शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

पाणी उपलब्धता प्रमाणपत्रासाठी मुटकुळेंचे राज्यपालांकडे गा-हाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:32 IST

जिल्ह्यातील सिंचन अनुशेष राज्यपालांनी मान्य केला आहे. सदर अनुशेष दूर करण्यासाठी कयाधू नदीवर व अन्य ठिकाणी सिंचन प्रकल्प घेण्याबाबत आराखडासुद्धा मंजूर करण्यात आला आहे; परंतु सदर सिंचन प्रकल्पासाठी आवश्यक पाणी उपलब्धता प्रमाणपत्राचा अडसर येत आहे. तो दूर व्हावा, यासाठी आ.तान्हाजी मुटकुळे यांनी शिष्टमंडळासह राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील सिंचन अनुशेष राज्यपालांनी मान्य केला आहे. सदर अनुशेष दूर करण्यासाठी कयाधू नदीवर व अन्य ठिकाणी सिंचन प्रकल्प घेण्याबाबत आराखडासुद्धा मंजूर करण्यात आला आहे; परंतु सदर सिंचन प्रकल्पासाठी आवश्यक पाणी उपलब्धता प्रमाणपत्राचा अडसर येत आहे. तो दूर व्हावा, यासाठी आ.तान्हाजी मुटकुळे यांनी शिष्टमंडळासह राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेतली.आवश्यक नसलेल्या प्रकल्पांसाठी यापूर्वी चुकीच्या पद्धतीने पाणी आरक्षित केल्यामुळे नवीन प्रकल्पासाठी पाणी उपलब्धता होण्यास अडचण येत आहे. या प्रकरणी आ.तानाजी मुटकुळे यांनी १ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील राजभवनावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेवून चर्चा केली. हिंगोली जिल्हा भेटीचे आग्रहाचे निमंत्रण दिले. याप्रसंगी राज्यपालांनी हिंगोली जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पासाठी तातडीने पाणी उपलब्धता प्रमाणपत्रे देण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात येतील व लवकरात लवकर कामे सुरू करण्यात येतील, असे आश्वासन दिले. त्यानुसार ५ फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी ११ वाजता मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या प्रसंगी माजी आ. गजाननराव घुगे, इंजि. पी.आर.देशमुख, उत्तमराव जगताप, श्रीरंग राठोड, रवी देवकर आदींची उपस्थिती होती.गेल्या अनेक दिवसांपासून आ.तान्हाजी मुटकुळे यांचा सिंचन अनुशेषासाठी पाठपुरावा सुरू होता. एक प्रश्न मार्गी लागला तर दुसरा निर्माण होत असल्याने ही कामे मार्गी लागण्यात अडचणी येत असून आता पाणी उपलब्धतेचा नवा लढा देण्याची वेळ आली आहे.