शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

गुरुजींच्या बदलीमुळे डोळ्यांच्या धारा खंडेनात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 23:58 IST

अनादीकाळापासून गुरूला जीवनात महत्त्वाचे स्थान राहिले आहे. गुरुला ब्रह्म, विष्णू, महेश उगीच म्हटले नाही. मात्र कलियुगात पगारापुरतेच काम करणारेही काही असल्याने कधी-कधी ते चेष्टेचा विषयही बनतात.

संतोष भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अनादीकाळापासून गुरूला जीवनात महत्त्वाचे स्थान राहिले आहे. गुरुला ब्रह्म, विष्णू, महेश उगीच म्हटले नाही. मात्र कलियुगात पगारापुरतेच काम करणारेही काही असल्याने कधी-कधी ते चेष्टेचा विषयही बनतात. औंढा तालुक्यातील गढाळा येथील मुख्याध्यापक उत्तम वानखेडे यांनी शाळाच नव्हे, तर गावही बदलला. आता त्यांच्या बदलीने अख्खे गावच अश्रू ढाळून बदली रोखण्यासाठी वाट्टेल ते करायची दाखवत आहे. मागील तीन दिवसांपासून ग्रामस्थ शाळेसमोर जमत असून काहींच्या डोळ्यांच्या धारा काही खंडत नाहीत, असे चित्र आहे.गढाळा हे जेमतेम ५०० ते ६०० लोकसंख्येचे गाव आहे. पहिली ते पाचवीपर्यंत जि.प.ची शाळा येथे आहे. संपूर्ण आदिवासी भाग. अल्पभूधारक अथवा भूमिहीनांची संख्या मोठी. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, हे यांच्या गावी नव्हते. कुटुंबियांच्या पोटाची खळगी भरायची तर बाहेरगावी जावेच लागते. यात मुलांच्या शिक्षणालाही फाटा देणे क्रमप्राप्तच. मात्र ही परिस्थिती अचानक बदलली ती बारा वर्षांपूर्वी या शाळेत रुजू झालेल्या उत्तम वानखेडे या शिक्षकाने. ते रुजू झाले अन् ही परिस्थिती पाहून हबकलेच. सेनगाव तालुक्यातील हत्ता येथील शाळेत उपक्रमशील शिक्षक म्हणून नावलौकिक असताना येथे पदरी निराशा पडत होती. गावात शिक्षणाचे तीनतेरा असले तरीही राजकारण मात्र जोमात होते. गुरुजी कुणाच्या घरी चहा घ्यायला गेले तर तोही वादाचा विषय. मात्र यापासून अलिप्त होत वानखेडे यांनी गुणवत्तावाढीकडे लक्ष दिले. त्याचे परिणाम दिसू लागताच ग्रामस्थांच्या मनात वानखेडे गुरुंजींबद्दल आदर वाढला. मग शाळेला राजकारणापासून दूर ठेवून काही विकासाच्या बाबी मांडल्या. तर शाळेत मुक्कामी राहून मुलांचे शिक्षण न बुडविता आई-वडील कामाला जावू शकतात, हे पटवून दिले. एकप्रकारे निवासी शाळाच झाली. मुलांच्या गुणवत्तेची झळाळीही दिसू लागली. नवोदय, विविध क्रीडाप्रकारात मुलांचे नाव होत असल्याने पालकांनीही मुले पूर्णपणे वानखेडे गुरुजींच्या हवाली केली. तेच त्यांचे माय-बाप बनले. त्यांना साथ देण्यास सिद्धेश्वर रणखांब व रोहिणी रणखांब हे जोडपे तेथे आले. त्यानंतर ज्ञानेश्वर पारवे हे शिक्षक तेथे आले. वानखेडे गुरुजींएवढेच त्यांनीही झोकून दिले. मग या ज्ञानमंदिराची ख्याती आजूबाजूच्या गावातही पोहोचली. काहींनी तर शहरातील शाळेतून काढून मुले या शाळेत घातली. शाळेला साथ देताना गावकऱ्यांचीही मने सांधली अन् आज एकोप्याच्या बळावर शाळेवर लाखो रुपये खर्च होत आहेत. शासकीय मदतीची वाटही ग्रामस्थ पहात नाहीत....