शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
2
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
3
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
4
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
5
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
6
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
7
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
9
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
10
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
11
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
12
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
13
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
14
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
15
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
16
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
17
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
18
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
19
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
20
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम

शस्त्र परवान्याचीही फॅशन; जिल्ह्यात २०३ परवाने !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:36 IST

हिंगोली: जिल्ह्यात आतापर्यंत २०३ शस्त्र परवाने काढली आहेत. या शस्त्राद्वारे अजून तरी गुन्हे घडले नाहीत, अशी माहिती पोलीस ...

हिंगोली: जिल्ह्यात आतापर्यंत २०३ शस्त्र परवाने काढली आहेत. या शस्त्राद्वारे अजून तरी गुन्हे घडले नाहीत, अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने देण्यात आली. शस्त्र परवाना हा स्वत:च्या संरक्षणासाठी (प्रोटेक्शन) काढला जातो. आजपर्यंत तरी काढलेल्या शस्त्राद्वारे कोणी गैरप्रकार केला नाही, असे पोलीस विभागाच्या वतीने सांगण्यात आले. जे कोणी या शस्त्राचा गैरवापर करेल, त्याचा परवाना रद्द करण्यात येईल, असेही पोलीस विभागाने सांगितले. जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यात ६३, औंढा तालुक्यात ९, वसमत तालुक्यात ५०, कळमनुरी तालुक्यात ४९ आणि सेनगाव तालुक्यात ३२ परवाने स्व:संरक्षणार्थ काढले आहेत. शस्त्र परवाना हा जिल्हाधिकारी कार्यालयातून ऑफलाइन अर्ज भरून काढावा लागतो. यासाठी पोलीस विभागाची परवानगी, मेडिकल प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.

शस्त्र परवाना काढायचा कसा?

जिल्हाधिकारी कार्यालयात यासाठी ऑफलाइन अर्ज असतो. हा अर्ज व्यवस्थितरित्या भरून द्यावा लागतो. सोबत मेडिकल प्रमाणपत्र व शस्त्र चालविण्याचे (प्रशिक्षण) प्रमाणपत्रही द्यावे लागते. यानंतर संपूर्ण शहनिशा केल्यानंतर सर्व अटी समजावून सांगून शस्त्र परवाना दिला जातो.

हिंगोली तालुक्यात जास्त, औंढा तालुक्यात कमी

जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यात शस्त्र परवाना काढणारे हे ६३ आहेत तर औंढा तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ९ जण आहेत. परवाना काढणाऱ्या सर्व जणांना नियम व अटी या परवाने काढतेवेळेस समजावून सांगण्यात आलेल्या आहेत.

तालुकानिहाय परवान्याची संख्या

हिंगोली ६३

औंढा ०९

वसमत ५०

कळमनुरी ४९

सेनगाव ३२

पाच वर्षात दहा परवाने

शस्त्र परवाना काढतेवेळेस ऑफलाइन अर्ज भरावा लागतो. अर्जासोबत मेडिकल प्रमाणपत्र, पोलीस विभागाचे प्रमाणपत्र, ज्यांना शस्त्र परवाना काढायचा आहे त्याचा पासपोर्ट फोटो द्यावा लागतो. पाच वर्षात नाही म्हटले तरी १० लोकांनी परवाने काढले आहेत.

शस्त्र सांभाळणे कठीण आहे...

शस्त्र परवाना काढणे सोपे असले तरी परवाना आणि शस्त्र सांभाळणे कठीण आहे. थोडी चूक केली तरी ती अंगलट येऊन काढलेला परवाना रद्द होऊ शकतो. शस्त्र परवाना काढतेवेळेस सर्व नियम व अटी परवानाधारकांना समजावून सांगितल्या जातात. जिल्ह्यात २०३ जणांनी शस्त्र परवाना काढला आहे. हे सर्व परवाने प्रोटेक्शनसाठी आहेत हे ध्यानात घ्यायला पाहिजे, असे पोलीस विभागाने सांगितले.

शस्त्र परवाण्यासाठी नियम कडक आहेत...

शस्त्र परवाना हा प्रोटेक्शनसाठी दिलेला असतो. शस्त्र चालविण्याचा परवाना आहे म्हणून त्याचा कोणी गैरवापर केला तर त्यांचा काढलेला शस्त्र परवाना रद्द केला जाऊ शकतो. शस्त्र परवान्यासाठी नियमही तसे कडक आहेत. नियमांचे पालन करणे हे परवानाधारकांचे आद्य कर्तव्य आहे.

-उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक तथा कार्यकारी दंडाधिकारी, हिंगोली