शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
2
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
3
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
4
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
5
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
6
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
7
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
8
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
9
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
10
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
11
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
12
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
13
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
14
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
15
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
16
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
17
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
18
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
19
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
20
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट

उपोषणकर्त्यांच्या गर्दीने गजबजली जिल्हा कचेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:34 IST

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला १४ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील शासकीय कार्यालये उपोषणकर्त्यांच्या गर्दीने गजबजून गेली आहेत. विविध प्रलंबित मागण्या, शेतीचे वाद, यासह अनेक समस्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देऊन उपोषण केले जात आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्हा कचेरी व इतर शासकीय कार्यालयापुढे मंडप टाकून उपोषण व आंदोलन सुरू आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला १४ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील शासकीय कार्यालये उपोषणकर्त्यांच्या गर्दीने गजबजून गेली आहेत. विविध प्रलंबित मागण्या, शेतीचे वाद, यासह अनेक समस्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देऊन उपोषण केले जात आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्हा कचेरी व इतर शासकीय कार्यालयापुढे मंडप टाकून उपोषण व आंदोलन सुरू आहेत.हिंगोली शहरातील विभागीय वन अधिकारी कार्यालयासमोर कळमनुरी तालुक्यातील शिवनी बु. येथील पंडित गंगाराम भालेराव हे कुटुंबियासमवेत उपोषणास बसले आहेत. पंडित यांचा वन विभागाने सागवान पासचा माल जप्त केला तो परत द्यावा, तसेच संबंधित वनरक्षकास निलंबित करून एका खाजगी इसमाविरूद्ध कडक कारवाईच्या मागणीसाठी मंगळवारपासून पंडित कुटुंबिय लेकराबाळांसह उपोषणास बसले आहेत.तसेच वसमत तालुक्यातील पळसगाव येथील सांभा नारायण डुकरे व नितीन टिकाराम सूर्यवंशी हे शाळेत हजर होऊनही संबंधित संस्थाचालक हजेरीपटावर सह्या करू देत नसल्यामुळे जिल्हा कचेरीसमोर उपोषणास बसले आहेत. शाळेवर आल्यास शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी कारवाई करा, अशीही संस्थाचालक धमकी देत असल्याचे जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे जलसंधारण विभगामार्फत बांधण्यात आलेल्या पाच बंधाºयांपैकी तीन बंधाºयांच्या कामाची चौकशी करावी. रोही, रानडुकरे व वानरे वन्य जिवांमुळे शेतकºयांचे होणारे नुकसान टाळावे यासह विविध मागण्या शासनाला कळवूनही प्रशासनास दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे कॉ. बालासाहेब शेषराव शिंदे हे जिल्हा कचेरीसमोर उपोषणास बसले आहेत.सेनगाव तालुक्यातील सावरखेडा येथील देवराव किसन भुरके अपंग असून विहिरीची सामायिक हिश्श्यामध्ये नोंद करण्याची त्यांची मागणी आहे. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे ते उपोषणास बसले.हिंगोली तालुक्यातील घोटादेवी येथील गोदावरी शिंदे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मंगळवारपासून उपोषणास बसल्या आहेत. पोलिसांनी संरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप कार्यवाही नाही. विरोधकांनी त्यांच्या हळद पिकाची नासधूस केली आहे.मोंढ्यातील महिला कामगारांचा प्रश्न बनला गंभीर४मागील ४० वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली येथील मोंढ्यात काम करणाºया महिलांना अचानक कामावरून काढून टाकण्यात आले. त्यामुळे महिला कामगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे मोंढ्यात परत काम करण्याची परवानगी द्यावी, या मागणीसाठी जवळपास ४५ महिलां गटा-गटाने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा उपनिबंधक कार्यालय तसेच नागरी हक्क संरक्षण विभाग कार्यालयासमोर उपोषणास बसल्या आहेत. समितीचे पदाधिकारीही आमच्या मागणीकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. त्यामुळे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनीच यावर काही तोडगा काढून कामावर पूर्ववत करून घ्यावे, अशी मागणी महिला कामगारांनी ‘लोकमत’ शी बोलताना केली.

टॅग्स :HingoliहिंगोलीMorchaमोर्चा