शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

पाणी उपलब्धता प्रमाणपत्रासाठी मुटकुळेंचे राज्यपालांकडे गा-हाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:32 IST

जिल्ह्यातील सिंचन अनुशेष राज्यपालांनी मान्य केला आहे. सदर अनुशेष दूर करण्यासाठी कयाधू नदीवर व अन्य ठिकाणी सिंचन प्रकल्प घेण्याबाबत आराखडासुद्धा मंजूर करण्यात आला आहे; परंतु सदर सिंचन प्रकल्पासाठी आवश्यक पाणी उपलब्धता प्रमाणपत्राचा अडसर येत आहे. तो दूर व्हावा, यासाठी आ.तान्हाजी मुटकुळे यांनी शिष्टमंडळासह राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील सिंचन अनुशेष राज्यपालांनी मान्य केला आहे. सदर अनुशेष दूर करण्यासाठी कयाधू नदीवर व अन्य ठिकाणी सिंचन प्रकल्प घेण्याबाबत आराखडासुद्धा मंजूर करण्यात आला आहे; परंतु सदर सिंचन प्रकल्पासाठी आवश्यक पाणी उपलब्धता प्रमाणपत्राचा अडसर येत आहे. तो दूर व्हावा, यासाठी आ.तान्हाजी मुटकुळे यांनी शिष्टमंडळासह राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेतली.आवश्यक नसलेल्या प्रकल्पांसाठी यापूर्वी चुकीच्या पद्धतीने पाणी आरक्षित केल्यामुळे नवीन प्रकल्पासाठी पाणी उपलब्धता होण्यास अडचण येत आहे. या प्रकरणी आ.तानाजी मुटकुळे यांनी १ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील राजभवनावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेवून चर्चा केली. हिंगोली जिल्हा भेटीचे आग्रहाचे निमंत्रण दिले. याप्रसंगी राज्यपालांनी हिंगोली जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पासाठी तातडीने पाणी उपलब्धता प्रमाणपत्रे देण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात येतील व लवकरात लवकर कामे सुरू करण्यात येतील, असे आश्वासन दिले. त्यानुसार ५ फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी ११ वाजता मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या प्रसंगी माजी आ. गजाननराव घुगे, इंजि. पी.आर.देशमुख, उत्तमराव जगताप, श्रीरंग राठोड, रवी देवकर आदींची उपस्थिती होती.गेल्या अनेक दिवसांपासून आ.तान्हाजी मुटकुळे यांचा सिंचन अनुशेषासाठी पाठपुरावा सुरू होता. एक प्रश्न मार्गी लागला तर दुसरा निर्माण होत असल्याने ही कामे मार्गी लागण्यात अडचणी येत असून आता पाणी उपलब्धतेचा नवा लढा देण्याची वेळ आली आहे.