शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

शासन हुकूमशाही पद्धतीने काम करत आहे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 00:28 IST

पंतप्रधान हे अन्याय अत्याचार, घोटाळे व देशात होणारा भ्रष्टाचार याबाबतीत काहीच बोलत नाहीत. शिवाय शासनाने आता हुकूमशाही पद्धतीने काम करण्यास सुरूवात केली असून पंतप्रधान केवळ भाजपाचा प्रसार अधिक कसा होईल या विषयावर जास्त बोलतात. त्यामुळे संविधान बचाव देश बचाव मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पंतप्रधान हे अन्याय अत्याचार, घोटाळे व देशात होणारा भ्रष्टाचार याबाबतीत काहीच बोलत नाहीत. शिवाय शासनाने आता हुकूमशाही पद्धतीने काम करण्यास सुरूवात केली असून पंतप्रधान केवळ भाजपाचा प्रसार अधिक कसा होईल या विषयावर जास्त बोलतात. त्यामुळे संविधान बचाव देश बचाव मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. अशी माहिती हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत राष्टÑवादी महिला काँग्रेसच्या महिला अध्यक्षा फौजिया खान यांनी रविवारी दिली.यावेळी आ. रामराव वडकुते, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मुनीर पटेल, जावेदराज आदी उपस्थित होते.पुढे बोलतान फौजिया खान म्हणाल्या, सगळीकडे ईव्हीएम मशिनचा विरोध केला जात आहे. इतर देशांनीही ईव्हीएम मशिन सोडली आहे. मग भारतातच ईव्हीएम मशिनचा हट्ट का? आम्हाला विश्वास नाही, या मशिनवर; म्हणून या मशिनची दहन मोहीम राबविली जात आहे. बोफोर्सपेक्षाही मोठा घोटाळा एआ आहे, त्यामुळे त्याची किंमत स्ष्टपणे देशासमोर मांडावी, भाजपाकडे अफाट पैसा आला कोठून याची चौकशी होणे गरजेचे आहे, कोट्यवधी रूपये खर्च करून टोलेजंग भाजपाचे कार्यालय आज उभे राहत असल्याचे दिसून येत आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून धर्मा-धर्मांत भांडण लावणे हे एक षडयंत्र या सरकारकडून रचले जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मतभेद पसरविले जात असून हे देशाला घातक आहे. देशात ५०० पेक्षा जास्त लोकांना रस्त्यावर मारण्यात आले आहे. हा गंभीर विषय असल्याचे फौजिया खान यांनी सांगितले. तसेच महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले असून आजही महिला असुरक्षित आहेत, परंतु सराकार महिलांवरील वाढत्या अत्याचाराकडे याकडे दुर्लक्ष करीत आहे. देशातील वाढता अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचारामुळे देशात अराजकता पसरत असल्याचा आरोप फौजिया खान यांनी पत्रकार परिषदेत केला. याबाबत सरकारला जाब विचारण्यासाठी जनतेने एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस