शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दुकाने बंदमुळे अनेकांवर ओढावले आर्थिक संकट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:26 IST

मागील वर्षभरापासून बाजारपेठ कधी बंद तर कधी चालू अशी स्थिती आहे. वर्षभर दुकानात ग्राहकच आले नसल्याने व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ ...

मागील वर्षभरापासून बाजारपेठ कधी बंद तर कधी चालू अशी स्थिती आहे. वर्षभर दुकानात ग्राहकच आले नसल्याने व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. धंदे चालत नाहीत. कोरोनामुळे सगळेच भयभीत झाले आहेत. सध्या निर्बंध लावलेली दुकाने उघडल्यास पोलीस व न.प.च्या आधिकाऱ्यांचे भय वाटते. उगाच पोलीस कार्यवाही व न.प.चा दंड नको म्हणून दुकाने बंद ठेवलेली बरी, अशी प्रतिक्रिया अनेक दुकानदारांनी व्यक्त केली आहे.

शनिवार, रविवार तर ब्रेक द चेन असल्याने सर्वच व्यवहार व बाजारपेठा बंद राहतात. व्यापार चालत नसल्याने दुकानात माल भरावा की नाही, कुटुंबाचा उदनिर्वाह चालवायचा कसा? असा प्रश्न पडतो. काही दुकानदारांनी तर माल भरूनही सततच्या संचारबंदी व ब्रेक द चेनमुळे ग्राहकच येत नसल्याने माल तसाच पडून आहे. कोरोनाला पायबंद घालण्यासाठी सॅनिटायझर, सामाजिक अंतराचे पालन केल्या जात आहे. मास्क असेल तर दुकानात प्रवेश देतात. सर्व काळजी घेत असतानाही दुकाने उघडता येत नाहीत. मध्यंतरी कोरोना कमी झाल्यामुळे दुकाने पूर्णपणे उघडण्यास परवानगी मिळाली होती; परंतु मध्येच कोरोनाने पुन्हा चांगलीच मुसंडी मारली व कोरोनाचा सर्वत्र फैलाव झाला. यामुळे लहान-मोठे व्यावसायिक चांगलेच हतबल झाले आहेत. कोरोना संकटामुळे आयुष्य बदलून गेले आहे. संसार चालवायचा कसा, मुला बाळांचे शिक्षण, कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न व्यावसायिकांवर येऊन ठेपला आहे.

सध्या बाजारावर मंदीचे सावट आहे. व्यवसाय चांगलाच कोलमडला आहे. आर्थिक ओढाताण वाढली आहे. वर्षभरापासून धंदाच नसल्याने धंद्यातून येणारे उत्पन्न कमी झाले आहे. सध्या व्यापारी वर्ग आर्थिक विवंचनेत आहे. ऐन लग्नसराईचे दिवस व त्यातच दुकाने बंद असल्याने आर्थिक संकट उभे राहिले आहे. यानंतर पावसाळा येतो. या काळात तर ग्राहकांची संख्याही कमी हाेते.