शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

पाच दिवसांचा आठवडा तरीही दुपारीच दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:29 IST

पूर्वी दुसऱ्या व तिसऱ्या शनिवारी सुटी नसायची. त्यामुळे या दिवशी दुपारीच अनेक कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसायचा. आता शासनाने पाच दिवसाच्या ...

पूर्वी दुसऱ्या व तिसऱ्या शनिवारी सुटी नसायची. त्यामुळे या दिवशी दुपारीच अनेक कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसायचा. आता शासनाने पाच दिवसाच्या आठवड्याची संकल्पना अमलात आणली आहे. त्यामुळे तरी कर्मचारी पाच दिवस अंग झटून काम करतील, अशी अपेक्षा होती. मात्र तसे होताना दिसत नाही. कर्मचारी शुक्रवारी सकाळी हजर तर होतात, मात्र दुपारपर्यंतही त्यांचा पाय कार्यालयात टिकत नसल्याचे चित्र आहे. काहीजण कशीतरी दुपारपर्यंत कळ सोसून दुपारून मात्र निमित्त सांगून गायब होताना दिसत होते. दुपारनंतर जि.प., जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी कार्यालय, तहसील, उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंचायत समिती या प्रमुख कार्यालयांतील उपस्थितीच ५० टक्क्यांच्याही खाली उतरल्याचे दिसत होते. इतर शासकीय कार्यालयांचा तर विचारच न केलेला बरा. काही ठराविक कार्यालयांमध्ये ठराविक कर्मचारीच जागेवर असल्याचे दिसून आले. तर काही कर्मचाऱ्यांना थांबण्याशिवाय तरणोपायच नसतो. त्यामुळे ते जागेवर असल्याचे दिसून येत होते. अन्यथा कंत्राटी कर्मचारीसुद्धा दुपारपासूनच गायब झाल्याचे चित्र पहायला मिळत होते.

काही दिवसांपूर्वी विविध कार्यालयात अधिकाऱ्यांनी तपासणीसत्र सुरू केले होते. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी सहापर्यंत थांबणे भाग पडत होते. आता अशी तपासणी बंद असल्याने अनेकांचे फावत आहे.