शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
4
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
5
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
6
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
7
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
8
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
9
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
10
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
11
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
12
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
13
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
14
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
15
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
16
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
17
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
18
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
19
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

हे सरकार संविधानाला मोडीत काढायला निघालय-आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 00:48 IST

भाजप-सेना युतीने संविधान मोडीत काढायची प्रतिज्ञा केली आहे. हे शासन मोहन भागवत चालवतात. तशी आपण सर्वांनी या सरकारला मोडीत काढण्याची प्रतिज्ञा करु, असे आवाहन अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी येथील रामलिला मैदानावर केले.

ठळक मुद्देहे शासन मोहन भागवत चालवतात

हिंगोली : भाजप-सेना युतीने संविधान मोडीत काढायची प्रतिज्ञा केली आहे. हे शासन मोहन भागवत चालवतात. तशी आपण सर्वांनी या सरकारला मोडीत काढण्याची प्रतिज्ञा करु, असे आवाहन अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी येथील रामलिला मैदानावर केले.परभणी येथे होणाऱ्या जाहीर सभेत मराठवाड्यातील उमेदवारांची नावे जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमचे उमेदवार जाहिर झाल्यावर एकही माघार घेणार नाही, असेही ते म्हणाले. १३ पाँईट रोस्टर काढून मागासवर्गीयांना लाभापासून वंचित ठेवण्याचा घाट सरकारने आखल्याचे ते यावेळी म्हणाले. शासन महात्मा फुले विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, शबरी महामंडळ या योजनांतून दिडशे ते दोनशे कोटी वंचित समाजाला देते. मात्र वंचित घटकांचा खरा हक्क दिड हजार कोटींचा आहे. हे युती सरकार शासनाच्या तिजोरीची लूट करत आहे. हे थांबवण्यासाठी वंचित घटकांना एकत्र येण्याची गरज आहे.वंचित घटकातील बेरोजगार तरुण बँकेत कर्ज घेण्यासाठी गेल्यावर बँक तारण मागते. या तरुणांकडे तारण वस्तू नसल्याने ते कर्जास मुकत आहेत. धर्माच्या नावाने निवडून आलेले या सरकारला अर्थशास्त्राच काडीच ज्ञान नाही. या मनुवादी सरकारचे धोरण श्रीमंताला आणखी श्रीमंत करायचे आणि गरीबाला आणखी गरीब करायचे आहे. मी या बिनडोक मुख्यमंत्र्याला सांगू इच्छीतो, जो वर्ग गरीब आहे अशा माणसाच्या हातात पैसा द्या, नौकºया द्या तो वर्ग अर्थव्यवस्था ढासळू देणार नाही. महाराष्टÑातील अनेक मंदिरांचे वार्षिक उत्पन्न दोन हजार कोटींच्या वर आहे. लातूर-उस्मानाबाद या जिल्ह्यात दुष्काळ आहे. येथील तुळजाभवानी मंदिराचे वार्षिक उत्पन्न साडेतीन हजार कोटींच्या वर आहे. हा पैसा दुष्काळ निवारणार्थ कामांसाठी वापरल्यास हे दोन्ही जिल्हे दोन वर्षांत दुष्काळमुक्त होतील, असेही ते म्हणाले.आरएसएसला संवैधानिक चौकटीत आणल्यास आघाडीआमचा लढा आरएसएसविरुद्ध आहे. ही गैरसंविधानिक संघटना देश, संविधान मानत नाही. तरीही प्रशासन चालवत आहे. ही संघटना संविधानाच्या चौकटीत आणण्याचा आराखडा जे कुणी आम्हाला देईल, त्यांच्याशी आघाडी करण्याची तयारी असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केले. हिंगोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, जसजशा निवडणुका जवळ येत आहेत, तसे केंद्र शासन अविवेकी भूमिका घेत आहे. त्याचाच परिपाक म्हणून सध्या देशात काही घडामोडी घडत आहेत. प.बंगालच्या ममता बॅनर्जी व आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू यांनी दोन ते अडीच महिन्यांपूर्वीच केंद्राच्या सीबीआयची परवानगी काढून घेतली. आता कलकत्त्याचा एपिसोड हे केंद्राचे निव्वळ नाटक आहे. कायदा व सुव्यवस्था ही राज्याची जबाबदारी आहे. जर राज्य ऐकत नसेल तर योग्य पुराव्यानिशी सर्वोच्च न्यायालयात जाता येते. संविधानाने एककल्ली व सर्वोच्च अधिकार कुणालाच दिले नाहीत. एकमेकांचे नियंत्रण ठेवले. त्यापैकीच सर्वोच्च न्यायालय आहे. मात्र सीबीआयला हत्यार बनविले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने बंदिस्त पोपट असे ताशेरे त्यावर ओढले आहेत. तर जाणीवपूर्वक राज्य आमचे ऐकत नसल्याचे वातावरण निर्माण केले जात असल्याचेही ते म्हणाले. यावेळी एमआयएमचे युसूफ पुंजानी, किशन चव्हाण, फेरोजलाला, जाधव, वसीम देशमुख, रवींद्र वाढे, ज्योतीपाल रणवीर, अ‍ॅड.रवी शिंदे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :HingoliहिंगोलीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPoliticsराजकारण