शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

सरकारला दुष्काळाची जाणीवच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:22 IST

हे सरकार आपले अपयश झाकण्यासाठी दुसऱ्याच्या डोक्यावर खापर फोडण्यात पटाईत आहे. राज्य दुष्काळाच्या खाईत असताना सरकार नावाची व्यवस्थाच कुठे दिसत नाही. दुर्दैवाने या सरकारला दुष्काळाची जाणीवच नसल्याने आम्ही ग्रामीण भागात वास्तव पाहणीसाठी फिरत असल्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : हे सरकार आपले अपयश झाकण्यासाठी दुसऱ्याच्या डोक्यावर खापर फोडण्यात पटाईत आहे. राज्य दुष्काळाच्या खाईत असताना सरकार नावाची व्यवस्थाच कुठे दिसत नाही. दुर्दैवाने या सरकारला दुष्काळाची जाणीवच नसल्याने आम्ही ग्रामीण भागात वास्तव पाहणीसाठी फिरत असल्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथे त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत खा.राजीव सातव, आ.संतोष टारफे, अ‍ॅड. बाबा नाईक यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी विखे पाटील यांनी पीक परिस्थिती व पीकविम्याबाबत माहिती घेतली. तेव्हा गतवर्षी उडीद, मूग, सोयाबीन, कापूस आदीचा विमा काढला. मात्र छदामही मिळाला नाही. यंदाही अतिशय वाईट परिस्थिती असताना दुष्काळच जाहीर झाला नसल्याचे सांगितले. आता जनावरांना चारा नाही. पूर्णपणे कोरडवाहू असलेल्या या जमिनीत काहीच येत नाही. हाताला कामही नाही, असेही काही शेतकºयांनी सांगितले.यानंतर पत्रकारांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, दुष्काळ हाताळण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. कर्जमाफीही शेतकºयांपर्यंत पोहोचली नाही.कर्जमाफी तर आता व्याजासकट दिली पाहिजे. यंदाचा खरीप हंगाम गेल्याने ते कर्जही माफ व्हावे. तर शेतकºयांना सरसकट हेक्टरी ५0 हजार रुपये अनुदान द्यावे, अशी आमची मागणी आहे. जुलै-आॅगस्टपासून दुष्काळी स्थिती आहे. मात्र शासन अजूनही दुष्काळसदृश्य स्थिती जाहीर करण्यातच आहे. आणखी सात महिने दुष्काळाशी सामना करावा लागणार आहे. चारा, पाणी, ग्रामीण बेरोजगारांच्या हाताला काम हे महत्त्वाचे विषय केवळ जिल्हा कार्यालयात बसून घेतलेल्या बैठकांत सुटत नाहीत. त्यासाठी प्रत्यक्ष गावात पाहणी करावी लागते, असेही ते म्हणाले....तर निलंगेकरांची प्रकरणे सभागृहात मांडू-विखेभाजपचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी ही स्टंटबाजी असल्याचा आरोप केल्याबाबत विचारल्यावर ते म्हणाले, दुर्दैवाने त्यांना दुष्काळाची जाणीव नाही. त्यांचे अपयश आमच्या माथी फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. निलंगेकरांच्या भ्रष्टाचाराचीच प्रकरणे एवढी आहेत की त्यावर सभागृहात आम्ही बोलूच. मात्र निदान शेतकºयांचा अपमान तरी करू नये, अशी आशा असल्याचेही विखे पाटील म्हणाले. १९ नोव्हेंबरपासून अधिवेशन सुरू होत आहे. त्यात शासनाने खोटी आकडेवारी सांगून पोपटपंची केल्यास या दौºयातील वास्तव चित्र त्यांच्यासमोर मांडता येईल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेस