शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

भूमिगत गटार जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 00:56 IST

शहरातील भूमिगत गटार योजनेचे काम सद्यस्थितीत ९० टक्के पूर्ण झाले असून मार्च २०१९ पर्यंत काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे शहर नालीमुक्त होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील भूमिगत गटार योजनेचे काम सद्यस्थितीत ९० टक्के पूर्ण झाले असून मार्च २०१९ पर्यंत काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे शहर नालीमुक्त होणार आहे.भूमिगत गटार योजनेच्या कामाला ६९ कोटींचा प्रस्तावित खर्च असून आतापर्यंत ४० कोटींचा खर्च झाला आहे. त्यामध्ये १२५ कि.मी. मल:निस्सारण वाहिन्यांपैकी १०५ कि.मी. वाहिन्या शहरात टाकल्या आहेत. भूमिगत गटार योजनेचे शहरात दोन उपप्रकल्प तर एक मुख्य जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यापैकी एक आझम कॉलनी तर दुसरा कयाधू नदीशेजारील महादेव मंदिर परिसरात उभारला आहे. या दोन प्रकल्पांत सांडपाणी साठवून ते विद्युत पंपाद्वारे मुख्य जलशुद्धीकरण प्रकल्पात आणून त्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करुन ते कयाधू नदीत सोडले जाणार आहे. हे पाणी शेती व उद्योग व्यवसायासाठीही उपयोगात आणता येणार आहे. प्रत्येक ठिकाणी हाऊस कनेक्शन चेंबर बनवण्यात आले असून या चेंबरला नागरिकांना कनेक्शन जोडून घ्यावे लागणार आहे.घरातील स्वयंपाकगृह, स्नानगृह व संडासचे कनेक्शनही या चेंबरला जोडता येणार आहे. त्यामुळे शहरातील शोषखड्डे नामषेश होणार आहेत. शहरात नाल्यांमधून केवळ पावसाळ्यातच पाणी वाहणार आहे. हिवाळा आणि उन्हाळ्यात नाल्या पूर्णपणे कोरड्या असणार आहेत. बांधकामाचे काम जवळपास ९0 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. आता तांत्रिक व मशिनरीचे काम तेवढे पूर्ण होणे बाकी आहे. ते लवकरच हाती घेतले जाणार आहे.खतनिर्मिती होणारया प्रकल्पात येणाऱ्या मलापासून खतनिर्मिती करता येणार आहे. अनेक महानगरपालिका अशा खताची विक्रीही करतात. याशिवाय पाणीही एवढे शुद्ध असते की ते उद्योगांना वापरता येणे शक्य आहे. अनेक ठिकाणी असा प्रयोग केला जातो. शेती व नगरपालिकांच्या उद्यानासाठी तर पाण्याचा चांगला उपयोग करता येणार असल्याचेही सांगण्यात आले.असे होणार जलशुद्धीकरणप्रकल्पात साठवलेल्या सांडपाण्यावर चार टप्प्यांत प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामध्ये पहिला टप्पा प्रायमरी ट्रिटमेंट युनिट, दुसरा एसबीआर बेसिन, तिसरा क्लोरिन ट्रीटमेंट युनिट व नंतर निर्जंतुकीकरण होऊन पाणी कयाधू नदीत सोडले जाणार आहे. जलशुद्धीकरणाची प्रक्रिया ‘सी-टेक टॅक्टॉलॉजी’ पद्धतीने शास्त्रशुद्धरीत्या होणार असल्याने प्रकल्प परिसरात दुर्गंधी येणार नाही. या प्रकल्पाची पाणी साठवणूक क्षमता १५ एमएलडी म्हणजेच १५ दसलक्ष लिटर आहे. भविष्यात या जलशुद्धीकरण प्रकल्पावर तीन कर्मचारी काम करणार आहेत. सर्व यंत्रणा स्वयंचलित असल्याने मनुष्यबळाची गरज भासणार नसल्याचे प्रकल्प व्यवस्थापक योगेश वारघडे यांनी सांगितले.भूमिगतसाठी एकूण मनुष्यबळभूमिगत गटार योजनेचे काम एप्रिल २०१७ साली सुरु करण्यात आले आहे. तांत्रिक कर्मचारी ३० मशिनरीवरील कुशल कर्मचारी ८३, मुकादम १५, मजूर १५० अशी एकूण २७८ कर्मचारी काम करत असून २३ मशिनरी कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.कयाधू नदीशेजारील शेतकºयांना दिलासाशहरातील सांडपाणी थेट कयाधू नदीत सोडले जात असल्याने नदी दूषित झाली आहे. त्यामुळे नदीजवळील गावांना अनेक वर्षांपासून दुष्परिणामांचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थांसह जनावरांनाही या दूषित पाण्यामुळे अनेक आजार बळावले आहेत. यानंतर शहरातील सांडपाणी शुद्ध करुन कयाधू नदीत सोडले जाणार असल्याने नदीजवळील शेकडो गावांना दिलासा मिळणार आहे, असे सहायक अभियंता अश्वजित बनसोडे व तांत्रिक सहायक अनिल भगत यांनी सांगितले.

टॅग्स :WaterपाणीPlanning Commissionनियोजन आयोग