शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

मुक्त वसाहत योजना अद्याप थंडावलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 23:17 IST

स्वातंत्र्यानंतरही भटके विमुक्त सामाजिक प्रवाहात आलेले नाहीत. त्यामुळे ‘यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत’ विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील कुटुंबांचा शोध घेऊन त्यांना राहण्यासाठी घर बांधून दिले जाणार आहे. मात्र दोन ते तीन वर्षांपासून या योजनेत केवळ जागेचा शोधच घेतला जात असल्याचे जो येईल ते अधिकारी सांगून मोकळा होत असल्याचे गंभीर चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : स्वातंत्र्यानंतरही भटके विमुक्त सामाजिक प्रवाहात आलेले नाहीत. त्यामुळे ‘यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत’ विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील कुटुंबांचा शोध घेऊन त्यांना राहण्यासाठी घर बांधून दिले जाणार आहे. मात्र दोन ते तीन वर्षांपासून या योजनेत केवळ जागेचा शोधच घेतला जात असल्याचे जो येईल ते अधिकारी सांगून मोकळा होत असल्याचे गंभीर चित्र आहे.या योजनेत विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील कुटुंबाचा शोध घेतला जातो. त्यांचे राहणीमान उंचावावे, तसेच त्यांचा उत्पन्नाचा स्त्रोत वाढावा, त्यांना जमीन उपलब्ध करुन देत वसाहत उभी करणे, तसेच त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनविणे, या लाभार्थ्यांसाठी मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेंतर्गत २० टक्के लाभार्थ्यांचा सहभाग, २० टक्के शासनामार्फत बांधकाम अनुदान आणि ५० टक्के वित्त संस्थाकडून कर्ज उभारणी संस्थेतर्फे केली जाते. तर ५० हजारांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांना ६० ते १ लाख रुपये अनुदानाची रक्कम मंजूर केली जाते. वसाहत निर्मित्तीसाठी लाभार्थ्यांची निवड केली जाते. वसाहतीत पाणीपुरवठा, वीजपुरवठा, गटारे, सेफ्टी टँक, अंतर्गत रस्ते आदी सुविधा पुरविल्या जातात. परंतु विशेष बाब म्हणजे या योजनेत अजूनही लाभार्थ्यांचा शोध घेत असल्याचे तेव्हढे मात्र अधिकारी सांगत आहेत. हिंगोली पासून जवळच असलेल्या कोथळज व कळमनुरी तालुक्यातील वाकोडी या दोन गावांची पाहणी अनेक महिन्यांपूर्वीच केली आहे. पाहणीचे काम आटोपल्यानंतर मात्र पुढील प्रक्रियेला काही अजून गती आलेली नाही.या योजनेत लाभ देण्यासाठी वाकोडी आणि कोथळज या दोन गावांची पाहणी केली आहे. परंतु जमिनीचे भाव पाच लाखांच्या वर सांगितले जात असल्याने जमीन हस्तांतरण रखडत आहे. पाच लाखांच्या आत जमिनीचा भाव असेल तर योग्य आहे. अन्यथा विभागाच्या अपेक्षेपेक्षा जास्त भाव असल्याचे वरिष्ठांना कळविण्यात येणार आहेत. तसेच मार्च नंतर या योजनेच्या कामाकडे कटाक्षाने लक्ष देणार असल्याचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी सांगितले.