शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
3
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
4
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
6
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
7
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
8
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
9
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
10
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
11
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
12
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
13
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
14
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
15
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
17
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
18
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
19
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे

‘आयुष्यमान’चे आरोग्य कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:14 IST

गोरगरिबांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी यासाठी शासनाकडून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना तळागाळापर्यंत पोहोचावी यासाठी जिल्हा रूग्णालय व आरोग्य विभागातर्फे धडपड केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : गोरगरिबांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी यासाठी शासनाकडून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना तळागाळापर्यंत पोहोचावी यासाठी जिल्हा रूग्णालय व आरोग्य विभागातर्फे धडपड केली जात आहे. २३ सप्टेंबर रोजी योजनेचा शुभारंभ झाला असून आतापर्यंत जिल्ह्यातील १२७ जणांना ई- कार्डवाटप करण्यात आले आहेत.आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे उद्घाटन २३ सप्टेंबर रोजी देशभरात झाले. योजने अंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील १ लाख ७ हजार २८ जणांना आरोग्य सेवेचा मोफत लाभ मिळणार आहे. यात ग्रामीण भागातील ९३ हजार ५७९ तर शहरी भागातील १३ हजार ४४९ लाभार्थ्यांचा यात समावेश आहे. विविध आजारांवर मोफत उपचार घेता येणार आहेत. कुटुंबातील पाच व्यक्तींपर्यंत हा लाभ देण्यात येणार आहे. सदर योजनेचा लाभ एक वषार्साठी असून योजनेतंर्गत गरीब रुग्णांना मोठ्या खाजगी दवाखान्यात उपचार घेणे शक्य झाले आहे. संबधित रूग्णांना सांकेतांक क्रमांकदिला जाणार आहे. तो क्रमांक सांगितल्यावर सदर लाभार्थ्यास भारतात कोठेही लाभ घेणे शक्य आहे. सदर क्रमांक सांगितल्यानंतर उपचार अथवा शस्त्रक्रियेचा लाभ मिळणार आहे. ही सेवा रूग्णालयात आॅनलाईन पद्धतीने राबविली जात आहे.आयुष्यमान भारत जन आरोग्य योजने अंतर्गत कोणत्याही कुटुंबाना देशात कोठेही लाभ घेता येणार आहे. सर्वांना सांकेतिक क्रमांक देण्यात येणार आहे. क्रमांक सांगितल्यानंतर आवश्यक ते उपचार मिळण्यास मदत होणार आहे. योजनेतंर्गत वर्षातून एक वेळेस पाच लाख रुपयांपर्यंतचा लाभ वैद्यकीय उपचाराकरिता मिळणार आहे. या बरोबर कुटुंब प्रमुखास आयुष्यमान भारतचे कार्ड दिले जात आहे. हिंगोली येथील जिल्हा सामान्य रूग्णायात तसेच शहरातील स्नेहल नर्सींग होम व माधव हॉस्पीटल येथे सध्या नोंदणीचे काम सुरू असल्याचे डॉ. मोहसीन खान यांनी ‘लोकमत’ शी सांगितले.हिंगोली : भारतात कुठेही उपचार घेणे शक्यआयुष्यमान भारत योजने अंतर्गत कोणत्याही कुटुंबाला भारतात कोठेही या योजनेचा लाभ घेणे शक्य आहे. जिल्हा रूग्णालय, आरोग्य विभाग व आशावर्कर यांच्यामार्फत योजनेच्या जनजागृतीसाठी परिश्रम घेतले जात आहेत. शिवाय जिल्ह्यातील गावो-गावी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले होते.सन २०११ मध्ये करण्यात आलेल्या सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेतील आकडेवारीनुसार कुटुंबांची निवड आयुष्मान जन आरोग्य योजनेंतर्गत करण्यात आली आहे. योजनेमुळे हिंगोली जिल्ह्यातील १ लाख ७ हजार २८ कुटुंबाना लाभ मिळणार.आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची कामे सुरू असून लाभार्थ्यांची माहिती व कार्ड वाटप केली जात आहेत. अशी माहिती जि. शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीHealthआरोग्य