शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दुसऱ्यांच्या दिवाळीतच पालावरच्यांना आनंद; फाटक्या कापडांवरच बच्चे कंपनीचा निरागस उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 17:47 IST

काही ठिकाणी सामाजिक दातृत्वाचा अनुभव येतो मात्र येथे तसे काही घडले नाही. त्यामुळे जे मिळेल तेच गोड मानून आनंद लुटला.

ठळक मुद्देगावाकडे शेतीवाडी नसलेल्या या आदिवासी भटक्यांना फिरून माल विकण्याशिवाय पर्याय नाही.

हिंगोली : आधीच कोरोनाचे संकट आणि त्यात व्यवसायही चांगला झाला नसल्याने यामुळे यंदा भटक्या विक्रेत्यांकडे दिवाळी साजरी करण्यासाठी पुरेशी रक्कम नसल्याने बिकट अवस्थेतच हा सण साजरा करावा लागला. यंदा कोणी मदतीचा हातही पुढे केला नसल्याचे दिसून आले.

हिंगोली येथील अकोला बायपास भागात मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातून आलेल्या विक्रेत्यांनी मागील आठ ते दहा दिवसांपासून बस्तान मांडले आहे. जवळपास दहा ते पंधरा झोपड्यांमध्ये या मंडळींनी संसार थाटला आहे. दिवाळी त्यांनी येथेच साजरी केली. मात्र यावर्षी चांगला व्यवसाय झाला नसल्याने दिवे लावून साध्या पद्धतीने दिवाळी साजरी करावी लागली. मुलाबाळांना चांगले कपडेही घेता आले नाहीत. यंदा दोन ट्रक माल आणला असताना अर्धाही विक्री झाला नाही. त्यामुळे आर्थिक चणचण सोसावी लागली. काही ठिकाणी सामाजिक दातृत्वाचा अनुभव येतो मात्र येथे तसे काही घडले नाही. त्यामुळे जे मिळेल तेच गोड मानून आनंद लुटला.

दिवाळी काय खरेदी केले?मुलांनी आग्रह केल्यामुळे थोड्याबहुत प्रमाणात फटाके आणून फोडले. त्यावरच दिवाळीच्या सणाचा आनंद लुटला मिळालेल्या पैशातून गोड-धोड केले. मात्र आणलेला मालविक्री न झाल्याने अंगावर कर्ज असल्याने त्याची गोडी अनुभवता आली नाही. 

मुलांनी कसा लुटला आनंदया झोपडीमधील लहान मुलांनी सांगितले की, दुसऱ्यांनी फोडलेल्या फटाक्यांवर आम्ही समाधान मानले. आकाशात होणारी आतषबाजीचे रोषणाई हीच आमची दिवाळी होती. तसे काही फटाके पालकांनी आणून दिले होते. त्यावरच समाधान मानले.

कोरोनामुळे काही कायम परिणाम झाला याबाबत शंकर टाकिया म्हणाले की, आम्ही दरवर्षी महाराष्ट्रात विविध भागात असे साहित्य विक्रीला आणत असतो. मात्र यंदा या साहित्याला ग्राहक मिळत नाही. साडी अथवा जुन्या कापडावरही आम्ही प्लास्टिक भांडी विकतो. रोख रक्कम असल्यास पन्नास रुपयांपासून दीडशे रुपयांपर्यंत किंमत आहे. पुढील काळात चांगला व्यवसाय होईल. असे वाटते . 

दरवर्षीच असते भटकंतीदिवाळीच्या सणासाठी साधारणपणे सगळे गावाकडे जाण्यासाठी आग्रही असतात. मात्र गावाकडे शेतीवाडी नसलेल्या या आदिवासी भटक्यांना फिरून माल विकण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मुलांना प्रत्येक वर्षी नव्या ठिकाणी जावून व्यवसाय करीत दिवाळी साजरी करावी लागते. त्यात व्यवसाय चांगला झाला तर कपडेलत्ते व फटाके मिळतात. अन्यथा तसेच दिवस काढावे लागतात.

टॅग्स :HingoliहिंगोलीDiwaliदिवाळी