तरीही दुसºया दिवशी हजरवानखेडे गुरुंजींनी शाळा व गावासाठी काय केले, याची हजारो उदाहरणे सांगता येतील. मात्र त्यांचे वडील वारल्यानंतर त्यांचा अंत्यविधी उरकून गुरुजी दुसºयाच दिवशी शाळेवर हजर झाले, ही आठवण सांगताना महिलांच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. तर वानखेडे गुरुजींची बदली झाल्याची माहिती मिळाली तेव्हापासून महिलांनी चुलीच पेटविल्या नाहीत.शिस्तही करडीगुरुजींचा स्वभाव लोण्याच्या गोळ्यासारखा मऊ ; मात्र शिस्त तेवढीच करडी. मुले तर व्यसनापासून दूर राहतील. मात्र त्यांचे पालकही दूर राहावे म्हणून मुलांना दुकानावरुन तंबाखू किंवा पुडी, बिडी, सिगारेट आणायला सांगितल्यास तो आणणार नाही, ही शिकवण दिली. जर कोणी दबावच आणला तर दिलेल्या रक्कमेतून अर्ध्याची बिस्किटे व अर्धी रक्कम शाळेला दिली जाते.कटू अनुभवहीसुरुवातीला गुरुजींच्या निवासी शाळेची खिल्ली उडवली जायची. काहींनी हा उपक्रम बंद पाडण्याचेही प्रयत्न केले. सकाळी ४ वा. उठून अभ्यास, सहा वाजता व्यायाम, सात वाजता जेवण याचा उपहास केला जायचा. मात्र विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची चुणूक टीकाकारांची तोंडे बंद करायला कामी आली. कोणताही विषय असो विद्यार्थी मागे सरणार नाही, असा शिक्षणाचा दर्जाही मात्र त्यासाठी राखावा लागला.शाळेतच बनविले मंत्रालययेथील शाळेत मंत्रालय बनविले असून, विद्यार्थ्यांची निवड केली. यामध्ये पंतप्रधान युवराज फोले, कामकाज मंत्री जीवन थोरात, पाणीपुरवठा मंत्री श्यामल थोरात, तंत्रज्ञान मंत्री वैभव थोरात, घंटामंत्री विनोद जोजार अशी पदे दिली. तर त्यांच्याही हाताखाली कामकाज पाहण्यासाठी चार- चार मुले दिली. यात शाळेच्या सफाईसह खुर्च्या धुणे आदी कामकाजाचे नियोजन करुन दिल्याचेही विद्यार्थ्यांनी सांगितले.पहिल्यांदाच कुलूपएका चॅनलच्या नावाप्रमाणे २४ तास शाळा असेच शाळेचे नामकरण केले. आजही या ठिकाणी एकदाही कुलूप लावलेले नाही. मात्र आता गुरुजींच्या बदलीमुळे शाळेला पहिल्यांदाच कुलूप लावले आणि ते परतल्यावरच कुलूप उघडू अन्यथा आम्ही शाळाच बंद करणार असल्याचे ग्रामस्थ पोटतिडकीने सांगत होते.एकास हृदयविकाराचा धक्कायेथील ग्यानदेव असोले यांना गुरुजींची बदली झाल्याची माहिती मिळताच त्यांना हृदविकाराचा झटका आला. त्यांच्यावर हिंगोलीत उपचार सुरु आहेत. इतरही दोन ते तीन ग्रामस्थ अजूनही हैराण आहेत. वानखेडे गुरुजीच या मुलांचे खरे मायबाप आहेत, त्यांच्या बदलीमुळे या मुलांचे कसे, या भावनेतून ग्रामस्थांची व्याकुळता वाढीस जात आहे. ग्रामस्थ जे गावात येतील त्यांच्याकडे गुरुजींची मागणी करत आहेत.आज गुणवत्ता सिद्ध करून आठ ते दहा मुले विविध ठिकाणी नवोदयला गेली आहेत. तर विविध क्रीडा स्पर्धांतही मुले चमकत आहेत. सोनाजी पोटे हा धावपटू औरंगाबाद येथील क्रीडाप्रबोधिनीत आॅलिम्पिक पात्रता फेरीसाठी तयारी करत आहे. वादविवादसह अनेक शालेय स्पर्धांत ही मुले मेडलवर मेडल मिळवतआहेत. परमेश्वर पोटे हा पुणे येथे क्रीडाप्रबोधिनीत हॉकी संघाचा कर्णधार आहे.नवोदयसाठी सहा मुले पात्र ठरली. तर शिष्यवृत्तीधारक चार मुले आहेत. मुलांचा शैक्षणिक कल व विषय कल पाहून पाचवीनंतरही त्याची काळजी वानखेडेगुरुजी घेतात.वानखेडे गुरुजींची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आता आक्रमक होत असल्याचे दिसून येत आहे. तेच शिक्षक न मिळाल्यास शाळाच बंद ठेवण्याचा इशारा देत आहेत.

टॅग्स :educationशैक्षणिकTeacherशिक्षक