शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

सरकारला दुष्काळाची जाणीवच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:22 IST

हे सरकार आपले अपयश झाकण्यासाठी दुसऱ्याच्या डोक्यावर खापर फोडण्यात पटाईत आहे. राज्य दुष्काळाच्या खाईत असताना सरकार नावाची व्यवस्थाच कुठे दिसत नाही. दुर्दैवाने या सरकारला दुष्काळाची जाणीवच नसल्याने आम्ही ग्रामीण भागात वास्तव पाहणीसाठी फिरत असल्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : हे सरकार आपले अपयश झाकण्यासाठी दुसऱ्याच्या डोक्यावर खापर फोडण्यात पटाईत आहे. राज्य दुष्काळाच्या खाईत असताना सरकार नावाची व्यवस्थाच कुठे दिसत नाही. दुर्दैवाने या सरकारला दुष्काळाची जाणीवच नसल्याने आम्ही ग्रामीण भागात वास्तव पाहणीसाठी फिरत असल्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथे त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत खा.राजीव सातव, आ.संतोष टारफे, अ‍ॅड. बाबा नाईक यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी विखे पाटील यांनी पीक परिस्थिती व पीकविम्याबाबत माहिती घेतली. तेव्हा गतवर्षी उडीद, मूग, सोयाबीन, कापूस आदीचा विमा काढला. मात्र छदामही मिळाला नाही. यंदाही अतिशय वाईट परिस्थिती असताना दुष्काळच जाहीर झाला नसल्याचे सांगितले. आता जनावरांना चारा नाही. पूर्णपणे कोरडवाहू असलेल्या या जमिनीत काहीच येत नाही. हाताला कामही नाही, असेही काही शेतकºयांनी सांगितले.यानंतर पत्रकारांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, दुष्काळ हाताळण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. कर्जमाफीही शेतकºयांपर्यंत पोहोचली नाही.कर्जमाफी तर आता व्याजासकट दिली पाहिजे. यंदाचा खरीप हंगाम गेल्याने ते कर्जही माफ व्हावे. तर शेतकºयांना सरसकट हेक्टरी ५0 हजार रुपये अनुदान द्यावे, अशी आमची मागणी आहे. जुलै-आॅगस्टपासून दुष्काळी स्थिती आहे. मात्र शासन अजूनही दुष्काळसदृश्य स्थिती जाहीर करण्यातच आहे. आणखी सात महिने दुष्काळाशी सामना करावा लागणार आहे. चारा, पाणी, ग्रामीण बेरोजगारांच्या हाताला काम हे महत्त्वाचे विषय केवळ जिल्हा कार्यालयात बसून घेतलेल्या बैठकांत सुटत नाहीत. त्यासाठी प्रत्यक्ष गावात पाहणी करावी लागते, असेही ते म्हणाले....तर निलंगेकरांची प्रकरणे सभागृहात मांडू-विखेभाजपचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी ही स्टंटबाजी असल्याचा आरोप केल्याबाबत विचारल्यावर ते म्हणाले, दुर्दैवाने त्यांना दुष्काळाची जाणीव नाही. त्यांचे अपयश आमच्या माथी फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. निलंगेकरांच्या भ्रष्टाचाराचीच प्रकरणे एवढी आहेत की त्यावर सभागृहात आम्ही बोलूच. मात्र निदान शेतकºयांचा अपमान तरी करू नये, अशी आशा असल्याचेही विखे पाटील म्हणाले. १९ नोव्हेंबरपासून अधिवेशन सुरू होत आहे. त्यात शासनाने खोटी आकडेवारी सांगून पोपटपंची केल्यास या दौºयातील वास्तव चित्र त्यांच्यासमोर मांडता येईल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेस