शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

करंजी परिसरात हरभरा पिकाने तारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:30 IST

सप्टेंबर-ऑक्टोबर २०२० मध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. सततच्या पावसामुळे शेतातच ...

सप्टेंबर-ऑक्टोबर २०२० मध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. सततच्या पावसामुळे शेतातच खरीप पिकांना मोड फुटले होते. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसानही झाले. यानंतर, शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केली, परंतु काहींच्या पदत ती मदत पडली, तर काहींना अजूनही त्या मदतीची प्रतीक्षा करावी लागत आहे. अतिवृष्टीने नुकसान झाल्यानंतर, करंजी, दारेफळ, गुंडा, कुडाळा, विरेेगाव, वडद, नाहाद आदी गावांतील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील ज्वारी, गहू या पिकांबरोबर दुहेरी उत्पन्न देणाऱ्या हरभरा पिकाला पसंती दिली. परिसरात हरभरा पिकांचीही काढणीही झाली असून, हरभरा पिकाने अनेक शेतकऱ्यांना तारले आहे, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.

शासनाने हरभरा पिकाला चांगला भाव द्यावा

करंजीसह परिसरातील शेतकरी कधी अतिवृष्टी, तर कधी कोरडा दुष्काळ या संकटाला सामोरे जात आहे. आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी शासनाने दुहेरी उत्पन्न देणाऱ्या हरभरा पिकाला चांगला भाव देऊन शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.