.आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची कामे सुरू असून लाभार्थ्यांची माहिती व कार्ड वाटप केली जात आहेत. अशी माहिती जि. शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीHealthआरोग्य