शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
7
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
8
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
9
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
10
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
11
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
12
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
13
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
14
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
15
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
16
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
17
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
18
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
19
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
20
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 13:17 IST

शेतकऱ्यावर रूग्णालयात उपचार सुरू

ठळक मुद्देऔंढा नागनाथ तालुक्यातील घटना

औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातही शासनाने अद्यापही नुकसानीचे पंचनामे न केल्यामुळे  अन् शासनानेही पंचनामा केला नाही. त्यामुळे प्रकाश इंगोले या तरूण शेतकऱ्याने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना औंढा नागनाथ तालुक्यातील उंडेगाव येथे १ नोव्हेंबर रोजी घडली. सदर शेतकऱ्यावर औंढा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शेतकरी प्रकाश इंगोले यांना तीन एकर शेत आहे. परंतु परतीच्या पावसामुळे शेतातील सोयाबीनचे नुकसान झाले. इंगोले हे शुक्रवारी सकाळी ६ वाजता शेतातील सोयाबीनची पाहणी करून हताशपणे घरी परतले. घरी आल्यानंतर सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांनी विषारी द्रव प्राशन केला. काही वेळाने त्यांच्या आईच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. घटनेची माहिती मिळताच रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष किरण घोंगडे यांच्यासह मनोज मुळे, संघरत्न इंगोले, अनिल वाघमारे, ऋषिकेश इंगोले, भारत दामोदरे, लक्ष्मी रणवीर आदींनी धाव घेऊन इंगोले यांना औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकाश इंगोले यांना पत्नी,  दोन मुले व आई असा परिवार आहे.  त्यांच्या परिवाराचे  शेती हे एकमेव उपजीविकेचे साधन आहे. परंतु परतीच्या पावसामुळे जोमात असलेले सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त झाल्याने प्रकाश इंगोले यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नागरिकांनी सांगितले.

पंचनाम्याचे आदेशऔंढा नागनाथ तालुक्यातील शेतीचे परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करण्याचे आदेश तलाठी, कृषी सेवक यांना दोन दिवसांपूर्वीच दिले आहेत, अशी माहिती तहसीलदार पांडुरंग माचेवड यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

टॅग्स :Suicideआत्महत्याHingoliहिंगोलीFarmerशेतकरीRainपाऊसagricultureशेती