शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

भूमिगत गटार जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 00:56 IST

शहरातील भूमिगत गटार योजनेचे काम सद्यस्थितीत ९० टक्के पूर्ण झाले असून मार्च २०१९ पर्यंत काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे शहर नालीमुक्त होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील भूमिगत गटार योजनेचे काम सद्यस्थितीत ९० टक्के पूर्ण झाले असून मार्च २०१९ पर्यंत काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे शहर नालीमुक्त होणार आहे.भूमिगत गटार योजनेच्या कामाला ६९ कोटींचा प्रस्तावित खर्च असून आतापर्यंत ४० कोटींचा खर्च झाला आहे. त्यामध्ये १२५ कि.मी. मल:निस्सारण वाहिन्यांपैकी १०५ कि.मी. वाहिन्या शहरात टाकल्या आहेत. भूमिगत गटार योजनेचे शहरात दोन उपप्रकल्प तर एक मुख्य जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यापैकी एक आझम कॉलनी तर दुसरा कयाधू नदीशेजारील महादेव मंदिर परिसरात उभारला आहे. या दोन प्रकल्पांत सांडपाणी साठवून ते विद्युत पंपाद्वारे मुख्य जलशुद्धीकरण प्रकल्पात आणून त्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करुन ते कयाधू नदीत सोडले जाणार आहे. हे पाणी शेती व उद्योग व्यवसायासाठीही उपयोगात आणता येणार आहे. प्रत्येक ठिकाणी हाऊस कनेक्शन चेंबर बनवण्यात आले असून या चेंबरला नागरिकांना कनेक्शन जोडून घ्यावे लागणार आहे.घरातील स्वयंपाकगृह, स्नानगृह व संडासचे कनेक्शनही या चेंबरला जोडता येणार आहे. त्यामुळे शहरातील शोषखड्डे नामषेश होणार आहेत. शहरात नाल्यांमधून केवळ पावसाळ्यातच पाणी वाहणार आहे. हिवाळा आणि उन्हाळ्यात नाल्या पूर्णपणे कोरड्या असणार आहेत. बांधकामाचे काम जवळपास ९0 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. आता तांत्रिक व मशिनरीचे काम तेवढे पूर्ण होणे बाकी आहे. ते लवकरच हाती घेतले जाणार आहे.खतनिर्मिती होणारया प्रकल्पात येणाऱ्या मलापासून खतनिर्मिती करता येणार आहे. अनेक महानगरपालिका अशा खताची विक्रीही करतात. याशिवाय पाणीही एवढे शुद्ध असते की ते उद्योगांना वापरता येणे शक्य आहे. अनेक ठिकाणी असा प्रयोग केला जातो. शेती व नगरपालिकांच्या उद्यानासाठी तर पाण्याचा चांगला उपयोग करता येणार असल्याचेही सांगण्यात आले.असे होणार जलशुद्धीकरणप्रकल्पात साठवलेल्या सांडपाण्यावर चार टप्प्यांत प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामध्ये पहिला टप्पा प्रायमरी ट्रिटमेंट युनिट, दुसरा एसबीआर बेसिन, तिसरा क्लोरिन ट्रीटमेंट युनिट व नंतर निर्जंतुकीकरण होऊन पाणी कयाधू नदीत सोडले जाणार आहे. जलशुद्धीकरणाची प्रक्रिया ‘सी-टेक टॅक्टॉलॉजी’ पद्धतीने शास्त्रशुद्धरीत्या होणार असल्याने प्रकल्प परिसरात दुर्गंधी येणार नाही. या प्रकल्पाची पाणी साठवणूक क्षमता १५ एमएलडी म्हणजेच १५ दसलक्ष लिटर आहे. भविष्यात या जलशुद्धीकरण प्रकल्पावर तीन कर्मचारी काम करणार आहेत. सर्व यंत्रणा स्वयंचलित असल्याने मनुष्यबळाची गरज भासणार नसल्याचे प्रकल्प व्यवस्थापक योगेश वारघडे यांनी सांगितले.भूमिगतसाठी एकूण मनुष्यबळभूमिगत गटार योजनेचे काम एप्रिल २०१७ साली सुरु करण्यात आले आहे. तांत्रिक कर्मचारी ३० मशिनरीवरील कुशल कर्मचारी ८३, मुकादम १५, मजूर १५० अशी एकूण २७८ कर्मचारी काम करत असून २३ मशिनरी कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.कयाधू नदीशेजारील शेतकºयांना दिलासाशहरातील सांडपाणी थेट कयाधू नदीत सोडले जात असल्याने नदी दूषित झाली आहे. त्यामुळे नदीजवळील गावांना अनेक वर्षांपासून दुष्परिणामांचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थांसह जनावरांनाही या दूषित पाण्यामुळे अनेक आजार बळावले आहेत. यानंतर शहरातील सांडपाणी शुद्ध करुन कयाधू नदीत सोडले जाणार असल्याने नदीजवळील शेकडो गावांना दिलासा मिळणार आहे, असे सहायक अभियंता अश्वजित बनसोडे व तांत्रिक सहायक अनिल भगत यांनी सांगितले.

टॅग्स :WaterपाणीPlanning Commissionनियोजन आयोग