शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

भूमिगत गटार जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 00:56 IST

शहरातील भूमिगत गटार योजनेचे काम सद्यस्थितीत ९० टक्के पूर्ण झाले असून मार्च २०१९ पर्यंत काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे शहर नालीमुक्त होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील भूमिगत गटार योजनेचे काम सद्यस्थितीत ९० टक्के पूर्ण झाले असून मार्च २०१९ पर्यंत काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे शहर नालीमुक्त होणार आहे.भूमिगत गटार योजनेच्या कामाला ६९ कोटींचा प्रस्तावित खर्च असून आतापर्यंत ४० कोटींचा खर्च झाला आहे. त्यामध्ये १२५ कि.मी. मल:निस्सारण वाहिन्यांपैकी १०५ कि.मी. वाहिन्या शहरात टाकल्या आहेत. भूमिगत गटार योजनेचे शहरात दोन उपप्रकल्प तर एक मुख्य जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यापैकी एक आझम कॉलनी तर दुसरा कयाधू नदीशेजारील महादेव मंदिर परिसरात उभारला आहे. या दोन प्रकल्पांत सांडपाणी साठवून ते विद्युत पंपाद्वारे मुख्य जलशुद्धीकरण प्रकल्पात आणून त्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करुन ते कयाधू नदीत सोडले जाणार आहे. हे पाणी शेती व उद्योग व्यवसायासाठीही उपयोगात आणता येणार आहे. प्रत्येक ठिकाणी हाऊस कनेक्शन चेंबर बनवण्यात आले असून या चेंबरला नागरिकांना कनेक्शन जोडून घ्यावे लागणार आहे.घरातील स्वयंपाकगृह, स्नानगृह व संडासचे कनेक्शनही या चेंबरला जोडता येणार आहे. त्यामुळे शहरातील शोषखड्डे नामषेश होणार आहेत. शहरात नाल्यांमधून केवळ पावसाळ्यातच पाणी वाहणार आहे. हिवाळा आणि उन्हाळ्यात नाल्या पूर्णपणे कोरड्या असणार आहेत. बांधकामाचे काम जवळपास ९0 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. आता तांत्रिक व मशिनरीचे काम तेवढे पूर्ण होणे बाकी आहे. ते लवकरच हाती घेतले जाणार आहे.खतनिर्मिती होणारया प्रकल्पात येणाऱ्या मलापासून खतनिर्मिती करता येणार आहे. अनेक महानगरपालिका अशा खताची विक्रीही करतात. याशिवाय पाणीही एवढे शुद्ध असते की ते उद्योगांना वापरता येणे शक्य आहे. अनेक ठिकाणी असा प्रयोग केला जातो. शेती व नगरपालिकांच्या उद्यानासाठी तर पाण्याचा चांगला उपयोग करता येणार असल्याचेही सांगण्यात आले.असे होणार जलशुद्धीकरणप्रकल्पात साठवलेल्या सांडपाण्यावर चार टप्प्यांत प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामध्ये पहिला टप्पा प्रायमरी ट्रिटमेंट युनिट, दुसरा एसबीआर बेसिन, तिसरा क्लोरिन ट्रीटमेंट युनिट व नंतर निर्जंतुकीकरण होऊन पाणी कयाधू नदीत सोडले जाणार आहे. जलशुद्धीकरणाची प्रक्रिया ‘सी-टेक टॅक्टॉलॉजी’ पद्धतीने शास्त्रशुद्धरीत्या होणार असल्याने प्रकल्प परिसरात दुर्गंधी येणार नाही. या प्रकल्पाची पाणी साठवणूक क्षमता १५ एमएलडी म्हणजेच १५ दसलक्ष लिटर आहे. भविष्यात या जलशुद्धीकरण प्रकल्पावर तीन कर्मचारी काम करणार आहेत. सर्व यंत्रणा स्वयंचलित असल्याने मनुष्यबळाची गरज भासणार नसल्याचे प्रकल्प व्यवस्थापक योगेश वारघडे यांनी सांगितले.भूमिगतसाठी एकूण मनुष्यबळभूमिगत गटार योजनेचे काम एप्रिल २०१७ साली सुरु करण्यात आले आहे. तांत्रिक कर्मचारी ३० मशिनरीवरील कुशल कर्मचारी ८३, मुकादम १५, मजूर १५० अशी एकूण २७८ कर्मचारी काम करत असून २३ मशिनरी कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.कयाधू नदीशेजारील शेतकºयांना दिलासाशहरातील सांडपाणी थेट कयाधू नदीत सोडले जात असल्याने नदी दूषित झाली आहे. त्यामुळे नदीजवळील गावांना अनेक वर्षांपासून दुष्परिणामांचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थांसह जनावरांनाही या दूषित पाण्यामुळे अनेक आजार बळावले आहेत. यानंतर शहरातील सांडपाणी शुद्ध करुन कयाधू नदीत सोडले जाणार असल्याने नदीजवळील शेकडो गावांना दिलासा मिळणार आहे, असे सहायक अभियंता अश्वजित बनसोडे व तांत्रिक सहायक अनिल भगत यांनी सांगितले.

टॅग्स :WaterपाणीPlanning Commissionनियोजन आयोग