शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त वसाहत योजना अद्याप थंडावलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 23:17 IST

स्वातंत्र्यानंतरही भटके विमुक्त सामाजिक प्रवाहात आलेले नाहीत. त्यामुळे ‘यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत’ विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील कुटुंबांचा शोध घेऊन त्यांना राहण्यासाठी घर बांधून दिले जाणार आहे. मात्र दोन ते तीन वर्षांपासून या योजनेत केवळ जागेचा शोधच घेतला जात असल्याचे जो येईल ते अधिकारी सांगून मोकळा होत असल्याचे गंभीर चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : स्वातंत्र्यानंतरही भटके विमुक्त सामाजिक प्रवाहात आलेले नाहीत. त्यामुळे ‘यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत’ विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील कुटुंबांचा शोध घेऊन त्यांना राहण्यासाठी घर बांधून दिले जाणार आहे. मात्र दोन ते तीन वर्षांपासून या योजनेत केवळ जागेचा शोधच घेतला जात असल्याचे जो येईल ते अधिकारी सांगून मोकळा होत असल्याचे गंभीर चित्र आहे.या योजनेत विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील कुटुंबाचा शोध घेतला जातो. त्यांचे राहणीमान उंचावावे, तसेच त्यांचा उत्पन्नाचा स्त्रोत वाढावा, त्यांना जमीन उपलब्ध करुन देत वसाहत उभी करणे, तसेच त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनविणे, या लाभार्थ्यांसाठी मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेंतर्गत २० टक्के लाभार्थ्यांचा सहभाग, २० टक्के शासनामार्फत बांधकाम अनुदान आणि ५० टक्के वित्त संस्थाकडून कर्ज उभारणी संस्थेतर्फे केली जाते. तर ५० हजारांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांना ६० ते १ लाख रुपये अनुदानाची रक्कम मंजूर केली जाते. वसाहत निर्मित्तीसाठी लाभार्थ्यांची निवड केली जाते. वसाहतीत पाणीपुरवठा, वीजपुरवठा, गटारे, सेफ्टी टँक, अंतर्गत रस्ते आदी सुविधा पुरविल्या जातात. परंतु विशेष बाब म्हणजे या योजनेत अजूनही लाभार्थ्यांचा शोध घेत असल्याचे तेव्हढे मात्र अधिकारी सांगत आहेत. हिंगोली पासून जवळच असलेल्या कोथळज व कळमनुरी तालुक्यातील वाकोडी या दोन गावांची पाहणी अनेक महिन्यांपूर्वीच केली आहे. पाहणीचे काम आटोपल्यानंतर मात्र पुढील प्रक्रियेला काही अजून गती आलेली नाही.या योजनेत लाभ देण्यासाठी वाकोडी आणि कोथळज या दोन गावांची पाहणी केली आहे. परंतु जमिनीचे भाव पाच लाखांच्या वर सांगितले जात असल्याने जमीन हस्तांतरण रखडत आहे. पाच लाखांच्या आत जमिनीचा भाव असेल तर योग्य आहे. अन्यथा विभागाच्या अपेक्षेपेक्षा जास्त भाव असल्याचे वरिष्ठांना कळविण्यात येणार आहेत. तसेच मार्च नंतर या योजनेच्या कामाकडे कटाक्षाने लक्ष देणार असल्याचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी सांगितले.