शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

दुकाने बंदमुळे अनेकांवर ओढावले आर्थिक संकट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:26 IST

मागील वर्षभरापासून बाजारपेठ कधी बंद तर कधी चालू अशी स्थिती आहे. वर्षभर दुकानात ग्राहकच आले नसल्याने व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ ...

मागील वर्षभरापासून बाजारपेठ कधी बंद तर कधी चालू अशी स्थिती आहे. वर्षभर दुकानात ग्राहकच आले नसल्याने व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. धंदे चालत नाहीत. कोरोनामुळे सगळेच भयभीत झाले आहेत. सध्या निर्बंध लावलेली दुकाने उघडल्यास पोलीस व न.प.च्या आधिकाऱ्यांचे भय वाटते. उगाच पोलीस कार्यवाही व न.प.चा दंड नको म्हणून दुकाने बंद ठेवलेली बरी, अशी प्रतिक्रिया अनेक दुकानदारांनी व्यक्त केली आहे.

शनिवार, रविवार तर ब्रेक द चेन असल्याने सर्वच व्यवहार व बाजारपेठा बंद राहतात. व्यापार चालत नसल्याने दुकानात माल भरावा की नाही, कुटुंबाचा उदनिर्वाह चालवायचा कसा? असा प्रश्न पडतो. काही दुकानदारांनी तर माल भरूनही सततच्या संचारबंदी व ब्रेक द चेनमुळे ग्राहकच येत नसल्याने माल तसाच पडून आहे. कोरोनाला पायबंद घालण्यासाठी सॅनिटायझर, सामाजिक अंतराचे पालन केल्या जात आहे. मास्क असेल तर दुकानात प्रवेश देतात. सर्व काळजी घेत असतानाही दुकाने उघडता येत नाहीत. मध्यंतरी कोरोना कमी झाल्यामुळे दुकाने पूर्णपणे उघडण्यास परवानगी मिळाली होती; परंतु मध्येच कोरोनाने पुन्हा चांगलीच मुसंडी मारली व कोरोनाचा सर्वत्र फैलाव झाला. यामुळे लहान-मोठे व्यावसायिक चांगलेच हतबल झाले आहेत. कोरोना संकटामुळे आयुष्य बदलून गेले आहे. संसार चालवायचा कसा, मुला बाळांचे शिक्षण, कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न व्यावसायिकांवर येऊन ठेपला आहे.

सध्या बाजारावर मंदीचे सावट आहे. व्यवसाय चांगलाच कोलमडला आहे. आर्थिक ओढाताण वाढली आहे. वर्षभरापासून धंदाच नसल्याने धंद्यातून येणारे उत्पन्न कमी झाले आहे. सध्या व्यापारी वर्ग आर्थिक विवंचनेत आहे. ऐन लग्नसराईचे दिवस व त्यातच दुकाने बंद असल्याने आर्थिक संकट उभे राहिले आहे. यानंतर पावसाळा येतो. या काळात तर ग्राहकांची संख्याही कमी हाेते.