शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

हिंगोली जिल्ह्यात निधीअभावी घरकुल लाभार्थी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 00:03 IST

जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागासाठीच्या विविध घरकुल योजना शासकीय, प्रशासकीय अडचणींत अडकून पडल्या आहेत. त्यामुळे लाभार्थी हैराण असून काहींना तर कडाक्याच्या थंडीतही उघड्यावरच संसाराचा गाडा हाकावा लागत आहे.

ठळक मुद्देकुठे बँकांची, तर कुठे प्रशासकीय अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागासाठीच्या विविध घरकुल योजना शासकीय, प्रशासकीय अडचणींत अडकून पडल्या आहेत. त्यामुळे लाभार्थी हैराण असून काहींना तर कडाक्याच्या थंडीतही उघड्यावरच संसाराचा गाडा हाकावा लागत आहे.प्रधानमंत्री आवास योजनेत ग्रामीण भागासाठी गतवर्षी ३७१५ घरकुलांना मंजुरी मिळाली होती. त्यापैकी पूर्ण झालेल्या घरकुलांची संख्या केवळ ७३१ आहे. या घरकुलांची कामे पूर्ण न होण्यामागे एकमेव कारण म्हणजे निधीच मिळत नसल्याचे लाभार्थ्यांचे म्हणने आहे. यातील लाभार्थ्यांची कामे झाल्याप्रमाणे त्या-त्या टप्प्यावर तीन हप्त्यात निधी वितरित केला जातो. अनेकांना बँक खातेक्रमांक चुकल्याने पहिला हप्ता मिळण्यातच अडचणी झाल्या. आता ही अडचण दूर केली तरीही निधी मिळत नसल्याचेच दिसून येत आहे. त्यातच स्टेट बँक आॅफ हैदराबाद आता स्टेट बँक आॅफ इंडिया झाली आहे. त्यामुळे त्यांच्या आयएफएससी कोडची समस्याही निर्माण झाल्याचे सांगितले जाते. काहींचे जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते आहेत. त्यांनाही मोठी अडचण येत आहे. त्यामुळे कधी नव्हे, एवढ्या घरकुल लाभार्थ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. तर अभियंत्यांकडून या कामांचे वेळेत मूल्यांकन केले जात नाही. शिवाय कामाचे छायाचित्र अपलोडींगही मंद गतीने होत असल्याने लाभार्थ्यांना वेळेत अनुदान मिळत नाही, अशाही तक्रारी वाढल्या आहेत.या योजनेत गतवर्षी औंढा ६५४, वसमत-६७५, हिंगोली-६३१, कळमनुरी-९९४, सेनगाव-७६१ अशी घरकुलसंख्या होती. त्यापैकी ७३१ पूर्ण झाले. उर्वरित २९८४ कामे मार्च एण्डपर्यंतही पूर्ण होणे शक्य दिसत नाही. यंदा तर अवघ्या १0४७ घरकुलांना मंजुरी मिळालेली आहे. मार्च एण्ड जवळ येत असला तरीही कामेच सुरू नसल्याचे चित्र आहे.शहरी भागाचीही बोंबचसर्वांसाठी घरे या ब्रिदघोषाखाली शहरी भागातील प्रधानमंत्री आवास योजनेत २0२२ पर्यंत प्रत्येकाला घर मिळावे, अशी योजना आखण्यात आली आहे. यात हिंगोलीत ३१२५ एवढे एकूण उद्दिष्ट असून यंदा ३१२ मंजूर झाले. त्यापैकी २00 जणांचा प्रस्ताव म्हाडाकडे गेला असला तरीही काहीच नाही. वसमतला २७११ एवढे एकूण उद्दिष्ट असून कळमनुरी नगर परिषदेसह औंढा व सेनगाव नगर पंचायतीसाठी ९९२ एकूण घरकुलांचे उद्दिष्ट आहे. त्यात वसचमतला २७१ तर इतरांना ९९ एवढे यंदाचे उद्दिष्ट आहे. यात अजून संबंधितांचे विकास आराखडेच तयार नसल्याने पुढील प्रक्रियेचा प्रश्नच नाही.