शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

ईपीएस पेन्शनर्सचाही मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 00:55 IST

वाढीव पेन्शनच्या मागणीवर केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाकडून आलेल्या नकारात्मक उत्तरामुळे ईपीएस पेन्शनर्सधारकांच्या संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनामार्फत पंतप्रधानांना निवेदन सादर केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : वाढीव पेन्शनच्या मागणीवर केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाकडून आलेल्या नकारात्मक उत्तरामुळे ईपीएस पेन्शनर्सधारकांच्या संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनामार्फत पंतप्रधानांना निवेदन सादर केले. यात शेकडो पेन्शनर्स सहभागी झाले होते.याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले की, केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाकडून खा.दिलीप गांधी यांना २९ मश २0१८ रोजी दिलेल्या पत्रात पेन्शनवाढीबाबात नकारात्मक उत्तर मिळाले आहे. त्यामुळे देशातील पेन्शनर्समध्ये असंतोषाची भावना असल्याचे निवेदनात म्हटले. तर कोशियारी कमेटीच्या शिफारसी लागू करणे अशक्य असल्याचेही सरकारने म्हटल्याने आश्वासन पूर्ण करण्याची इच्छा दिसत नसल्याचा आरोप केला. त्यामुळे ईपीएस पेन्शनधारकांना तुटपुंजे व अपमानजनक वेतन मिळत आहे. याचा तीव्र निषेध करून डिसेंबर २0१८ पूर्वी नव्या मागण्यांनुसार पेन्शन मंजूर करण्याची मागणी केली. मागण्यांमध्ये किमान ९५00 रुपये पेन्शन व महागाई भत्ता द्यावा, अंतिम वाढीसाठी कोशियारी समितीची शिफारस लागू करावी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एक्झेम्ट व नॉन एक्झेम्टचा भेदभाव न करता पेन्शन लागू करा, सर्वांच्याच आरोग्यासाठी ईएसआय योजना लागू करून ती अधिक सक्षम करावी, पेन्शन कम्युटेशन व आरओसी सुविधा पुन्हा प्रदान करा, जीवन प्रमाणपत्राची कार्यवाही स्थानिक बँक खात्यातून व्हावी, अशी मागणीही केली.या निवेदनावर टी.के. टापरे, व्ही.टी. साठे, एस.के. रामावत, डी.ए. सिरसाठ, डी.पी. नरवाडे, एन.पी. घोडके, आर.आर. मुदिराज, के.एन. सरकटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीMorchaमोर्चा