शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

हिंगोलीत जिल्ह्यात ३ लाख बालकांची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:21 IST

निरोगी व सदृढ पिढी घडविण्यासाठी शासनाकडून राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम संपूर्ण राज्यभरात राबविला जातो. हिंगोली जिल्ह्यात वर्षभरात राबविण्यात आलेल्या कार्यक्रमा अंतर्गत २ लाख १५ हजार ३४२ शालेय विद्यार्थ्यांची तर १ लाख १८ हजार ९४० अंगणवाडीतील चिमुकले एकूण ३ लाख ३३ हजार ६८२ जणांची जिल्हा यंत्रणेमार्फत मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तर २६ बालकांची मोफत हृदय शस्त्रक्रीया करण्यात आली.

ठळक मुद्देराष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : निरोगी व सदृढ पिढी घडविण्यासाठी शासनाकडून राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम संपूर्ण राज्यभरात राबविला जातो. हिंगोली जिल्ह्यात वर्षभरात राबविण्यात आलेल्या कार्यक्रमा अंतर्गत २ लाख १५ हजार ३४२ शालेय विद्यार्थ्यांची तर १ लाख १८ हजार ९४० अंगणवाडीतील चिमुकले एकूण ३ लाख ३३ हजार ६८२ जणांची जिल्हा यंत्रणेमार्फत मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तर २६ बालकांची मोफत हृदय शस्त्रक्रीया करण्यात आली.राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यात, राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम राबविला जातो. यासाठी एकूण १७ वैद्यकीय पथकांची नेमणूक करण्यात आली असून सदर कार्यक्रम अंतर्गत ० ते १८ वयोगटातील बालकांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार केले जातात. अंगणवाडीतील बालकांची वर्षातून दोनदा,आश्रमशाळेतील तिन वेळेस तर शाळेतील विद्यार्थ्यांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी केली जाते. त्या अनुषंगाने २०१७-१८ या वर्षात राष्ट्रीय बालस्वाथ कार्यक्रम अंतर्गत ३ लाख ३३ हजार ६८२ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान ज्या बालकांना प्रदिर्घ आजार आहे, त्यांच्यावर मोफत उपचार व शस्त्रक्रीया करण्यात आली. गरजू बालकांवर राज्यातील नामांकीत प्रायव्हेट हॉस्पीटलमध्ये ही सेवा मोफत आहे. बालकास एखादा प्रदीर्घ आजार किंवा शस्त्रक्रीया करायची असल्यास त्यांना याठिकाणी सेवा उपलब्ध आहे.आरोग्य : २६ बालकांची हृदय शस्त्रक्रियाराष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम अंतर्गत तपासणी करण्यात आलेल्या बालकांवर मोफत उपचार केले जातात. उपचारासाठी लागणारा संपूर्ण खर्च महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेतून केला जातो. कार्यक्रम अंतर्गत दोन कॅम्प घेण्यात आले असून यामध्ये ५७ बालकांना ह्यदय आजार असल्याचे आढळुन आले. यापैकी २६ बालकांची मोफत ह्यदय शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. तर इतर एकूण १४८ शस्त्रक्रीया करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तिस-या कॅम्पमध्ये आढळुन आलेल्या १०३ बालकांची शस्त्रक्रीया करण्यात येणार आहे.