शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

दुसऱ्यांच्या दिवाळीतच पालावरच्यांना आनंद; फाटक्या कापडांवरच बच्चे कंपनीचा निरागस उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 17:47 IST

काही ठिकाणी सामाजिक दातृत्वाचा अनुभव येतो मात्र येथे तसे काही घडले नाही. त्यामुळे जे मिळेल तेच गोड मानून आनंद लुटला.

ठळक मुद्देगावाकडे शेतीवाडी नसलेल्या या आदिवासी भटक्यांना फिरून माल विकण्याशिवाय पर्याय नाही.

हिंगोली : आधीच कोरोनाचे संकट आणि त्यात व्यवसायही चांगला झाला नसल्याने यामुळे यंदा भटक्या विक्रेत्यांकडे दिवाळी साजरी करण्यासाठी पुरेशी रक्कम नसल्याने बिकट अवस्थेतच हा सण साजरा करावा लागला. यंदा कोणी मदतीचा हातही पुढे केला नसल्याचे दिसून आले.

हिंगोली येथील अकोला बायपास भागात मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातून आलेल्या विक्रेत्यांनी मागील आठ ते दहा दिवसांपासून बस्तान मांडले आहे. जवळपास दहा ते पंधरा झोपड्यांमध्ये या मंडळींनी संसार थाटला आहे. दिवाळी त्यांनी येथेच साजरी केली. मात्र यावर्षी चांगला व्यवसाय झाला नसल्याने दिवे लावून साध्या पद्धतीने दिवाळी साजरी करावी लागली. मुलाबाळांना चांगले कपडेही घेता आले नाहीत. यंदा दोन ट्रक माल आणला असताना अर्धाही विक्री झाला नाही. त्यामुळे आर्थिक चणचण सोसावी लागली. काही ठिकाणी सामाजिक दातृत्वाचा अनुभव येतो मात्र येथे तसे काही घडले नाही. त्यामुळे जे मिळेल तेच गोड मानून आनंद लुटला.

दिवाळी काय खरेदी केले?मुलांनी आग्रह केल्यामुळे थोड्याबहुत प्रमाणात फटाके आणून फोडले. त्यावरच दिवाळीच्या सणाचा आनंद लुटला मिळालेल्या पैशातून गोड-धोड केले. मात्र आणलेला मालविक्री न झाल्याने अंगावर कर्ज असल्याने त्याची गोडी अनुभवता आली नाही. 

मुलांनी कसा लुटला आनंदया झोपडीमधील लहान मुलांनी सांगितले की, दुसऱ्यांनी फोडलेल्या फटाक्यांवर आम्ही समाधान मानले. आकाशात होणारी आतषबाजीचे रोषणाई हीच आमची दिवाळी होती. तसे काही फटाके पालकांनी आणून दिले होते. त्यावरच समाधान मानले.

कोरोनामुळे काही कायम परिणाम झाला याबाबत शंकर टाकिया म्हणाले की, आम्ही दरवर्षी महाराष्ट्रात विविध भागात असे साहित्य विक्रीला आणत असतो. मात्र यंदा या साहित्याला ग्राहक मिळत नाही. साडी अथवा जुन्या कापडावरही आम्ही प्लास्टिक भांडी विकतो. रोख रक्कम असल्यास पन्नास रुपयांपासून दीडशे रुपयांपर्यंत किंमत आहे. पुढील काळात चांगला व्यवसाय होईल. असे वाटते . 

दरवर्षीच असते भटकंतीदिवाळीच्या सणासाठी साधारणपणे सगळे गावाकडे जाण्यासाठी आग्रही असतात. मात्र गावाकडे शेतीवाडी नसलेल्या या आदिवासी भटक्यांना फिरून माल विकण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मुलांना प्रत्येक वर्षी नव्या ठिकाणी जावून व्यवसाय करीत दिवाळी साजरी करावी लागते. त्यात व्यवसाय चांगला झाला तर कपडेलत्ते व फटाके मिळतात. अन्यथा तसेच दिवस काढावे लागतात.

टॅग्स :HingoliहिंगोलीDiwaliदिवाळी