शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अहवाल सादर करण्यास गशिअची दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:38 IST

जिल्ह्यातील स्थलांतर रोखण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी शिक्षण विभागातर्फे उपाय-योजना केल्या जात आहेत. मात्र जे विद्यार्थी स्थलांतरित झाले आहेत, त्या विद्यार्थ्यांना शिक्षण हमीकार्ड व प्रगत पुस्तिका देऊन तसा अहवाल जिल्हा कार्यालयाकडे पाठविण्याच्या सूचना होत्या. मात्र अद्याप एकाही तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी अहवालच पाठविला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील स्थलांतर रोखण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी शिक्षण विभागातर्फे उपाय-योजना केल्या जात आहेत. मात्र जे विद्यार्थी स्थलांतरित झाले आहेत, त्या विद्यार्थ्यांना शिक्षण हमीकार्ड व प्रगत पुस्तिका देऊन तसा अहवाल जिल्हा कार्यालयाकडे पाठविण्याच्या सूचना होत्या. मात्र अद्याप एकाही तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी अहवालच पाठविला नाही.शाळेतील मुला-मुलींची होणारी गळती थांबविण्यासाठी शासनाकडून विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने बालरक्षक ही संकल्पना गतिमान केली जात असून शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना थेट जवळच्या शाळेत प्रवेश प्रक्रियेच्या प्रभावीपणे अंमलबजावणीसंदर्भात सूचनाही आहेत. विशेष म्हणजे २०१८-१९ मध्ये जे कुटुंबिय स्थलांतरित होत आहेत, त्यांच्या मुलांना मूळ गावी बालरक्षकामार्फत रोखून शिक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. परंतु काही कारणास्तव पालकांसोबत मुले स्थलांतरित होत असतील, तर त्या मुलांना शिक्षण हमीकार्ड व प्रगती नोंद पत्रक दिले जात आहेत. जेणेकरून स्थलांतरित मुलांच्या शिक्षणात खंड पडणार नाही. ही मुले ज्या ठिकाणी स्थलांतरित होतील किंवा जिल्ह्यात अशाप्रकारे स्थलांतरित होऊन आली आहेत. अशा विद्यार्थ्यांना हमीपत्राच्या आधारे थेट जवळच्या शाळेत कुठलाही पुरावा न मागता थेट प्रवेश देण्याच्या सूचना आहेत.बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक नियोजन, अंदाजपत्रक व कृति आराखडा संबधित पातळीवर तयार करून अंमलबजावणी केल्यास जिल्ह्यातील स्थलांतरणामुळे बालकांच्या शिक्षणातील समस्यांवर सर्वांच्या सहकार्याने ठोस उपाय-योजना करता येतील.या अनुषंगाने संबधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाºयांनी सदर कामाचा अहवाल सादर करणे आवश्यक आहे. परंतु याकामी मात्र गटशिक्षणाधिकाºयांचे दुर्लक्ष होत असून त्यांच्या दिरंगाईमुळे शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या नेमकी आकडेवारी किती आहे, याचा ताळमेळ लागत नाही.याबाबत जि. प. प्रशासन व शिक्षणाधिकारी काय ठोस कारवाई करणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातून स्थलांतराचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यामुळे अशांच्या हमीकार्डाचा प्रश्नही आहे.कामाच्या शोधात स्थलांतरित होणाºया कुटुंबियातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होणार नाही व त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी शिक्षण विभागातर्फे नियोजन करण्यात आले. स्थलांतरित होणाºया मुलांना शिक्षण हमीकार्ड दिले जात आहे. सदर कामाचा अहवाल गटशिक्षणाधिकाºयांनी २१ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याची डेडलाईन देण्यात आली होती. त्यानंतर परत पत्र काढून सदर अहवाल २७ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याच्या सूचनाही आहेत. परंतु २६ नोव्हेंबरपर्यंत एकाही कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकाºयाने जिल्हा कार्यालय शिक्षण विभागाकडे अहवालच सादर केला नाही, हे विशेष.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदSchoolशाळा