शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

ग्रामसेवक अन् बीडीओही मुख्यालयी राहिनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:50 IST

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आज ग्रामसेवकांसह बीडीओही मुख्यालयी राहात नसल्याचा मुद्दा चांगलाच गाजला. तीन दिवसांत ग्रामसेवकांनी मुख्यालय न गाठल्यास कारवाई होणार असून बीडीओंबाबत सीईओ निर्णय घेतील, असे ठरले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आज ग्रामसेवकांसह बीडीओही मुख्यालयी राहात नसल्याचा मुद्दा चांगलाच गाजला. तीन दिवसांत ग्रामसेवकांनी मुख्यालय न गाठल्यास कारवाई होणार असून बीडीओंबाबत सीईओ निर्णय घेतील, असे ठरले.जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीस उपाध्यक्ष अनिल पतंगे, सभापती प्रल्हाद राखोंडे, अतिमुकाअ पी.व्ही. बनसोडे आदींची उपस्थिती होती. ग्रामसेवक मुख्यालय राहात नसल्याच्या मुद्यावरून सुरुवातीलाच सेनेचे गटनेते अंकुश आहेर यांनी रान पेटविले. ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई आहे. ग्रामस्थ डोक्यावर हंडे वाहात आहेत. मात्र ही बाब ग्रामसेवकांना माहितीच नसते. काही ठिकाणी पाणी असूनही गावातील राजकीय वादातून बंद हातपंप, नळयोजना दुर्लक्षित राहते. ग्रामसेवक सजग असल्यास हे प्रकार टाळता येतात. मात्र ते गावात राहातही नाहीत अन् येतही नाहीत. किती ग्रामसेवक मुख्यालयी असे विचारताच बीडीओ निरुत्तर झाले. तर किती बीडीओ मुख्यालयी राहतात, हे विचारल्यावर फक्त हिंगोली वगळता इतर कोणीच राहात नसल्याचे आढळले. त्यामुळे तीन दिवसांत ग्रामसेवकावर कारवाई तर बीडीओंबाबत सीईओ निर्णय घेतील, असे उपमुकाअ नितीन दाताळ यांनी सांगितले. त्यानंतर औंढा पंचायत समितीत सिंचन विहिरीचे काम अन् दाम हे समीकरणच बनल्याच्या तक्रारी घेऊन लोक आमच्याकडे येतात. प्रशासन असे वागत असेल तर काय उत्तरे द्यायची, असा सवालही आहेर यांनी केला. यापुढे सभागृहात चुकीची उत्तरे अथवा एरवही अधिकाऱ्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तर सभागृह त्याची गय करणार नाही, असा निर्वाणीचा इशाराही आहेर यांनी यावेळी दिला. समितीवरील बहुतांश सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :Hingoliहिंगोलीzpजिल्हा परिषद