शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

हिंगोलीत सोयाबीन अनुदानासाठी शेतक-यांचे खेटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 11:37 PM

शेतक-यांना मागील तीन ते चार वर्षापासून विविध संकटाना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच प्रती क्विंटल सोयाबीनवर मिळणारे २०० रुपयाचे अनुदानही मोजक्याच शेतक-यांच्या पदरात पडल्याने अनुदान न मिळालेले शेतकरी कृउबा मध्ये अनुदानाच्या मागणीसाठी खेटे घेत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देपर्याय काढा : शेतकरी याद्या वाचून - वाचून झाले हैराण; निराशाने परतत आहेत शेतकरी

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शेतक-यांना मागील तीन ते चार वर्षापासून विविध संकटाना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच प्रती क्विंटल सोयाबीनवर मिळणारे २०० रुपयाचे अनुदानही मोजक्याच शेतक-यांच्या पदरात पडल्याने अनुदान न मिळालेले शेतकरी कृउबा मध्ये अनुदानाच्या मागणीसाठी खेटे घेत असल्याचे दिसून येत आहे.सोयाबीन अनुदानासाठी जिल्ह्यातुन ७ हजार ९२० शेतकºयांनी कृउबाकडे प्रस्ताव दाखल केले होते. अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर याला कुठे महूर्त लागून शेतकºयांच्या अनुदानास वरिष्टस्तरावरुन मंजुरी मिळून ६ हजार ९५० शेतकºयांच्या खात्यात अनुदान पडल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे. तर ३२२ शेतकºयांनी दिलेली खाते क्रमांक चुकीची असल्याने त्यांच्या खात्यात अनुदान टाकणे शक्य नाही. चुकीची खाते क्रमांक देणाºया शेतकºयांशी संपर्क करुन त्यांच्याकडून खाते क्रमांक मागवून घेणे सुरु असल्याचे बोलल्या जात आहे. मात्र या ठिकाणी नियमित १० ते १५ शेतकरी सोयाबीनच्या अनुदानाच्या चौकशीसाठी येत असल्यचे चित्र आहे. येथे चौकशीसाठी आलेल्या शेतकºयां समोर कृउबाचे कर्मचारी नावाची यादी टाकत असून, ‘त्या यादीत नावे तुम्हीच शोधा आणि आम्हाला दाखवा’ असा सपाटा लावला आहे. त्यामुळे येथे आलेले शेतकरीही गोंधळून जात आहेत. मोजक्याच शेतकºयांना यादीत नावे सापडत आहेत. तर नावे न सापडणाºया शेतकºयांना पुन्हा - पुन्हा यादी चाळण्याचा सल्ला दिला जात आहे. परत यादी चाळूनही नावे सापडले नाहीत तर आता तुम्हीच सांगा आम्ही काय करणार? असेही कर्मचाºयांतून बोलले जात आहेत. तसेच बँकेतून चुकीची खाते नंबर असलेल्या याद्याही शेतकºयांच्या समोर ठेवल्या जात आहेत. त्यामुळे दोन दोन याद्या पाहून शेतकरी हैराण होऊन आल्या त्या पावली परतत आहेत. त्यामुळे शेतकºयांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या कारभाराला कंटाळून बरेच शेतकरी स्वत:हून विचारपूस करीत नसल्याचेही येथे आलेल्या शेतकºयांतून बोलल्या जात आहे. सध्या तूर कापणी जोरात सुरु असून तीकडे दुर्लक्ष करुन अनुदानासाठी धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे रोजंदारी बुडत असल्याचेही शेतकरी सांगत होते.प्रत्येक फेरीत शेतकºयांना वेग वेगळी करणेशेतकरी निसर्गा समोर तर हतबल झालेच आहेत. त्यातच बरोबर त्यांना शेती माल विक्री करतानाही अनेक अडचणीचा सामना करावा लागला. एवढेच काय तर शेती माल विक्री करण्यासाठी शेतकºयांना अनेकदा मुक्कामीही राहण्याची वेळ आली होती. आता पुन्हा सोयाबीन अनुदानासाठी शेतकºयांना कृउबात खेटे घेतल्या शिवाय पर्यायच नाही. सोयाबीनचे अनुदान मागण्यासाठी आलेल्या शेतकºयांना प्रत्येक फेरीत वेग- वेगवेगळी कारणे सांगितली जात असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन सोयाबीनचे अनुदान देण्याची मागणी शेतकºयांतून होत आहे.