शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
4
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
5
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
7
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
8
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
9
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
10
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
11
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
12
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
13
भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या महिला उमेदवाराला दिलासा; छाननीत बाद झालेले १२ अर्ज कोर्टात वैध
14
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
15
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
16
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
17
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
18
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
19
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
20
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
Daily Top 2Weekly Top 5

३0 जूनपर्यंत पीककर्ज वाटप उद्दिष्ट गाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 01:03 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ मिळाला पाहिजे. बँकांनी ९५0 कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी गतीने काम पूर्ण करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ मिळाला पाहिजे. बँकांनी ९५0 कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी गतीने काम पूर्ण करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला.भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी अग्रणी बँकेच्या वतीने आढावा सादर करण्यात आला. त्यात एकाही बँकेच्या कर्जवाटपाची स्थिती सुधारत नसल्याबाबत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यात ऐन पेरणीच्या तोंडावर ९४0२ शेतकºयांना केवळ ४७.५५ कोटी रुपयांचे कर्जवाटप झाल्याने हे चांगले चित्र नसल्याचे सांगून त्यांनी बँक अधिकाºयांना कानपिचक्या दिल्या. यावेळी ज्या बँकांचे कर्जवाटप कमी आहे, अशांना मुद्दाम बोलावण्यात आले होते. तर जूनअखेर हे उद्दिष्ट कसे पूर्ण करणार याचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले. तर कर्जमाफी वाटप व कर्जमाफीतील सभासदांना नवीन कर्जवाटप याचा आढावाही भंडारी यांनी घेतला. त्यात ४७४५ जणांना १७.१३ कोटी रुपयांचे वाटप झाल्याचे सांगण्यात आले.पीककर्जाव्यतिरिक्त विविध योजनांत करायच्या वाटपाचा आकडाही समाधानकारक नसल्याचे आढाव्यात समोर आले. जिल्हाधिकाºयांच्या आदेशानंतर या कर्जवाटपात गती येईल, अशी अपेक्षा आहे.मात्र एकूण ९ हजारांपैकी अर्ध्या शेतकºयांना जर कर्जमाफीनंतर कर्ज दिल्याचे बँका सांगत असतील तर नियमित खातेदारांची संख्याही मोठी आहे. त्यांना बँका नेहमीच प्राधान्य देतात. यावेळी अशा ग्राहकांनाही कर्ज दिले जात नसल्याचे चित्र यावरून दिसत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी