शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

ग्रामसेवक अन् बीडीओही मुख्यालयी राहिनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:50 IST

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आज ग्रामसेवकांसह बीडीओही मुख्यालयी राहात नसल्याचा मुद्दा चांगलाच गाजला. तीन दिवसांत ग्रामसेवकांनी मुख्यालय न गाठल्यास कारवाई होणार असून बीडीओंबाबत सीईओ निर्णय घेतील, असे ठरले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आज ग्रामसेवकांसह बीडीओही मुख्यालयी राहात नसल्याचा मुद्दा चांगलाच गाजला. तीन दिवसांत ग्रामसेवकांनी मुख्यालय न गाठल्यास कारवाई होणार असून बीडीओंबाबत सीईओ निर्णय घेतील, असे ठरले.जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीस उपाध्यक्ष अनिल पतंगे, सभापती प्रल्हाद राखोंडे, अतिमुकाअ पी.व्ही. बनसोडे आदींची उपस्थिती होती. ग्रामसेवक मुख्यालय राहात नसल्याच्या मुद्यावरून सुरुवातीलाच सेनेचे गटनेते अंकुश आहेर यांनी रान पेटविले. ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई आहे. ग्रामस्थ डोक्यावर हंडे वाहात आहेत. मात्र ही बाब ग्रामसेवकांना माहितीच नसते. काही ठिकाणी पाणी असूनही गावातील राजकीय वादातून बंद हातपंप, नळयोजना दुर्लक्षित राहते. ग्रामसेवक सजग असल्यास हे प्रकार टाळता येतात. मात्र ते गावात राहातही नाहीत अन् येतही नाहीत. किती ग्रामसेवक मुख्यालयी असे विचारताच बीडीओ निरुत्तर झाले. तर किती बीडीओ मुख्यालयी राहतात, हे विचारल्यावर फक्त हिंगोली वगळता इतर कोणीच राहात नसल्याचे आढळले. त्यामुळे तीन दिवसांत ग्रामसेवकावर कारवाई तर बीडीओंबाबत सीईओ निर्णय घेतील, असे उपमुकाअ नितीन दाताळ यांनी सांगितले. त्यानंतर औंढा पंचायत समितीत सिंचन विहिरीचे काम अन् दाम हे समीकरणच बनल्याच्या तक्रारी घेऊन लोक आमच्याकडे येतात. प्रशासन असे वागत असेल तर काय उत्तरे द्यायची, असा सवालही आहेर यांनी केला. यापुढे सभागृहात चुकीची उत्तरे अथवा एरवही अधिकाऱ्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तर सभागृह त्याची गय करणार नाही, असा निर्वाणीचा इशाराही आहेर यांनी यावेळी दिला. समितीवरील बहुतांश सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :Hingoliहिंगोलीzpजिल्हा परिषद