शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

ग्रामसेवक अन् बीडीओही मुख्यालयी राहिनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:50 IST

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आज ग्रामसेवकांसह बीडीओही मुख्यालयी राहात नसल्याचा मुद्दा चांगलाच गाजला. तीन दिवसांत ग्रामसेवकांनी मुख्यालय न गाठल्यास कारवाई होणार असून बीडीओंबाबत सीईओ निर्णय घेतील, असे ठरले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आज ग्रामसेवकांसह बीडीओही मुख्यालयी राहात नसल्याचा मुद्दा चांगलाच गाजला. तीन दिवसांत ग्रामसेवकांनी मुख्यालय न गाठल्यास कारवाई होणार असून बीडीओंबाबत सीईओ निर्णय घेतील, असे ठरले.जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीस उपाध्यक्ष अनिल पतंगे, सभापती प्रल्हाद राखोंडे, अतिमुकाअ पी.व्ही. बनसोडे आदींची उपस्थिती होती. ग्रामसेवक मुख्यालय राहात नसल्याच्या मुद्यावरून सुरुवातीलाच सेनेचे गटनेते अंकुश आहेर यांनी रान पेटविले. ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई आहे. ग्रामस्थ डोक्यावर हंडे वाहात आहेत. मात्र ही बाब ग्रामसेवकांना माहितीच नसते. काही ठिकाणी पाणी असूनही गावातील राजकीय वादातून बंद हातपंप, नळयोजना दुर्लक्षित राहते. ग्रामसेवक सजग असल्यास हे प्रकार टाळता येतात. मात्र ते गावात राहातही नाहीत अन् येतही नाहीत. किती ग्रामसेवक मुख्यालयी असे विचारताच बीडीओ निरुत्तर झाले. तर किती बीडीओ मुख्यालयी राहतात, हे विचारल्यावर फक्त हिंगोली वगळता इतर कोणीच राहात नसल्याचे आढळले. त्यामुळे तीन दिवसांत ग्रामसेवकावर कारवाई तर बीडीओंबाबत सीईओ निर्णय घेतील, असे उपमुकाअ नितीन दाताळ यांनी सांगितले. त्यानंतर औंढा पंचायत समितीत सिंचन विहिरीचे काम अन् दाम हे समीकरणच बनल्याच्या तक्रारी घेऊन लोक आमच्याकडे येतात. प्रशासन असे वागत असेल तर काय उत्तरे द्यायची, असा सवालही आहेर यांनी केला. यापुढे सभागृहात चुकीची उत्तरे अथवा एरवही अधिकाऱ्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तर सभागृह त्याची गय करणार नाही, असा निर्वाणीचा इशाराही आहेर यांनी यावेळी दिला. समितीवरील बहुतांश सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :Hingoliहिंगोलीzpजिल्हा परिषद