शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्यावर शेतकरी विम्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:15 IST

जिल्ह्यात पीकविम्यासाठी शेवटच्या दिवशी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वच शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले. रात्री उशिरापर्यंत हे चित्र होते. तर राष्ट्रीयीकृत बँकांनीही आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत विमा स्वीकारला. मात्र हे प्रमाण तुरळक आहे. गेल्यावर्षी ३.५0 लाख शेतकºयांनी पीकविमा काढला होता. यंदा सव्वालाखही शेतकºयांचा विमा स्वीकारणे यंत्रणांना शक्य झाले नाही.

हिंगोली : जिल्ह्यात पीकविम्यासाठी शेवटच्या दिवशी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वच शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले. रात्री उशिरापर्यंत हे चित्र होते. तर राष्ट्रीयीकृत बँकांनीही आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत विमा स्वीकारला. मात्र हे प्रमाण तुरळक आहे. गेल्यावर्षी ३.५0 लाख शेतकºयांनी पीकविमा काढला होता. यंदा सव्वालाखही शेतकºयांचा विमा स्वीकारणे यंत्रणांना शक्य झाले नाही.हिंगोली जिल्ह्यात खरीप २0१५ हंगामात २ लाख ५८ हजार ३0९ शेतकºयांनी १ लाख ६0 हजार ५३३ हेक्टरवरील विविध पिकांचा विमा काढला होता. यात २.३४ लाख शेतकºयांना ११४.६८ कोटींची नुकसान भरपाई मंजूर झाली होती. तर २0१५-१६ च्या रबी हंगामात ३१ हजार शेतकºयांनी २५ हजार हेक्टर क्षेत्राचा विमा काढला होता. यात २७ हजार शेतकºयांना ९.६0 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली होती.यापैकी ६.५0 कोटींचे वाटप झाले. तर खरीप हंगाम २0१६-१७ साठी ३ लाख ५५ हजार १६६ शेतकºयांनी १.८५ लाख हेक्टरचा विमा काढला होता. ८५ हजार ७५ शेतकºयांना २८.५0 कोटींचा विमा मंजूर झाला होता. १३.७0 कोटींचे प्रत्यक्ष वाटप झाले.यंदा शेतकºयांचा पीकविमा भरण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. कर्ज घेणाºया शेतकºयांना त्यासोबतच विमा काढून मिळत आहे. असे सर्व बँकांचे २७ हजार ८७0 खातेदार २९ जुलैपर्यंत होते. यात आणखी हजार जणांची संख्या वाढू शकते. तर एकट्या मध्यवर्ती बँकेने २२२९४ जणांना पीककर्ज दिलेले आहे.आॅनलाईनवरही २१ जुलैपर्यंत १६ हजार शेतकºयांनी पीकविमा भरला होता. त्यानंतर रात्रंदिवस काम झाल्याने २0 हजारांपर्यंत नव्या शेतकºयांनी विमा काढला असण्याची शक्यता आहे. तर बँकांनी विमा स्वीकारण्याच्या सूचना दिल्यानंतर मध्यवर्ती बँकेने जवळपास ३५ ते ४0 हजार बिगर कर्जदार शेतकºयांचा विमा स्वीकारला असावा, असा अंदाज आहे. तर राष्ट्रीयीकृत बॅकांनी विमा स्वीकारल्याचा आकडा तर सोडा ही माहितीही द्यायला कुणी तयार नाही. मात्र हा आकडा दहा हजारांच्या पुढे जाईल, याची सुतराम शक्यता नाही.शेवटच्या दिवसापर्यंत महा-ई-सेवा केंद्रांना सर्व्हरच्या समस्येने मोठा त्रास सहन करावा लागला. तर बँकांना ऐनवेळी आदेश आल्याने केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकेवरच सर्व भार पडल्याचे चित्र होते.