शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

शासन हुकूमशाही पद्धतीने काम करत आहे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 00:28 IST

पंतप्रधान हे अन्याय अत्याचार, घोटाळे व देशात होणारा भ्रष्टाचार याबाबतीत काहीच बोलत नाहीत. शिवाय शासनाने आता हुकूमशाही पद्धतीने काम करण्यास सुरूवात केली असून पंतप्रधान केवळ भाजपाचा प्रसार अधिक कसा होईल या विषयावर जास्त बोलतात. त्यामुळे संविधान बचाव देश बचाव मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पंतप्रधान हे अन्याय अत्याचार, घोटाळे व देशात होणारा भ्रष्टाचार याबाबतीत काहीच बोलत नाहीत. शिवाय शासनाने आता हुकूमशाही पद्धतीने काम करण्यास सुरूवात केली असून पंतप्रधान केवळ भाजपाचा प्रसार अधिक कसा होईल या विषयावर जास्त बोलतात. त्यामुळे संविधान बचाव देश बचाव मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. अशी माहिती हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत राष्टÑवादी महिला काँग्रेसच्या महिला अध्यक्षा फौजिया खान यांनी रविवारी दिली.यावेळी आ. रामराव वडकुते, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मुनीर पटेल, जावेदराज आदी उपस्थित होते.पुढे बोलतान फौजिया खान म्हणाल्या, सगळीकडे ईव्हीएम मशिनचा विरोध केला जात आहे. इतर देशांनीही ईव्हीएम मशिन सोडली आहे. मग भारतातच ईव्हीएम मशिनचा हट्ट का? आम्हाला विश्वास नाही, या मशिनवर; म्हणून या मशिनची दहन मोहीम राबविली जात आहे. बोफोर्सपेक्षाही मोठा घोटाळा एआ आहे, त्यामुळे त्याची किंमत स्ष्टपणे देशासमोर मांडावी, भाजपाकडे अफाट पैसा आला कोठून याची चौकशी होणे गरजेचे आहे, कोट्यवधी रूपये खर्च करून टोलेजंग भाजपाचे कार्यालय आज उभे राहत असल्याचे दिसून येत आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून धर्मा-धर्मांत भांडण लावणे हे एक षडयंत्र या सरकारकडून रचले जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मतभेद पसरविले जात असून हे देशाला घातक आहे. देशात ५०० पेक्षा जास्त लोकांना रस्त्यावर मारण्यात आले आहे. हा गंभीर विषय असल्याचे फौजिया खान यांनी सांगितले. तसेच महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले असून आजही महिला असुरक्षित आहेत, परंतु सराकार महिलांवरील वाढत्या अत्याचाराकडे याकडे दुर्लक्ष करीत आहे. देशातील वाढता अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचारामुळे देशात अराजकता पसरत असल्याचा आरोप फौजिया खान यांनी पत्रकार परिषदेत केला. याबाबत सरकारला जाब विचारण्यासाठी जनतेने एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस