शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

३ लाख बालकांची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:59 IST

निरोगी व सदृढ पिढी घडविण्यासाठी शासनाकडून राष्टÑीय बालस्वास्थ कार्यक्रम संपूर्ण राज्यभरात राबविला जातो. हिंगोली जिल्ह्यात वर्षभरात राबविण्यात आलेल्या कार्यक्रमा अंतर्गत २ लाख १५ हजार ३४२ शालेय विद्यार्थ्यांची तर १ लाख १८ हजार ९४० अंगणवाडीतील चिमुकले एकूण ३ लाख ३३ हजार ६८२ जणांची जिल्हा यंत्रणेमार्फत मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तर २६ बालकांची मोफत हृदय शस्त्रक्रीया करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : निरोगी व सदृढ पिढी घडविण्यासाठी शासनाकडून राष्टÑीय बालस्वास्थ कार्यक्रम संपूर्ण राज्यभरात राबविला जातो. हिंगोली जिल्ह्यात वर्षभरात राबविण्यात आलेल्या कार्यक्रमा अंतर्गत २ लाख १५ हजार ३४२ शालेय विद्यार्थ्यांची तर १ लाख १८ हजार ९४० अंगणवाडीतील चिमुकले एकूण ३ लाख ३३ हजार ६८२ जणांची जिल्हा यंत्रणेमार्फत मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तर २६ बालकांची मोफत हृदय शस्त्रक्रीया करण्यात आली.राष्टÑीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यात, राष्टÑीय बालस्वास्थ कार्यक्रम राबविला जातो. यासाठी एकूण १७ वैद्यकीय पथकांची नेमणूक करण्यात आली असून सदर कार्यक्रम अंतर्गत ० ते १८ वयोगटातील बालकांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार केले जातात. अंगणवाडीतील बालकांची वर्षातून दोनदा,आश्रमशाळेतील तिन वेळेस तर शाळेतील विद्यार्थ्यांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी केली जाते. त्या अनुषंगाने २०१७-१८ या वर्षात राष्टÑीय बालस्वाथ कार्यक्रम अंतर्गत ३ लाख ३३ हजार ६८२ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान ज्या बालकांना प्रदिर्घ आजार आहे, त्यांच्यावर मोफत उपचार व शस्त्रक्रीया करण्यात आली. गरजू बालकांवर राज्यातील नामांकीत प्रायव्हेट हॉस्पीटलमध्ये ही सेवा मोफत आहे. बालकास एखादा प्रदीर्घ आजार किंवा शस्त्रक्रीया करायची असल्यास त्यांना याठिकाणी सेवा उपलब्ध आहे.राष्टÑीय बालस्वास्थ कार्यक्रम अंतर्गत तपासणी करण्यात आलेल्या बालकांवर मोफत उपचार केले जातात. उपचारासाठी लागणारा संपूर्ण खर्च महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेतून केला जातो. कार्यक्रम अंतर्गत दोन कॅम्प घेण्यात आले असून यामध्ये ५७ बालकांना ह्यदय आजार असल्याचेआढळुन आले. यापैकी २६ बालकांची मोफत ह्यदय शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. तर इतर एकूण १४८ शस्त्रक्रीया करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तिसºया कॅम्पमध्ये आढळुन आलेल्या १०३ बालकांची शस्त्रक्रीया करण्यात येणार आहे.बालकांच्या प्रदीर्घ आजारांवर मोफत उपचारासाठी जिल्हा रूग्णालयाचे बालाजी गाभणे ९९२११२७७०६ तसेच चव्हाण ९८५०२७३६३० यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन डॉ. गोपाल कदम यांनी केले.