शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

हर.. हर.. महादेव! मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी संतोष बांगर निघाले शिवभक्तांसह कावड यात्रेत

By विजय पाटील | Updated: August 8, 2022 18:22 IST

आ.संतोष बांगर यांच्या नेतृत्वात काढण्यात येत असलेल्या या कावड यात्रेची मागील सात ते आठ वर्षांची परंपरा आहे.

हिंगोली : कळमनुरी येथील चिंचाळेश्वर मंदिर ते कयाधू अमृतधारा मंदिर हिंगोलीपर्यंत काढण्यात येणाऱ्या कावड यात्रेचे कळमनुरीहून प्रस्थान झाले आहे. हजारो शिवभक्तांनी हर.. हर.. महादेव असा गजर करीत यात सहभाग घेतला आहे.

आ.संतोष बांगर यांच्या नेतृत्वात काढण्यात येत असलेल्या या कावड यात्रेची मागील सात ते आठ वर्षांची परंपरा आहे. या कावड यात्रेत हजारो भाविक व युवक मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात. श्रावण महिन्यात कावड यात्रा काढण्याची जुनी परंपरा आहे. विविध भागातून प्रसिद्ध तीर्थक्षेत्र तथा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा येथील नागनाथाच्या दर्शनासाठी कावड घेऊन येणाऱ्या भाविकांची मांदियाळी पहायला मिळते. मात्र बांगर यांनी चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते कयाधू अमृतधारा मंदिर हिंगोली ही परंपरा सुरू केली अन् त्याला वाढता प्रतिसाद मिळत आहे.

कळमनुरी येथून दुपारी निघालेल्या या कावड यात्रेत कळमनुरी, हिंगोली, औंढ्यासह विविध भागातून आलेले शिवभक्त हजारोंच्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले आहेत. २० ते २२ किलोमीटरचा हा पायी प्रवास आहे. या प्रवासादरम्यान कावड घेऊन हे भाविक हर.. हर.. महादेवचा जयघोष करून आसमान निनादून टाकत असल्याचे पहायला मिळत होते. भगवे झेंडे, टी शर्ट यामुळे तर या यात्रेचे वातावरण भारावून गेले होते. हजारोंचा हा जनसमुदाय बम बम बम भोले.. भोले... च्या तालावरही थिरकत होता. 

मुख्यमंत्री येणार असल्याने वेगळा जल्लोषया कावड यात्रेतील मोठ्या जनसमुदायामुळे राष्ट्रीय महामार्गाचा एक रस्ताच पूर्णपणे व्यापला होता. मुख्यमंत्री येणार असल्याने या यात्रेत वेगळा जल्लोष पहायला मिळाला. राजकीयदृष्ट्याही आ.संतोष बांगर हे मुख्यमंत्री गटात गेल्यानंतर त्यांचा हा पहिलाच मोठा कार्यक्रम होता. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे