शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

वैज्ञानिक दृष्टिकोणातून ‘अज्ञानाला’ मुठमाती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 23:30 IST

आपण सर्वांनी विज्ञान स्विकारले असले तरी, वैज्ञानिक दृष्टिकोण अद्याप स्विकारला नाही. अज्ञानाला जर खरंच मुठमाती द्यायची असेल तर, सर्वांनीच वैज्ञानिक दृष्टिकोण जोपासला पाहिजे. असे प्रतिपादन हिंगोली येथील महावीर भवन येथे १७ डिसेंबर रोजी आयोजित सौजन्य गुरू गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांनी केले.

ठळक मुद्देहिंगोली : माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांचे, सौजन्य गौरव ग्रंथ कार्यक्रमात प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आपण सर्वांनी विज्ञान स्विकारले असले तरी, वैज्ञानिक दृष्टिकोण अद्याप स्विकारला नाही. अज्ञानाला जर खरंच मुठमाती द्यायची असेल तर, सर्वांनीच वैज्ञानिक दृष्टिकोण जोपासला पाहिजे. असे प्रतिपादन हिंगोली येथील महावीर भवन येथे १७ डिसेंबर रोजी आयोजित सौजन्य गुरू गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांनी केले.यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांच्या संपादित सौजन्य गौरव ग्रंथाचे प्रकाशन वसंत पुरके यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक भ. मा. परसवाळे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त सहसंचालक लक्ष्मीकांत पांडे, जेष्ठ कवी इंद्रजीत भालेराव, विलास वैद्य, साहित्यिक अशोक अर्धापुरकर, तसेच डायटचे प्राचार्य गणेश शिंदे, मंदाताई पवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी दिपक चवणे, उप शिक्षणाधिकारी डी. के. इंगोले, आदी उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी त्यांनी शिवाजी पवार यांचा शैक्षणिक क्षेत्रातील खडतर प्रवासाबद्दल माहिती दिली. तसेच जिल्ह्यातील जि. प. च्या शंभर टक्के शाळा डिजीटलसाठी परिश्रम घेऊन राज्यपाल यांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्याने शिक्षणाधिकारी पवार यांचे कौतुक त्यांनी केले. पुढे बोलताना पुरके म्हणाले जगातला सर्वांत जास्त जबाबदार व्यक्ती म्हणजे शिक्षक होय. विद्यार्थ्यांची प्रगती आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी गुरूजी परिश्रम घेतात. त्यामुळे त्यांच्यावर एक सामाजिक जबाबादारीच आहे. शैक्षणिक गुणवत्तेत १७ क्रमांकावरून तिसरा क्रमांक आला, ते केवळ शिक्षकांमुळेच शक्य झाले असे, म्हणत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत विविध प्रसंग मिश्किल भाषेत सांगितले. गरिबीसारखा गुरू आणि परिश्रमासारखा मित्र नाही. त्यामुळे अनुभवातून माणूस खुप काही शिकतो. मनाने व वर्तनाने माणूस संदर असायला हवा, असे म्हणत त्यांनी अनेक उदाहरणे दिली. यावेळी महिला, पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.अडचणींतून मार्ग काढावा- शिक्षणाधिकारी पवारसदर कार्यक्रमात शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी पवार म्हणाले शिक्षण क्षेत्रात कर्तव्य बजावत असताना अनेक समस्यां समोर आल्या. अशा अड-अडचणी समोर आले तरी न डगमगता त्यातून मार्ग काढावा. जेष्ठ कवी इंद्रजीत भालेराव म्हणाले कुठल्याही कार्यक्षेत्रात जर प्रेमळ व निष्ठावान अधिकाºयासोबत कर्तव्य पार पाडत असताना सोबतच्याची आपसूकच प्रगती होते. यशस्वीतेसाठी व्ही. डी. देशमुख, केशव खटींग, एकनाथ कºहाळे, जी. बी. बोरकर, संजयी गिरी, लोंढे, आर. बी. जाधव, कुलदीप मास्ट, डॉ. रामभाऊ भाकरे, विकास जऊळकर, गजानन खिल्लारी तसेच समितीच्या पदाधिकारी परिश्रम घेतले.