शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

उपोषणकर्त्यांच्या गर्दीने गजबजली जिल्हा कचेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:34 IST

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला १४ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील शासकीय कार्यालये उपोषणकर्त्यांच्या गर्दीने गजबजून गेली आहेत. विविध प्रलंबित मागण्या, शेतीचे वाद, यासह अनेक समस्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देऊन उपोषण केले जात आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्हा कचेरी व इतर शासकीय कार्यालयापुढे मंडप टाकून उपोषण व आंदोलन सुरू आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला १४ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील शासकीय कार्यालये उपोषणकर्त्यांच्या गर्दीने गजबजून गेली आहेत. विविध प्रलंबित मागण्या, शेतीचे वाद, यासह अनेक समस्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देऊन उपोषण केले जात आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्हा कचेरी व इतर शासकीय कार्यालयापुढे मंडप टाकून उपोषण व आंदोलन सुरू आहेत.हिंगोली शहरातील विभागीय वन अधिकारी कार्यालयासमोर कळमनुरी तालुक्यातील शिवनी बु. येथील पंडित गंगाराम भालेराव हे कुटुंबियासमवेत उपोषणास बसले आहेत. पंडित यांचा वन विभागाने सागवान पासचा माल जप्त केला तो परत द्यावा, तसेच संबंधित वनरक्षकास निलंबित करून एका खाजगी इसमाविरूद्ध कडक कारवाईच्या मागणीसाठी मंगळवारपासून पंडित कुटुंबिय लेकराबाळांसह उपोषणास बसले आहेत.तसेच वसमत तालुक्यातील पळसगाव येथील सांभा नारायण डुकरे व नितीन टिकाराम सूर्यवंशी हे शाळेत हजर होऊनही संबंधित संस्थाचालक हजेरीपटावर सह्या करू देत नसल्यामुळे जिल्हा कचेरीसमोर उपोषणास बसले आहेत. शाळेवर आल्यास शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी कारवाई करा, अशीही संस्थाचालक धमकी देत असल्याचे जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे जलसंधारण विभगामार्फत बांधण्यात आलेल्या पाच बंधाºयांपैकी तीन बंधाºयांच्या कामाची चौकशी करावी. रोही, रानडुकरे व वानरे वन्य जिवांमुळे शेतकºयांचे होणारे नुकसान टाळावे यासह विविध मागण्या शासनाला कळवूनही प्रशासनास दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे कॉ. बालासाहेब शेषराव शिंदे हे जिल्हा कचेरीसमोर उपोषणास बसले आहेत.सेनगाव तालुक्यातील सावरखेडा येथील देवराव किसन भुरके अपंग असून विहिरीची सामायिक हिश्श्यामध्ये नोंद करण्याची त्यांची मागणी आहे. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे ते उपोषणास बसले.हिंगोली तालुक्यातील घोटादेवी येथील गोदावरी शिंदे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मंगळवारपासून उपोषणास बसल्या आहेत. पोलिसांनी संरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप कार्यवाही नाही. विरोधकांनी त्यांच्या हळद पिकाची नासधूस केली आहे.मोंढ्यातील महिला कामगारांचा प्रश्न बनला गंभीर४मागील ४० वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली येथील मोंढ्यात काम करणाºया महिलांना अचानक कामावरून काढून टाकण्यात आले. त्यामुळे महिला कामगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे मोंढ्यात परत काम करण्याची परवानगी द्यावी, या मागणीसाठी जवळपास ४५ महिलां गटा-गटाने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा उपनिबंधक कार्यालय तसेच नागरी हक्क संरक्षण विभाग कार्यालयासमोर उपोषणास बसल्या आहेत. समितीचे पदाधिकारीही आमच्या मागणीकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. त्यामुळे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनीच यावर काही तोडगा काढून कामावर पूर्ववत करून घ्यावे, अशी मागणी महिला कामगारांनी ‘लोकमत’ शी बोलताना केली.

टॅग्स :HingoliहिंगोलीMorchaमोर्चा