शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

हिंगोलीत सोयाबीन अनुदानासाठी शेतक-यांचे खेटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 23:37 IST

शेतक-यांना मागील तीन ते चार वर्षापासून विविध संकटाना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच प्रती क्विंटल सोयाबीनवर मिळणारे २०० रुपयाचे अनुदानही मोजक्याच शेतक-यांच्या पदरात पडल्याने अनुदान न मिळालेले शेतकरी कृउबा मध्ये अनुदानाच्या मागणीसाठी खेटे घेत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देपर्याय काढा : शेतकरी याद्या वाचून - वाचून झाले हैराण; निराशाने परतत आहेत शेतकरी

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शेतक-यांना मागील तीन ते चार वर्षापासून विविध संकटाना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच प्रती क्विंटल सोयाबीनवर मिळणारे २०० रुपयाचे अनुदानही मोजक्याच शेतक-यांच्या पदरात पडल्याने अनुदान न मिळालेले शेतकरी कृउबा मध्ये अनुदानाच्या मागणीसाठी खेटे घेत असल्याचे दिसून येत आहे.सोयाबीन अनुदानासाठी जिल्ह्यातुन ७ हजार ९२० शेतकºयांनी कृउबाकडे प्रस्ताव दाखल केले होते. अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर याला कुठे महूर्त लागून शेतकºयांच्या अनुदानास वरिष्टस्तरावरुन मंजुरी मिळून ६ हजार ९५० शेतकºयांच्या खात्यात अनुदान पडल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे. तर ३२२ शेतकºयांनी दिलेली खाते क्रमांक चुकीची असल्याने त्यांच्या खात्यात अनुदान टाकणे शक्य नाही. चुकीची खाते क्रमांक देणाºया शेतकºयांशी संपर्क करुन त्यांच्याकडून खाते क्रमांक मागवून घेणे सुरु असल्याचे बोलल्या जात आहे. मात्र या ठिकाणी नियमित १० ते १५ शेतकरी सोयाबीनच्या अनुदानाच्या चौकशीसाठी येत असल्यचे चित्र आहे. येथे चौकशीसाठी आलेल्या शेतकºयां समोर कृउबाचे कर्मचारी नावाची यादी टाकत असून, ‘त्या यादीत नावे तुम्हीच शोधा आणि आम्हाला दाखवा’ असा सपाटा लावला आहे. त्यामुळे येथे आलेले शेतकरीही गोंधळून जात आहेत. मोजक्याच शेतकºयांना यादीत नावे सापडत आहेत. तर नावे न सापडणाºया शेतकºयांना पुन्हा - पुन्हा यादी चाळण्याचा सल्ला दिला जात आहे. परत यादी चाळूनही नावे सापडले नाहीत तर आता तुम्हीच सांगा आम्ही काय करणार? असेही कर्मचाºयांतून बोलले जात आहेत. तसेच बँकेतून चुकीची खाते नंबर असलेल्या याद्याही शेतकºयांच्या समोर ठेवल्या जात आहेत. त्यामुळे दोन दोन याद्या पाहून शेतकरी हैराण होऊन आल्या त्या पावली परतत आहेत. त्यामुळे शेतकºयांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या कारभाराला कंटाळून बरेच शेतकरी स्वत:हून विचारपूस करीत नसल्याचेही येथे आलेल्या शेतकºयांतून बोलल्या जात आहे. सध्या तूर कापणी जोरात सुरु असून तीकडे दुर्लक्ष करुन अनुदानासाठी धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे रोजंदारी बुडत असल्याचेही शेतकरी सांगत होते.प्रत्येक फेरीत शेतकºयांना वेग वेगळी करणेशेतकरी निसर्गा समोर तर हतबल झालेच आहेत. त्यातच बरोबर त्यांना शेती माल विक्री करतानाही अनेक अडचणीचा सामना करावा लागला. एवढेच काय तर शेती माल विक्री करण्यासाठी शेतकºयांना अनेकदा मुक्कामीही राहण्याची वेळ आली होती. आता पुन्हा सोयाबीन अनुदानासाठी शेतकºयांना कृउबात खेटे घेतल्या शिवाय पर्यायच नाही. सोयाबीनचे अनुदान मागण्यासाठी आलेल्या शेतकºयांना प्रत्येक फेरीत वेग- वेगवेगळी कारणे सांगितली जात असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन सोयाबीनचे अनुदान देण्याची मागणी शेतकºयांतून होत आहे.